Posts

निर्णय कोणता?

Image
                ( काल्पनिक कथा )       "आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच." लॅपटॉप बंद करताना निकिताच्या मनात विचार आला आणि तिच्या आयुष्यातील गेल्या दोन-तीन वर्षांचा प्रवास तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तरळू लागला.                   ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )       निकिता ही लहानपणापासूनच एक बऱ्यापैकी हुशार मुलगी होती. दिसायला देखील पाचपन्नास जणीत उठून दिसेल असे तिचे रूप होते.लहानपणापासूनच आपली हुशारी रूप यांचं कोडकौतुक ऐकत ती मोठी झाली होती. मोठी होताना आपलं शिक्षण पूर्ण करून ती नोकरीलादेखील लागली होती. तिची नोकरी चांगली होती.       आता सहाजिकच या टप्प्यावर लग्नासाठी मुलाची शोधाशोध सुरू झाली. सर्व उपवर मुलींच्या प्रमाणेच निकिताच्यादेखील आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा होत्या. चांगलं कमावणारा, घरदार व्यवस्थित असणारा, चांगल्या घराण्यातील मुलगा तर तिला हवा होताच. परंतु तिची एक सर्वात महत्त्वाची अपेक्षा होती ती म्हणजे मुलगा दिसायला देखणा...

भावनांचा बडेजाव कशाला?

Image
                ( काल्पनिक कथा )       निहारने आजूबाजूला नजर टाकली. विमानतळावर निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. अनेकजण आपले प्रियजन, नातेवाईक, स्नेही यांना निरोप देण्यासाठी आलेले होते. कुणी पर्यटनासाठी तर कुणी कामासाठी तर काही तरुण शिकण्यासाठी परदेशी निघालेले होते. जाणाऱ्या एका माणसाला निरोप द्यायला दोनतीन जणांपासून आठदहाजणांपर्यंत लोक आलेले दिसत होते. कुणाचे चेहरे वियोगाच्या दु:खाने मलूल झालेले होते तर काही चेहरे आनंदाने फुलले होते. जिकडेतिकडे भावभावनांचा मळा बहरलेला दिसत होता. या सगळ्या वातावरणात निहारला जणुकाही गुदमरल्यासारखं होत होतं.              ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )          निहारचे वडील शास्त्रज्ञ होते तर आई डॉक्टर होती. लहानपणापासूनच आई-बाबांनी निहारला भावनेपेक्षा आवश्यकतेवर भर द्यायला वारंवार सांगितले होते. आयुष्यातील सगळे निर्णय हे तर्काच्या कसोटीवर घासून घेण्याची शिकवण त्याला लहानपणापासूनच मिळाली होती. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्...

पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत घेण्याचा अनुभव

Image
        "तुम्ही नेहमी मुलाखती घेता का?" ५/१०/२५ यादिवशी एका व्यक्तीने मला विचारले. निमित्त होते जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगर यांच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे. २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री चैत्रामजी पवार यांच्या हस्ते स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये नुकतेच झाले. यावेळी त्यांची मुलाखत मी घेतली.मी घेतलेली ही तिसरी मुलाखत. ही मुलाखत संपल्यानंतर श्रोत्यांपैकी एका व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा मला आनंद झाला. साधारणपणे भाषणे करणाऱ्या माणसाला मुलाखत घ्यायला सांगितले म्हणजे मुलाखत घेणारा जास्त बोलेल अशी शक्यता असते. परंतु कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते श्री. विनायक खाडे यांनी आग्रहपूर्वक हे काम मला सांगितले. कार्यक्रमानंतर बऱ्याच जणांनी मुलाखत घेण्याची पद्धत आवडल्याचे आवर्जून सांगितले. त्यावरून मी श्री खाडे यांना अडचणीत आणले नाही असे म्हणता येईल.       या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वैयक्तिक संस्मरणीय योग आला. सन १९८८ ते १९९० अशी दोन वर्षे मी इयत्ता अकरावी ब...

परदेशप्रवास आणि शाकाहार

Image
     भारतामध्ये शाकाहाराला काही समाजवर्गांमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे भारतात सर्वत्र शाकाहारी अन्न सहजपणाने मिळते. विशेष अडचण येत नाही. परंतु अशा शाकाहारी व्यक्तींना ज्यावेळी परदेशी जाण्याची वेळ येते त्यावेळी मात्र अडचण होते. कारण परदेशात प्रामुख्याने मांसाहाराचा समावेश अन्नामध्ये होतो. याबाबत दोन ऐतिहासिक व्यक्तींचे अनुभव सांगणारा हा लेख आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       महात्मा गांधी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. ते निवारण्यासाठी परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणे हा पर्याय पुढे आला. तो पर्याय सगळ्यात जास्त योग्य वाटत होता. परंतु महात्मा गांधींच्या आई पुतळीबाई यांना आपल्या मुलाने परदेशी जाऊ नये असे वाटत होते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी गेल्यावर आपल्या मुलाचे राहणीमान बदलून जाईल. आपल्या कुटुंबाच्या परंपरेला धरून ते राहणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे महात्मा गांधी यांनी परदेशी जाण्यापूर्वी आपल्या आईला वचन दिले ते म्हणजे, " परदेशी मी मांसाहार...

संघाचे प्रचारक

Image
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण होत असताना संघाबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. तसे कुतूहलदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. संघाचे काम चालते कसे त्याचा विस्तार कसा होतो गेला याबाबत देखील बऱ्याच जणांना माहिती हवी असते. संघ कामाच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी संघाची असलेली प्रचारक यंत्रणा हा एक महत्त्वाचा घटक आहे.              ( पुस्तकाचे मुखपृष्ठ )         भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये हजारो वर्षापासून संन्यासी वर्गाचा उदय झालेला  बघायला मिळतो. लौकिक जीवनापासून दूर राहून परमेश्वर प्राप्तीसाठी निरंतर साधनारत असणारे अगणित साधू,संन्यासी होऊन गेले. असेच जीवन जगणारे अनेकजण आजही आहेत. या परंपरेचा धागा काही अंशाने संघाच्या प्रचारक व्यवस्थेत बघायला मिळतो. आपले कुटुंब, लौकिक आकांक्षा यांचा त्याग करून संघाच्या योजनेनुसार सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीचे पूर्ण वेळ काम करणाऱ्या  संघाच्या स्वयंसेवकांना 'प्रचारक' असे म्हणतात. यातील बरेच जण काही वर्षे 'प्रचारक' म्हणून संघकाम करतात आणि नंतर आपापल्या व्यावहारिक गरज...

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी

Image
       मध्यंतरी एक घरगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पदार्थ कसे झाले आहेत हे आधी चाखून बघायचे होते. ते करत असताना एक माझा फोटो काढला गेला. तो बघताना मनात विचार आला की कोणकोणते पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्याच्या आठवणी आहेत. तर वेगवेगळे पदार्थ आणि ते खाण्याचे प्रसंग आठवत गेले. त्यातील हे काही मोजके प्रसंग.       ( छायाचित्रकार कु.शंतनू गाडे )          मी त्यावेळी इयत्ता नववीमध्ये शिकत होतो. आमच्या साखरवाडीमधील शाखेची सहल पुण्यात काढली होती. त्या सहलीचे नियोजन त्यावेळचे फलटण तालुका प्रचारक श्री. मिलिंदराव फडके आणि साखरवाडीमधील संघाचे कार्यकर्ते श्री. संजयकाका वाळिंबे यांनी या सहलीचे नियोजन केले होते. वर्ष बहुतेक १९८७ असावे. पुण्यात लालमहाल, शनिवारवाडा, पर्वती, सिंहगड किल्ला अशा काही ठिकाणांना भेट दिल्याचे आठवते. याच पुण्याच्या सहलीत पहिल्यांदा पाणीपुरी हा प्रकार खाल्ल्याचे आठवते. तोपर्यंत साखरवाडीमध्ये कधी पाणीपुरी खाल्ल्याचे आठवत नाही. एका घासात मोठ्ठा आ करून ती एक पाणीपुरी खायची. पहिली खाऊन व्हायच्या आत पाणीपुरीवाल्याची पुढची ...

समुद्रावर स्वारी

Image
     'अनंत अमुचि ध्येयासक्ती किनारा, तुला पामराला' अशी ओळ कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत लिहिली आहे. त्यात कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की माणसाची ध्येयासक्ती इतकी मोठी आहे की समुद्राचा अफाट विस्तार तिला रोखू शकत नाही. समुद्र जरी विस्तीर्ण असला तरी देखील त्याला किनारा आहे. पण माणसाच्या इच्छाशक्तीला किनारा नाही. समुद्रावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन वेगवेगळ्या राजांची माहिती यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      यातील पहिले राजे म्हणजे प्रभू श्री राम! रावणाने कपट करून सीतामाईचे हरण केले. सुग्रीवाच्या मदतीने, हनुमंतांची योजना झाली . त्यातून सीतामाई लंकेत आहे हे समजले. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. श्रीराम , लक्ष्मण यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या संख्येने वानर सैन्य चालू लागले. शेवटी ते समुद्र किनाऱ्यावर पोचले. लंका हे समुद्रातील बेट असल्यामुळे समुद्राने वाट दिली तर पुढे जाता येणार होते. श्रीरामांनी तीन दिवस समुद्राची विनवण केली. परंतु समुद...