स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न
"सुधीर, यात दोष कुणाचा? मुलीचा ? पालकांचा? शिक्षकांचा? की समाजाचा?" विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासराव लपालकर यांनी मला विचारले आणि मी विचारात पडलो. प्रसंग २०१२ किंवा २०१३ मधला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक मोठा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यासाठी निवडलेल्या कला मंडळाच्या मुलीला स्वामी विवेकानंद यांचे उद्गार, "माझ्या अमेरिकन भगिनींनो आणि बंधुंनो." एवढेच माहीत होते. हे सांगितल्यावर विश्वासरावांनी मला हा प्रश्न विचारला होता. प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन २०१३ या स्वामीजींच्या १५० व्या जयंतीवर्षांत पुण्यात इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने चरित्र कथनाचे जवळपास ५० कार्यक्रम आणि पथनाट्याचे जवळपास ३० कार्यक्रम आम्ही केले. या कार्यक्रमांचा आनंद आणि समाधान त्यात सहभागी झालेल्या आम्हा सर्वांना वाटले. ( वसतिगृहातील विद्यार्थी कार्यक्रम सादर करताना ) स्वामीजींचे चरित्र...