Posts

उदार मनाचे शिक्षक

Image
     माणसे जगण्यासाठी विविध व्यवसाय अथवा नोकऱ्या करतात. यातून अर्थ प्राप्ती होते. ही महत्त्वाची असते. यातील काही पेशांना समाजात आदराचे स्थान दिले जाते. त्यातील एक म्हणजे शिक्षकी पेशा. शिक्षकी देशामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचे परस्पर संबंध हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या यामध्ये शिक्षक हे नेहमी वयाने विद्यार्थ्यांपेक्षा मोठे असतात त्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी ही जास्त असते. ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या दोन शिक्षकांच्या आयुष्यातील हे प्रसंग.                         (श्री ललितदादा पाठक)          १९६८-७० मधील गोष्ट आहे. नंदुरबारवरून धुळ्याला अद्यापक विद्यालयात शिकण्यासाठी आलेला ललित पाठक हा विद्यार्थी एके रात्री आपली दैनंदिनी लिहायला बसला होता. तो आज अतिशय संतापात होता. त्या संतापाच्या घरात आपल्या दैनंदिनित त्याने वाक्य लिहिले, " जर माझ्याकडे चाकू असता तर मी प्राचार्य  पाटील यांना भोकसले असते." असे लिहिण्याचं कारण काय होतं? तर त्यादिवशी रस्त्यावरून जाणाऱ्या  ...

Big Hearted Teachers

Image
    People take up various professions or jobs to earn a living. This income is essential. Some of these professions are held in high regard by society, and teaching is one of them. In the teaching profession, the relationship between students and teachers is an extremely important factor. Since teachers are always older than their students, they carry a greater responsibility. Here are two incidents of teachers who fulfilled that responsibility beautifully.                     (Shri. Lalitdada Pathak) This happened sometime between 1968 and 1970. Lalit Pathak, a student who had come from Nandurbar to Dhule to study at the Teachers' Training College, sat down one night to write in his diary. He was furious that day. In his anger, he wrote in his diary, "If I had a knife, I would have stabbed Principal Patil." What had caused him to write such a thing? That day, some students at the training college had mocked an elderly man in...

सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

Image
            गेल्या काही दशकांपासून आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात दरवर्षी 'सामाजिक रक्षाबंधन' हा उपक्रम घेण्यात येतो. यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिंना आमंत्रित करण्यात येते. त्यांचे कार्य, अनुभव यांचा परिचय वसतिगृहात राहणाऱ्या मुलामुलींना करून देण्यात येतो. यावर्षी या उपक्रमामध्ये निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद मुजुमदार यांना बोलावण्यात आले होते. (मध्यभागी टोपी घातलेले डॉ. मिलिंद मुजुमदार, त्यांच्या उजवीकडे श्री प्रशांत कुलकर्णी)             वसतिगृहातील मुलामुलींनी मिलिंदराव यांची मुलाखत घेतली. त्यातून त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना झाली. मूळचे खंडवा, मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेल्या मिलिंदराव यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीर्घकाळ पुण्यातील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरियॉलॉजी' (IITM) या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाली. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मिलिंदराव सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यासाठी विविध ठिकाणी तापमान...

सर्वांगाने उत्तम 'संगीत आनंदमठ' नाटक

Image
        महायोगी श्री अरविंद यांनी 'वंदे मातरम्' ला भारत देशाचा महामंत्र म्हटले आहे. या महामंत्राने अनेक क्रांतिकारकांना फासावर जाण्याची प्रेरणा दिली तर अनेकांना देशासाठीच जगण्याची शिकवण दिली या गीताचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्थान अढळ आहे. हे गीत ज्यांना स्फुरले त्यांचा उल्लेख अरविंद यांनी ऋषी बंकिमचंद्र चटोपाध्याय असा केला आहे. ज्यांना ऋचांचे दर्शन झाले त्यांना ऋषी म्हटले गेले. याच ऋचांनी तयार झाले ते जगातील सर्वात जुने वाड्:मय. ते म्हणजे 'वेद'! ऋषी बंकिमचंद्र यांना असेच 'वंदे मातरम्' गीताचे दर्शन झाले. एका क्षणी भावना उचंबळून आल्या आणि या गीताचा जन्म झाला त्याचा दिनांक सांगितला जातो तो सात नोव्हेंबर १८७५ कार्तिक शुद्ध दशमी.                   ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी हे गीत जन्माला आले. ते प्रसिद्ध झाले ते नंतर १८८१-८२ मध्ये बंकिमचंद्र यांनी क्रमशः 'आनंद मठ' नावाची कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये. २०२५ मध्ये वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त अनेकांनी नवनवीन रचना केल्या, गीते लिहिली, लेख लि...

चुकवलेला वेध

Image
                                   (कथा)       सॅबेस्टियन नेहमीप्रमाणे इंटरनेटवर सर्फिंग करत होता. हॅकिंगची माहिती त्याला बरेच दिवसांपासून होती. त्यामुळे तो ठिकठिकाणी हॅकिंग करुन पाहिजे ती माहिती मिळवत असे. सध्या त्यांचं लक्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जास्त होतं. आपल्या देशात काय चाललं आहे त्यापेक्षा शेजारच्या देशात काय चाललं आहे याकडं तो जरा जास्त लक्ष ठेवून होता. कारणही तसंच होतं. 'रिपब्लिक ऑफ बॉंगो' हा त्याचा देश जगातील इतर देशांच्या तुलनेत अगदी लहानसा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणाच्या अध्यात मध्यात नसलेला त्याचा देश स्वत:च्याच प्रश्नात इतका गुंतला होता की आजूबाजूला लक्ष देण्यासारखी परिस्थितीही नव्हती आणि फुरसतही नव्हती. पण....               ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)        पण हे वर्ष होतं २०४९ चं. तंत्रज्ञानाची, व्यापाराची आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची गुंतागुंत इतकी वाढली होती ...

आता तशी वेळ येणार नाही!

Image
                             (कथा)         (ओढवलेली वेळ या कथेचा पुढचा भाग) ललिताबाई जवळपास अर्धा तास तशाच अवस्थेत बसून राहिल्या. नंतर हळूहळू विचारशक्ती काम करू लागली. त्यांना लक्षात आले की अजून दिनेशला फोन केला नाही. मग त्यांनी लगेच दिनेशला फोन लावला. अमेरिकेत अर्धी रात्र झाली होती. "काय गं आई?" झोपाळलेल्या स्वरात दिनेशने विचारले. ललिताबाई," बाबा....!" एवढाच शब्द उच्चारू शकल्या आणि स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. दिनेश झोपेतून खडबडून जागा झाला. "आई..... आई......" असं म्हणत राहिला दोन पाच मिनिटांनी ललिताबाईंचे रडू जरा ओसरले आणि परिस्थितीचा खुलासा दिनेशला झाला. तोही हतबुद्ध झाला. हजारो किलोमीटरवरून अशा वेळी तो काय करू शकणार होता? तोही गप्प बसला‌. पण काही वेळाने त्याने विचारले, "आई, तो कोविडच्या काळात आपल्या गल्लीत तुम्हाला मदत करणारा कोण गं?" "संतोष!" ललिताबाई म्हणाल्या. "त्याला सांगून बघ. काहीतरी करेल तो." या दिनेशच्या बोलण्यावर "बघते." असं ललिताबाई म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला.   ...

ओढवलेली वेळ

Image
                         (कथा)        ललिताबाई डोक्याला हात लावून बसल्या होत्या. काय करावे काहीच सुचत नव्हते. वेळच तशी ओढवली होती. समोर भुजंगरावांचा अचेतन देह पडला होता. त्याचे अंत्यसंस्कार करायला आता कोण मदत करील या प्रश्नाचे उत्तर काही ललिताबाईंना मिळत नव्हते.               (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)    ललिताबाई आणि भुजंगराव यांचा संसार तब्बल चाळीस वर्षांचा. एका तालुक्याच्या गावात खाऊनपिऊन सुखी असलेला दोघांचा संसार. इतरांच्या मानाने तसा सुखवस्तूच. मुलगा दिनेश अगदी लहानपणापासून हुशार. शाळा महाविद्यालयात अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा. स्वाभाविकच या छोट्या गावात त्याला पाहिजे तसं शिक्षण नव्हतं. म्हणून शाळा संपली की पुढच्या शिक्षणासाठी तो जो पुण्याला गेला तो गावापासून लांबच राहत गेला. आधी पदवी मग अमेरिकेत पदवीनंतरचे शिक्षण मग यथावकाश अमेरिकेत नोकरी आणि अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले.       ...