Posts

Showing posts from June, 2025

उत्तराखंड सहलीतील अनुभव

Image
     हिमालय पर्वत आणि गंगा नदी गेली हजारो वर्ष भारतीय माणसाला भुरळ घालीत आहे. या दोन्हीचेही पावित्र्य मनामध्ये खोलवर झिरपले आहे. त्यामुळे हरिद्वार हृषिकेश येथे सहलीला जायचे असा विचार आला. या सहलीला जायचे निश्चित केले. दुसरी गोष्ट म्हणजे कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काही दिवस थंड हवेचे अनुभवता येतील या विचाराने मी , पत्नी सौ. शैलजा, साडू श्री जवाहर उपासे व सौ. शुभदा उपासे अशा चौघांनी बरोबर जाण्याचे निश्चित केले. १३ मे ते १९ मे अशी उत्तराखंडमध्ये सात दिवस आणि सहा रात्रींची ही सहल होती. गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या या सहलीमध्ये दिल्ली, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनीताल, मसुरी, हृषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणांचा समावेश होता. त्यामुळे काही नवीन ओळखी झाल्या.     या सहलीत विमानाचा प्रवास झाला तसा हृषिकेशमध्ये सहासीटर रिक्षाचाही प्रवास झाला. एसीबसने प्रवास झाला तशी वल्ह्याच्या होडीतून नैनीतालमधील तलावात फेरी झाली. हृषिकेशमध्ये मोटरबोटीतून गंगा नदी ओलांडली ते वेगळे . दिल्लीला कडक उन्हाळा अनुभवला तशी नैनिताल आणि मसुरी येथील अल्हाददायक थंडीदेखील अनुभवली. मैदानी प्रदेशात रखरखते ऊन हो...

पुस्तक परिचय 'मी कसा झालो?'

Image
     अंगभूत गुण आणि कर्तृत्व, योगायोग, मिळालेल्या संधी आणि त्या संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी केलेली धडपड अशा अनेक गुणांनी ज्यांचे आयुष्य विविधरंगी झाले अशी व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे. त्यांच्या गळ्यात सत्काराचे हार पडले तसे तुरुंगात जाण्याची वेळदेखील आली. स्तुतीसुमनांचा वर्षाव आणि शिव्याशापांचा भडिमार अशा दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे दंतकथा वाटाव्यात अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. या आयुष्याची वाटचाल कशी झाली याचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे 'मी कसा झालो?'.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         १३ ऑगस्ट १८९८ ते १३ जून १९६९ असे जवळपास सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्या आयुष्यतील १९५३ पर्यंत झालेली वाटचाल सांगणारे हे पुस्तक आहे. तोपर्यंत आचार्य अत्रे यांनी काव्य, विडंबन, शिक्षण, नाट्य, राजकारण , चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. अशा बहुपेडी आयुष्याची ओळख करुन देणारे अवघड काम या पुस्तकात सहजपणे पूर्ण झाले आहे.      माणस...

चौकटीबाहेरचे उपाय

Image
        माणसांना आयुष्यात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे उपाय योजावे लागतात. हे उपाय योजताना साधारणपणे बऱ्याचवेळा उत्स्फूर्तपणे जे‌ उपाय सुचतात किंवा ज्या भावना स्वाभाविकपणे निर्माण होतात त्यांच्या आधारावर सुचलेल्या गोष्टी अमलात आणल्या जातात. काहीवेळा आधी ऐकलेले , माहिती असलेले उपाय अमलात आणले जातात.    असे सर्व उपाय साधारणपणे ठराविक प्रकारचे असतात. संबंधित व्यक्ती आपल्याशी नातेसंबंध किंवा मैत्रीने निगडित असेल तर समजावून सांगणे, रागावणे, लहान वयाच्या मुले मुली असतील तर त्यांना फटके देणे किंवा शिक्षा करणे असे उपाय असतात. आर्थिक गरज असेल तर उसने मागणे, आपली गरज समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे अशा गोष्टी घडतात. संबंधित व्यक्ती विरोधक, शत्रू किंवा अपरिचित असेल तर शाब्दिक देवाणघेवाण, शिवीगाळ, मारामारी, प्रसंगी प्रभावी मध्यस्थ किंवा पोलिसांची मदत घेणे अशा गोष्टी होतात. आर्थिक विषय असेल तर बळजबरीने पैसे उकळणे, फसवणूक करणे अशा उपायांचा वापर होतो.       पण साधारणपणे असे सर्व उ...