सकारात्मक पुढाकारात सहभाग
कोणतीही यंत्रणा राबवत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी उत्पन्न होत असतात. त्यामुळे यंत्रणेचा अपेक्षित परिणाम होत नाही. आपल्या समाजात तर समस्या आणि त्यांची सोडवणूक यामध्ये खूप वैविध्य आहे. तसेच विशाल लोकसंख्येमुळे यंत्रणेची उपयुक्तता कमी भासत असते. साधारणपणे समस्यांची जंत्री सर्वांनाच माहिती असते. पण या समस्या सोडवण्यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी ,सरकार आणि नागरिक असे तीन घटक आहेत. लोकप्रतिनिधी त्यांच्या कल्पनेनुसार आणि बऱ्याचवेळा लोकांच्या इच्छेनुसार समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकप्रतिनिधी यंत्रणेचा वापर करून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. वेगवेगळ्या समस्यांसाठी काही वेळा तज्ज्ञ मार्गदर्शक यांचीदेखील मदत घेतली जाते. बहुतेक वेळा असे मार्गदर्शक साधारणपणे काही विशिष्ट समस्येपुरता विचार करणारे असतात असे लक्षात येते. (प्रतिनिधी ओळखपत्र, हे पुढच्या उपयोगासाठी परत घेण्यात आले.) समस्यांच्या सोडवणुकीसाठी एकत्रितपणे विचार करणे अतिशय आवश्यक आहे. कारण समाजामधील विविध गट...