Posts

महामानवाची करूणा

Image
         'सर्वांभूती ईश्वराचा अंश आहे' असं सांगणाऱ्या संस्कृतीनेच माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारले हा केवढा मोठा विरोधाभास! हा विरोधाभास दुःखद, अन्यायकारक आणि संतापजनकही आहे. परंतु चालत आलेल्या रुढीला मोडता कसा घालायचा म्हणून हा अन्याय सहन करणाऱ्यांनी देखील तो जवळपास निमुटपणे सहन केला. केवळ आर्जवं केली. संत चोखामेळा यांच्या अभंगात 'उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही याती हीन' अशा प्रकारची हतबलता केवळ व्यक्त केली. परंतु या अन्यायकारक परिस्थिती विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज म्हणून तर अपमानित जिणं पिढ्यानुपिढ्या वाट्याला आलं होतंच. परंतु बाबासाहेब दहा वर्षांचे असताना साताऱ्याहून कोरेगावला वडिलांना भेटायला जाताना जो शून्य माणुसकीचा अनुभव त्यांना आला त्याने त्यांचा अंगभूत स्वाभिमान खडबडून चेतवला. रूढींच्या जुलमी साखळदंडांनी पाय जखडलेले असतानादेखील                                                      ...

सामाजिक समरसतेसाठी आचरणात आणण्याच्या गोष्टी

Image
          कै. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा' या गीतामध्ये उल्लेख असा आहे की: 'घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री.' मी विचार करत होतो की वैयक्तिक आयुष्यात तर कमी-अधिक प्रमाणात काही चुका आपल्या हातून घडतात,  कोणाच्या हातून पाप देखील घडतं. पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलंय का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेलं आहे. आणि ते एक-दोन दिवस नाही, एक-दोन वर्ष नाही, १००-२०० वर्ष नाही, जवळपास हजार-दोन हजार वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो. कोणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावर, विद्वानांच्यावर सोडून देऊयात. परंतु हो, आम्ही हे पाप केलंय हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया. ते पाप असं केलंय की 'आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं'. दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं.                  ( छायाचित्र कृत्रिम बुद्...

छ. शिवराय: ध्येयरूप जीवन

Image
           छ. शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल किती बोलावे आणि किती लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांचे जीवन उत्तुंग होते. ध्येयाशी एकरूप झालेले त्यांचे व्यक्तिमत्व भूतलावर होऊन गेले. अत्याचारी धर्मांध परकीय सत्ता उलथवून टाकून कल्याणकारी हिंदवी स्वराज्य उभारण्याचे ध्येय शपथरूपाने अगदी बालवयातच शिवरायांनी आपलेसे केले होते. त्यांच्या जीवनातील सर्व योजना, कष्ट , पराक्रम , त्याग या ध्येयासाठीच होता. त्यामुळे हे जीवन ध्येयरूप होते असे म्हणता येते. याचे एक उदाहरण पाहूयात.                      ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मुघलशाही,  गोवळकोंडाची कुतुबशाही, धूर्त व्यापारी इंग्रज, धर्मांध राजवट चालवणारे पोर्तुगीज या सगळ्यांच्या विरोधात महाराजांनी आपली समशेर उपसली.  देदीप्यमान यश मिळवले. परंतु जंजिऱ्याचा सिद्दी मात्र आपल्या अजिंक्य जंजिऱ्याच्या पाठबळावर आणि धूर्त तडजोडींमुळे महाराजांना जिंकता आला नाही. नेस्तनाबूत करता आला नाही. महाराजांची अनेक प्रयत्न ...

उत्सवाची परंपरा पुढच्या पिढीकडे

Image
           आपल्या प्राचीन देशामध्ये सण, उत्सव यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. यात वेगवेगळ्या टप्प्यांवर नवनवीन उत्सवांंची भर पडत गेली आहे. उत्सव सुरू होण्याच्या पाठीमागे धार्मिक , खगोलीय किंवा पर्यावरणीय कारणे आहे हे लक्षात येते. यातील बरेचसे उत्सव हे समाज एकत्र येऊन सुरू होतात. काही उत्सव एखाद्या व्यक्तिच्या पुढाकाराने सुरू होतात. असे सुरू झालेले पुढे कसे चालत राहतात हे समजून घेणे उद्बोधक वाटते.   (भाटे कुटुंबातील उत्सवातील छायाचित्र सौजन्य डॉ. मानसी भाटे)         श्री. नारायण उर्फ उल्हास भिकाजी भाटेकाका पुण्यात पेरुगेटजवळ राहायचे. १९८६ मध्ये ते सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर इथं राहायला गेले. भाटेकाकांनी एसकेएफ या कंपनीत अनेक वर्षे नोकरी केली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त आहेत. त्या भक्तितून घरात दर बुधवारी सत्संग सुरू केला. हळूहळू या सत्संगाला भक्तांची गर्दी वाढत गेली. भाटेकाकांनी याला जोड दिली ती स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाच्या उत्सवाची. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस हा स्वामीं...

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

Image
         "सुधीर, यात दोष कुणाचा? मुलीचा ? पालकांचा? शिक्षकांचा? की समाजाचा?" विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासराव लपालकर यांनी मला विचारले आणि मी विचारात पडलो. प्रसंग २०१२ किंवा २०१३ मधला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक मोठा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यासाठी निवडलेल्या कला मंडळाच्या मुलीला स्वामी विवेकानंद यांचे उद्गार, "माझ्या अमेरिकन भगिनींनो आणि बंधुंनो." एवढेच माहीत होते. हे सांगितल्यावर विश्वासरावांनी मला हा प्रश्न विचारला होता. प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन २०१३ या स्वामीजींच्या १५० व्या जयंतीवर्षांत पुण्यात इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने चरित्र कथनाचे जवळपास ५० कार्यक्रम आणि पथनाट्याचे जवळपास ३० कार्यक्रम आम्ही केले. या कार्यक्रमांचा आनंद आणि समाधान त्यात सहभागी झालेल्या आम्हा सर्वांना वाटले.               ( वसतिगृहातील विद्यार्थी कार्यक्रम सादर करताना )            स्वामीजींचे चरित्र...

शिवनेरीवरील माझा भाग्ययोग

Image
         उत्सव बहु थोर झाला, भाग्ययोग अनुभवला "सुधीरजी, यावर्षी शिवनेरीवर तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला वक्ते म्हणून येणार ना?" काही दिवसांपूर्वीच आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा फोन आला. गेल्या वर्षीही त्यांनी निमंत्रण दिले होते पण काही अडचणींमुळे मला जायला जमले नव्हते. पण यावर्षी मात्र तो योग आला.      श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे यांच्या वतीने गेल्या ४६ वर्षांपासून फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्याकाळी शिवजयंतीची तिथी वैशाख शुद्ध द्वितीया जास्त प्रचलित होती. पण त्यावेळी नव्याने उजेडात आलेल्या पराव्यांनुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी मान्य झाली. ह्या उत्सवाची परंपरा सुरू झाली. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणाऱ्या अनेक महनीय व्यक्ती या उत्सवासाठी येऊन गेल्या आहेत. यावर्षी हा भाग्ययोग मला अनुवयला मिळाला. ग्राहक चळवळीचे पहिल्या पिढीतील कार्यकर्ते कै.बिंदुमाधव जोशी आणि कै. शाहीर हिंगे यांनी या उत्सवाची सुरुवात आपल्या सहकाऱ्यांसह केली होती. हीच परंपरा आजही जपली गेली आहे.         शाह...

छ. शिवराय : सागरी दुर्ग आणि सलगी देणे

Image
      छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत. या द्रष्ट्या महापुरुषाने परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला आणि भविष्याचा वेध घेऊन भूतकाळातील चुका, त्रुटी दुरुस्त करण्यासाठी परिश्रम केले. शिवरायांच्या पूर्वी ३०० वर्षे महाराष्ट्रात धर्मांध आक्रमकांची सत्ता होती. या धर्मांध आक्रमकांनी भूमीवर जम बसवला पण सागरी सत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले. भारताचा विचार केला तर मध्ययुगीन काळात क्रूर मोगली सत्तेचे वर्चस्व भारताच्या मोठ्या भूभागावर राहिले. परंतु त्यांनीदेखील सागरी सत्ता उभारण्याचा प्रयत्न केला नाही. इतके दुर्लक्ष केले की मोगली बादशाहाला देखील मक्केला जाण्यासाठी युरोपियनांचा परवाना लागे. महाराजांची दूरदृष्टी अशी की त्यांनी सागरी सत्ता उभारण्याची कल्पना मनामध्ये घेऊन त्याप्रमाणे पावले उचलली.                          ( सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिरातील छ. शिवराय )                    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        सागरी सत्तेचा एक ...