Posts

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य

Image
      नाचविता ध्वज तुझा गुंतले शृखंलेत हात       बद्ध करांनी तुज करिती अखेरचा प्रणिपात कवीवर्य कुसमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध 'गर्जा जयजयकार ' या कवितेतीतील या ओळी आद्यक्रांतिवीर ४ नोव्हेंबर १८४५ यादिवशी जन्मलेल्या आणि १७ फेब्रुवारी १८८३ यादिवशी मृत्यू पावलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनाला शब्दशः लागू पडतात. आपला अखेरचा श्वास भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एडन येथील कारागृहात घेताना त्यांनी भारतमातेला विनम्र भावाने प्रणाम केला ही गोष्ट अक्षरशः खरी आहे.                           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          धूर्त इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी येऊन आपले बस्तान बसवले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्याचा घास घेतला. पारतंत्र्याच्या दीर्घ काळरात्रीची सुरुवात झाली. इंग्रजी राज्य आपल्यासोबत प्रामुख्याने इंग्रजी राज्य स्थिर राहावे यासाठी विविध आधुनिक सुधारणा घेऊन आले. भारतात प्रचलित असलेल्या दुष्ट रुढी परंपरा यांनादेखील या राज्याने हादरवून सोडले. काही पर...

पांडुरंगाला राखी

Image
                           कथा           गोविंद नेहमीसारखा आनंदाने कार्यालयात शिरला. प्रत्यक्ष पांडुरंगांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे याचा त्याला फार आनंद झाला होता. तसे फार दिवस झाले नव्हते. नोकरी सुरू होऊन दोन तीनच महिने  झाले होते. पण पांडुरंग देवस्थानात नोकरी करायला मिळताना गोविंद थोडासा खट्टू झाला होता. गाभाऱ्याजवळ नोकरी असावी ही त्याची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे कामावर असताना 'सावळे सुंदर रूप मनोहर' असणाऱ्या विठ्ठलाचे सदोदित दर्शन घडत राहावे ही त्याची मनोमन इच्छा होती. पण हरकत नाही. देवाची सेवा तर घडतीय असं म्हणत त्यानं आपलं समाधान करून घेतलं होतं. कामावर आल्यानंतर आणि घरी परतताना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हा परिपाठ तो आचरू लागला.                               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        देवस्थानच्या कार्यालयात राहून पत्रव्यवहार...

कर्तव्यपूर्ती

Image
                                   कथा             दिवस मावळतीला चालला होता. हळूहळू अंधार वाढत चालला होता आपल्या कुटीमध्ये बसलेल्या मेधानंदाना आता दिवा लावावा याची जाणीव झाली. परंतु मन एका अनिर्वचनीय आनंदाने भरून गेले होते. आज आपल्या हातून कर्तव्याची पूर्ती झाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. यापूर्वी कधी न अनुभवलेले समाधान ते अनुभवीत होते. त्यामुळे अगदी निश्चल अवस्थेत ते बसून राहिले.                ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )      किती काळ गेला हे सांगता येत नव्हते. पण थोड्यावेळात कुटीच्या दरवाजात दिवा घेऊन वल्लरी आली. दिव्याच्या मंद तेजामध्ये तिचा चेहरा उजळला होता. दिवा घेऊन ती आतमध्ये प्रवेश करती झाली. याची जाणीवदेखील मेधानंद यांना झाली नाही. ती देखील अद्भुत दृश्य पहावे अशा भावनेने पाहू लागल. एकदम निश्चल बसलेल्या मेधानंद यांनी आपले नेत्र मिटले होते. प्रकाशाची जणू जादू होऊन ...

जीविका आणि उपजीविका

Image
         एखादी व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काम करते त्याला उपजीविका असे म्हणण्याची पद्धत आहे.  एकदा एकाने प्रश्न विचारला की , "ज्यावर आपला चरितार्थ चालतो त्याला त्या कामाला उपजीविका असे म्हटले जाते. तर जीविका कशाला म्हणायचे?" त्यावेळी एका जाणकाराने त्याला उत्तर दिले. उत्तरादाखल त्यांनी एक गोष्ट सांगितली. परीसाच्या शोधात भटकणाऱ्या एका माणसाची गोष्ट प्रसिद्ध आहे. एका सागर किनाऱ्यावर परिसाचा दगड सापडतो असे त्या माणसाला समजले म्हणून त्या माणसाने परिसाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या गळ्यात एक लोखंडी साखळी घातली. तो समुद्रकिनाऱ्यावर चालू लागला. किनाऱ्यावरील दगड घ्यायचा त्या दगडाने गळ्यातील साखळीला स्पर्श करायचा. जर साखळी सोन्याची झाली तर तो दगड परीस आहे असे सिद्ध होईल. त्या माणसाने या प्रकारे प्रत्येक दगड उचलून साखळीला लावायला सुरुवात केली. किनाऱ्यावरती मोजता येणार नाहीत इतके भरपूर दगड होते.  किनारा खूप लांबलचक होता. त्यामुळे हळूहळू त्या माणसाला हे काम दीर्घकाळ करावे लागेल याचा अंदाज आला. माणसाचा एक स्वभाव आहे. माणसाच्या अंगवळणी एखादी गोष...

मी जगत राहणार!

Image
                              ( कथा )     आशा काळोखे जिममध्ये शिरल्या. जिममध्ये गर्दी होती. त्यांनी  एक नजर सगळीकडे फिरवली. मग त्यांनी ट्रेडमिल असलेल्या बाजूकडे पहायलं. बहुतेक सगळ्या मशीनवर कोणीतरी व्यायाम करत होतं. पण एक मशीन मोकळं होतं. त्या सावकाश चालत मशीनपर्यंत पोचल्या. मशीनवर उभ्या राहिल्या आणि बटनं दाबून त्यांनी मशीन सुरू केलं आणि हळूहळू घालायला सुरुवात केली. आताशा फार ताठ उभं राहता येत नव्हतं. पण त्यांनी यावर एक उपाय अनुभवानं शोधून काढला होता. तो म्हणजे मशीनची वरची कड पक्की धरून ठेवायची. मशीनच्या हॅंडलला धरून उभं राहिलं की पाठीला बाक यायचा. मग त्यांनी हा उपाय शोधून काढला होता. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी ताठ उभं राहता यायचं आणि व्यायमही व्यवस्थित व्हायचा.                                             ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )         ...

विशाल हृदयाचे स्वामी विवेकानंद

Image
         "जोपर्यंत जगातील शेवटच्या व्यक्तिला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी कार्य करत राहीन."असा आपला निश्चय प्रकट करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे हृदय अतिशय विशाल होते जगामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान याविषयी त्यांच्या मनात अपार करुणाभाव होता. या सर्व गोष्टी संपून संपूर्ण प्राणीमात्र सुखी झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. "जगातील कट्टरतावाद, संकुचितपणा, धर्मांधता, सांप्रदायिकता यामुळे जगामध्ये वाहिले तेवढे रक्त पुष्कळ झाले. आता यापुढे यामुळे रक्तपात होणार नाही यासाठी सर्व धर्मपंथ संप्रदाय सत्य आहेत हे स्वीकारूया." ही प्राचीन वैदिक घोषणा यांनी पुन्हा एकदा उच्चारली आणि विश्वबंधुत्वाचे आवाहन केले. या बंधुत्वाने माणसाचे सहजीवन अर्थपूर्ण होऊ शकते याची त्यांना खात्री होती.                          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      स्वामीजींचे विचार हे जगाला सर्वकाळ मार्गदर्शक आहेत. आपल्या वाटते विचार व्यक्त करणारी स्वामीजी ही एक व्यक्ती आहे. परंतु स्वामीजींनी आपले गुरुबंधू रा...

बहादुरीचे काम करणारे भारताचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री

Image
  इतिहासात काळाचे असे अनेक क्षण येऊन गेले की ज्या क्षणी प्रश्न उपस्थित झाला की ही जबाबदारी कोण घेईल. त्या क्षणी जबाबदारी पार पाडायला कोणीतरी पुढे आले त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. ज्यांनी कर्तृत्वाने जबाबदारीला न्याय दिला त्यांचे गुणगान लोकांनी केले. ते इतिहासात नोंदले गेले. अशा कर्तृत्ववान लोकांच्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचे होय.                     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा विचार करताना हे निश्चितपणे लक्षात येते की स्वातंत्र्यानंतरची पहिली जवळपास पंधरा‌ वर्षे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या विचारांप्रमाणे भारताच्या आकारणीला दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अखेरच्या काळात विशेषतः १९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धानंतर 'नेहरूंनंतर कोण?' हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला. यात काही नावे पुढे आली. त्यात लालबहादूर ...