आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य
नाचविता ध्वज तुझा गुंतले शृखंलेत हात बद्ध करांनी तुज करिती अखेरचा प्रणिपात कवीवर्य कुसमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध 'गर्जा जयजयकार ' या कवितेतीतील या ओळी आद्यक्रांतिवीर ४ नोव्हेंबर १८४५ यादिवशी जन्मलेल्या आणि १७ फेब्रुवारी १८८३ यादिवशी मृत्यू पावलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनाला शब्दशः लागू पडतात. आपला अखेरचा श्वास भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एडन येथील कारागृहात घेताना त्यांनी भारतमातेला विनम्र भावाने प्रणाम केला ही गोष्ट अक्षरशः खरी आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) धूर्त इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी येऊन आपले बस्तान बसवले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्याचा घास घेतला. पारतंत्र्याच्या दीर्घ काळरात्रीची सुरुवात झाली. इंग्रजी राज्य आपल्यासोबत प्रामुख्याने इंग्रजी राज्य स्थिर राहावे यासाठी विविध आधुनिक सुधारणा घेऊन आले. भारतात प्रचलित असलेल्या दुष्ट रुढी परंपरा यांनादेखील या राज्याने हादरवून सोडले. काही पर...