स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग.. (भाग १)

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात २३,२४ आणि २५ डिसेंबर १८९२ हे तीन दिवस महत्त्वाचे होते. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांनी कोणते कार्य करायला सांगितले याचा शोध घेत कलकत्त्यातून बाहेर पडून भारताची परिक्रमा करून स्वामीजी कन्याकुमारी येथे पोचले. नावाड्याला देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून समुद्रातून पोहत जात श्रीपाद शिलेवर बसले. ध्यान लावले.


                                                                        ( स्वामी विवेकानंद )

तीन दिवस ध्यानावस्था राहिली आणि या ध्यानावस्थेत जीवित कर्तव्याचा साक्षात्कार त्यांना झाला. म्हणून ही लेखमाला. आज या शिलेवर विवेकानंद शिला स्मारक उभे आहे.

                                                             ( विवेकानंद शिला स्मारक )

स्वामीजींचे जीवन निःसंशयपणे प्रेरणादायक आहे. एका व्यक्तीच्या जीवनाबद्दल किती प्रकारे बोलता सांगता, अभ्यासता आणि अनुकरण करता येईल याचे हे विलक्षण उदाहरण आहे. साधारणपणे स्वामीजींचे शिकागोचे ११/०९/१८९३ चे भाषण किंबहुना त्यातील सुरुवातीचे संबोधन हे बहुतेक वेळा माहीत असते. परंतु स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रसंग फार माहिती असत नाहीत. त्यामुळे या विषयावर लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. आता ते लिहितो आहे. स्वामीजींचे नाव त्यांचे वडील बाबू विश्वनाथ दत्त यांनी नरेंद्र असे ठेवले होते तर त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी यांनी हा मुलगा आपल्याला शंकराच्या वरामुळे झाला या श्रद्धेने वीरेश्वर ( शंकराचे एक नाव) असे ठेवले होते.( बंगालीमध्ये 'व'चा 'ब' होतो म्हणून बीरेश्वर. प्रेमाने आई बिले म्हणत असे.)

माणूस हा सृष्टीतील सर्वात बुद्धिमान प्राणी हे तर माहिती आहेच. त्यामुळे सर्व गोष्टी या बुद्धीने तपासण्याचा काही जणांचा आग्रह असतो. परंतु मानवी जीवन हे अतिशय विलक्षण आहे. अनेक प्रसंग बुद्धीच्या आधारावर , तर्काच्या जोरावर समजून घेता येऊ शकत नाहीत. कारण मानवी बुद्धीलादेखील मर्यादा आहेत.
स्वामीजींचा स्वतःचा स्वभाव देखील अतिशय चौकस असा होता. प्रत्येक गोष्ट तपासून बघणे पुराव्यांनी मान्य करणे असे ते करत असत. शिष्यत्व पत्करण्यापूर्वी आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांची देखील त्यांनी परीक्षा बघितल्याचे उल्लेख चरित्रात आढळतात. त्यामुळे त्यांच्या चरित्रातील अनुभव हे महत्त्वाचे वाटतात.
हे सर्व प्रसंग स्वामीजींचे रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेले चरित्र, प्रा. शैलेंद्र नाथ धर यांनी विविध साधनांचा अभ्यास करून लिहिलेले स्वामीजींचे विस्तृत चरित्र यामध्ये आहेत.

सुधीर गाडे, पुणे

33 Comments


Comments

  1. Yes it is there.Actually my topic of research for M.phil was also Swami Vivekananda : As a Man of Letters.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख