Posts

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

Image
         "सुधीर, यात दोष कुणाचा? मुलीचा ? पालकांचा? शिक्षकांचा? की समाजाचा?" विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासराव लपालकर यांनी मला विचारले आणि मी विचारात पडलो. प्रसंग २०१२ किंवा २०१३ मधला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक मोठा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यासाठी निवडलेल्या कला मंडळाच्या मुलीला स्वामी विवेकानंद यांचे उद्गार, "माझ्या अमेरिकन भगिनींनो आणि बंधुंनो." एवढेच माहीत होते. हे सांगितल्यावर विश्वासरावांनी मला हा प्रश्न विचारला होता. प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन २०१३ या स्वामीजींच्या १५० व्या जयंतीवर्षांत पुण्यात इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने चरित्र कथनाचे जवळपास ५० कार्यक्रम आणि पथनाट्याचे जवळपास ३० कार्यक्रम आम्ही केले. या कार्यक्रमांचा आनंद आणि समाधान त्यात सहभागी झालेल्या आम्हा सर्वांना वाटले.               ( वसतिगृहातील विद्यार्थी कार्यक्रम सादर करताना )            स्वामीजींचे चरित्र...

शिवनेरीवरील माझा भाग्ययोग

Image
         उत्सव बहु थोर झाला, भाग्ययोग अनुभवला "सुधीरजी, यावर्षी शिवनेरीवर तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला वक्ते म्हणून येणार ना?" काही दिवसांपूर्वीच आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा फोन आला. गेल्या वर्षीही त्यांनी निमंत्रण दिले होते पण काही अडचणींमुळे मला जायला जमले नव्हते. पण यावर्षी मात्र तो योग आला.      श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे यांच्या वतीने गेल्या ४६ वर्षांपासून फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्याकाळी शिवजयंतीची तिथी वैशाख शुद्ध द्वितीया जास्त प्रचलित होती. पण त्यावेळी नव्याने उजेडात आलेल्या पराव्यांनुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी मान्य झाली. ह्या उत्सवाची परंपरा सुरू झाली. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणाऱ्या अनेक महनीय व्यक्ती या उत्सवासाठी येऊन गेल्या आहेत. यावर्षी हा भाग्ययोग मला अनुवयला मिळाला. ग्राहक चळवळीचे पहिल्या पिढीतील कार्यकर्ते कै.बिंदुमाधव जोशी आणि कै. शाहीर हिंगे यांनी या उत्सवाची सुरुवात आपल्या सहकाऱ्यांसह केली होती. हीच परंपरा आजही जपली गेली आहे.         शाह...

छ. शिवराय : सागरी दुर्ग आणि सलगी देणे

Image
      छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत. या द्रष्ट्या महापुरुषाने परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला आणि भविष्याचा वेध घेऊन भूतकाळातील चुका, त्रुटी दुरुस्त करण्यासाठी परिश्रम केले. शिवरायांच्या पूर्वी ३०० वर्षे महाराष्ट्रात धर्मांध आक्रमकांची सत्ता होती. या धर्मांध आक्रमकांनी भूमीवर जम बसवला पण सागरी सत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले. भारताचा विचार केला तर मध्ययुगीन काळात क्रूर मोगली सत्तेचे वर्चस्व भारताच्या मोठ्या भूभागावर राहिले. परंतु त्यांनीदेखील सागरी सत्ता उभारण्याचा प्रयत्न केला नाही. इतके दुर्लक्ष केले की मोगली बादशाहाला देखील मक्केला जाण्यासाठी युरोपियनांचा परवाना लागे. महाराजांची दूरदृष्टी अशी की त्यांनी सागरी सत्ता उभारण्याची कल्पना मनामध्ये घेऊन त्याप्रमाणे पावले उचलली.                          ( सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिरातील छ. शिवराय )                    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        सागरी सत्तेचा एक ...

चहाच्या निमित्ताने....

Image
       गरम चहाचा कप पाहून मला अनेक वेळा कै. सुनीलराव खेडकर यांची आठवण येते. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्याबरोबर मी आधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि नंतर संघाच्या पुणे महानगर कार्यकारिणीत काही वर्षे काम केले. ते म्हणत असत की, "मला अगदी उकळत असलेला चहा ताबडतोब आणून द्या अगदी कढत चहा हवा." एवढा कढत चहा पिणारे ते मी पाहिलेले एकमेव व्यक्ती. याउलट काही जणांना चहा थंड झाल्यावर पिण्याची सवय असते. चहा थंड होऊ लागला की त्याच्यावर साय धरते. मला ती आवडत नाही. म्हणून अनेकवेळा मीटिंगमध्ये चहा आणून दिला की सांगून मी गरम चहा घेत असतो.       चहाचा विषय निघाला की हमखास वाक्य आठवते ते म्हणजे "चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो." पूर्वी फक्त चीनमध्ये आढळणारा चहा ब्रिटिश कंपन्यांनी भारतात पद्धतशीरपणे रुजवला.  आता भारतात चहाचा खप प्रचंड होतो. भारतीयांनी चहाची स्वतःची पद्धत शोधून काढली. चहाच्या निमित्ताने नेहमी आठवते ती इतिहासाच्या पुस्तकात शिकलेली बोस्टन टी पार्टी इंग्रजांच्या दडपणाला जुगारून देऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या लोकांनी ब...

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य

Image
      नाचविता ध्वज तुझा गुंतले शृखंलेत हात       बद्ध करांनी तुज करिती अखेरचा प्रणिपात कवीवर्य कुसमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध 'गर्जा जयजयकार ' या कवितेतीतील या ओळी  ४ नोव्हेंबर १८४५ यादिवशी जन्मलेल्या आणि १७ फेब्रुवारी १८८३ यादिवशी मृत्यू पावलेल्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनाला शब्दशः लागू पडतात. आपला अखेरचा श्वास भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एडन येथील कारागृहात घेताना त्यांनी भारतमातेला विनम्र भावाने प्रणाम केला ही गोष्ट अक्षरशः खरी आहे.                           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          धूर्त इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी येऊन आपले बस्तान बसवले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्याचा घास घेतला. पारतंत्र्याच्या दीर्घ काळरात्रीची सुरुवात झाली. इंग्रजी राज्य आपल्यासोबत प्रामुख्याने इंग्रजी राज्य स्थिर राहावे यासाठी विविध आधुनिक सुधारणा घेऊन आले. भारतात प्रचलित असलेल्या दुष्ट रुढी परंपरा यांनादेखील या राज्याने हादरवून सोडले. क...

पांडुरंगाला राखी

Image
                           कथा           गोविंद नेहमीसारखा आनंदाने कार्यालयात शिरला. प्रत्यक्ष पांडुरंगांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे याचा त्याला फार आनंद झाला होता. तसे फार दिवस झाले नव्हते. नोकरी सुरू होऊन दोन तीनच महिने  झाले होते. पण पांडुरंग देवस्थानात नोकरी करायला मिळताना गोविंद थोडासा खट्टू झाला होता. गाभाऱ्याजवळ नोकरी असावी ही त्याची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे कामावर असताना 'सावळे सुंदर रूप मनोहर' असणाऱ्या विठ्ठलाचे सदोदित दर्शन घडत राहावे ही त्याची मनोमन इच्छा होती. पण हरकत नाही. देवाची सेवा तर घडतीय असं म्हणत त्यानं आपलं समाधान करून घेतलं होतं. कामावर आल्यानंतर आणि घरी परतताना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हा परिपाठ तो आचरू लागला.                               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        देवस्थानच्या कार्यालयात राहून पत्रव्यवहार...

कर्तव्यपूर्ती

Image
                                   कथा             दिवस मावळतीला चालला होता. हळूहळू अंधार वाढत चालला होता आपल्या कुटीमध्ये बसलेल्या मेधानंदाना आता दिवा लावावा याची जाणीव झाली. परंतु मन एका अनिर्वचनीय आनंदाने भरून गेले होते. आज आपल्या हातून कर्तव्याची पूर्ती झाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. यापूर्वी कधी न अनुभवलेले समाधान ते अनुभवीत होते. त्यामुळे अगदी निश्चल अवस्थेत ते बसून राहिले.                ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )      किती काळ गेला हे सांगता येत नव्हते. पण थोड्यावेळात कुटीच्या दरवाजात दिवा घेऊन वल्लरी आली. दिव्याच्या मंद तेजामध्ये तिचा चेहरा उजळला होता. दिवा घेऊन ती आतमध्ये प्रवेश करती झाली. याची जाणीवदेखील मेधानंद यांना झाली नाही. ती देखील अद्भुत दृश्य पहावे अशा भावनेने पाहू लागल. एकदम निश्चल बसलेल्या मेधानंद यांनी आपले नेत्र मिटले होते. प्रकाशाची जणू जादू होऊन ...