पुरणपोळीचे जेवण
(कथा) "अगं, ऐकलंस का?" कमलाकरपंतांनी हाक मारली. "काय हो?" लक्ष्मीबाई उत्तरल्या. "अगं, उद्या रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक कर. आपल्याकडे पाच सहाजण जेवायला येणार आहेत." "करते. पण कोण आहेत मंडळी?" "आपलीच माणसं! विश्वनाथदादा, उमाबाई, आपल्या दोघांकडचे वकील आणि स्वतः न्यायाधीशसाहेब येणार आहेत." (कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने) कमलाकरपंतांचं हे बोलणे ऐकले आणि लक्ष्मीबाई एकदम गंभीर झाल्या. शांतच राहिल्या. कारणही तसेच होते. तसं म्हटलं तर कमलाकरपंत तालुक्याच्या या गावी परकेच होते. नशीब काढायचं म्हणून आपलं छोटं गाव सोडून बाहेर पडले. एकदोन ठिकाणी काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यातूनच विश्वनाथदादा यांच्याशी ओळख झाली आणि या गावात आले. त्यालाही आता जवळपास १५ वर्षे होत आली होती. इथं आले तेव्हाच कमलाकरपंतांनी आपला व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू केला हो...