Posts

सकारात्मक पुढाकारात सहभाग

Image
         कोणतीही यंत्रणा राबवत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी उत्पन्न होत असतात. त्यामुळे यंत्रणेचा अपेक्षित परिणाम होत नाही. आपल्या समाजात तर समस्या आणि त्यांची सोडवणूक यामध्ये खूप वैविध्य आहे. तसेच विशाल लोकसंख्येमुळे यंत्रणेची उपयुक्तता कमी भासत असते.  साधारणपणे समस्यांची जंत्री सर्वांनाच माहिती असते. पण या समस्या सोडवण्यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी ,सरकार आणि नागरिक असे तीन घटक आहेत. लोकप्रतिनिधी त्यांच्या कल्पनेनुसार आणि बऱ्याचवेळा लोकांच्या इच्छेनुसार समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकप्रतिनिधी यंत्रणेचा वापर करून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. वेगवेगळ्या समस्यांसाठी काही वेळा तज्ज्ञ मार्गदर्शक यांचीदेखील मदत घेतली जाते. बहुतेक वेळा असे मार्गदर्शक साधारणपणे काही विशिष्ट समस्येपुरता विचार करणारे असतात असे लक्षात येते. (प्रतिनिधी ओळखपत्र, हे पुढच्या उपयोगासाठी परत घेण्यात आले.)          समस्यांच्या सोडवणुकीसाठी एकत्रितपणे विचार करणे अतिशय आवश्यक आहे. कारण समाजामधील विविध गट...

शिक्षेचे नाना प्रकार

Image
       शाबासकीप्रमाणेच शिक्षेलाही महत्त्व आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा बजावल्या गेल्या अमलातही आणल्या गेल्या. मध्ययुगीन काळात पैशांचा दंड करणे, घरावर जप्ती आणणे, कोठडीत ठेवणे, चाबकाचे फटके देणे, हात किंवा पाय तोडणे, गुलाम करणे, शिरच्छेद करणे, कडेलोट करणे, जाळून मारणे, हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारणे, तोफेच्या तोंडी देणे यासारख्या शिक्षा होत असत. जोपर्यंत चूक , गुन्हा होत राहील तोपर्यंत शिक्षा होतच राहणार. शिक्षांची ही काही उदाहरणे.           (टॅंटलसच्या शिक्षेचे चित्र इंटरनेटवरून साभार)          ग्रीक संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आज ती नामशेष होऊन केवळ संग्रहालये आणि पुस्तकात ही संस्कृती उरली आहे. ग्रीक पुराण हे जगातील प्राचीन पुराणांपैकी एक आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षांच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या पुराणकथांमधील सर्वात शक्तिशाली देव म्हणजे झ्यूस. त्याने कुणाकुणाला शिक्षा दिल्याच्या कथा आहेत. त्यात टॅंटलस नावाचा एक माणूस होता. याची कथा वेगवेगळ्या प्रकारे स...

शाबासकीची भूक

Image
         (चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने) चांगल्या कामाला शाबासकी आणि चुकीला शिक्षा हे व्यवस्थापनशास्त्राचे मूलभूत तत्व आहे. शाबासकीने अजून चांगले काम करण्याचा हुरुप वाढतो तर शिक्षेमुळे चुकीला पायबंद घालता येतो. त्यामुळे हे तत्व सर्वत्र सर्रासपणे वापरले जाते. यातील शाबासकीची भूक माणसाला सदैव असते. या भुकीमुळे चांगले काम करण्यासाठी प्रवृत्ती होत असते. याबाबतीत मनात काही विचार येऊ लागले. बक्षीस अथवा शाबासकी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. राजेशाहीच्या काळात सोने-नाणे, दागिने, जमीन, पदवी इत्यादी गोष्टी देऊन शाबासकी दिली जात असे. रोख रक्कमदेखील देण्याची पद्धत होती.        साधारणपणे आपल्या माणसांच्या उपस्थितीत कौतुक झाले की त्याचा जास्त आनंद होतो. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सरकारच्या आणि इतर संस्था संघटना यांच्यावतीने घेतल्या जातात. त्याचे पारितोषिक म्हणून रक्कम , चषक अथवा पदक, प्रशस्तीपत्र देण्याची पद्धत आहे. काही वर्षांपूर्वी एका स्पर्धात्मक उपक्रमांची चर्चा चालू असताना या स्पर्धेतील विजयी व्यक्तीला कोणते पारितोषिक देता येईल यावर...

पोषाख आणि सभ्यपणा

Image
       १८६२ मध्ये सुरू झालेल्या एका क्लबमध्ये एका दिवसासाठी राहण्याचा नुकताच योग आला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या विश्रांतीसाठी सुरू केलेला हा क्लब आहे. पुढे हळूहळू काही उच्चभ्रू भारतीयदेखील याचे सभासद झाले. नंतर काहीजण अध्यक्ष झाले. १९४७ नंतर अर्थातच सर्व भारतीय राहिले. ब्रिटिश स्थापत्यकलेचा नमुना असलेला हा क्लब ब्रिटिश जीवनशैलीप्रमाणेच असणार हे उघडच आहे. पण मला विशेष वाटलं की कपड्यांचे नियम विशेषतः जेवताना घालायच्या कपड्यांचे नियम तिथे आजदेखील काटेकोरपणे पाळले जातात. बदल एकच आहे तो म्हणजे भारतीय पोषाख आणि कोल्हापुरी चप्पल जेवताना घालायला परवानगी आहे. पण हा वेष तिथे येणारे कुणी घालत असतील असं मला वाटलं नाही. शर्ट पँट घालून चप्पलवर जेवायला परवानगी नाही.                (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)           पोषाखाचे हे नियम असे का केले असतील असा विचार केल्यावर वाटलं की ब्रिटिश पद्धतीचा पोषाख करणे ही एक उच्चभ्रू सभ्यपणाची खूण मानली जात असे. त्याचीच परिणिती ब्रिटिश अधिकारी वर्गासाठी सु...

घटनात्मक लोकशाहीतील जलद न्यायासाठीची आव्हाने

Image
        काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे लहानग्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिला ठार मारण्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने मुली आणि स्त्रियांवरील अत्याचारांचा मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आला. या घटनेनंतर सर्वत्र निषेधाची, संतापाची लाट उसळली. अनेकांनी ताबडतोब न्यायाची मागणी केली. कुणी आरोपीची खांडोळी करा असे म्हटले. तर कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्त्रीवर अत्याचार केला म्हणून रांझे गावचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून त्याचा चौरंग केला तशी शिक्षा करावी असे म्हटले. कोणीकोणी आरोपीचा एन्काऊंटर व्हावा अशी अपेक्षा केली. घडलेल्या हिडीस, नृशंस घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमनात संताप असणे अगदी स्वाभाविक आहे. लोकांना तो संताप घटनात्मक चौकटीत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. ही घटना घडल्यावर लगेच दोन तीन दिवसांत पुण्यात शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अशी घटना होता होता राहिली. पुन्हा समाजमन क्षुब्ध झाले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ताबडतोब व्हावी यावर विकृत माणसे वगळता कुणाचेही दुमत नाही. ...

समर्थ भारत : जवळ तरीही दूर

Image
          गेल्या काही दिवसातील अनेक बातम्यांनी मनावरती ओरखडे उमटवले. काही बातम्यांनी तर मनावरती घाव घातले. खरोखरंच आपण एक देश समाज म्हणून समर्थ होण्याच्या किती जवळ आहोत अथवा किती लांब आहोत याची जणू माहिती या बातम्यांनी दिली.                   (कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)          यातील पहिली बातमी ही पुणे शहराजवळच्या शिरूर या महामार्गावरील गावामधील आहे. या बातमीनुसार वंचित समाजातील एका जोडप्यातील महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. काय करावे हे न कळून दोघेही सुन्नपणे तसेच बसून राहिले. काही संवेदनशील लोकांनी गावातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतले. ते पती-पत्नीदेखील तत्परतेने तिथे हजर झाले आणि त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय उपचार केले. या बातमीत सर्व संबंधितांची तत्परता अभिनंदनीय आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. परंतु त्याच वेळी या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या देशात सरकारी रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात हे या जोडप्याला माहीत नव्हते का? माहित अ...

बापाची धडपड

Image
                                  (कथा)          "सॅली, कुठाय डॅड?" स्पृहाचा प्रश्न कानावर आदळला आणि अमोल दचकला. ऑफिसचं प्रेझेंटेशन करण्याच्या अगदी महत्त्वाच्या कामात तो पुरेपूर गुंतला होता. त्यामुळे ह्या प्रश्नाने त्याला ओढून मनानं घरात आणलं. " अग, तुला सांगितलं ना स्पृहा! तो भूर गेलाय." "नाही डॅड! ते काही नाही! तुम्ही भूर जाऊन सॅलीला घेऊनच या. मला काही माहित नाही!" असं म्हणून स्पृहा मोठ्याने भोकाड पसरून रडू लागली. आता काय करावं हेच अमोलला सुचेना. त्यानं पटकन लॅपटॉप बंद केला आणि स्पृहाचा हात हातात घेऊन तिला थोपटत सांगितलं, "अगं, तो भूर गेलाय. कसा आणू त्याला?" "आणा! आणा! आणा!" हातपाय आपटत स्पृहा किंचाळली. आता मात्र अमोल हतबुद्ध झाला. शेवटी कसंबसं तो म्हणाला, " आणतो बरं, बेटा." स्पृहा थोडी शांत झाली आणि तिथून निघून तिच्या खोलीत गेली.                     (चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)         दिग्मूढ ...