Posts

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

Image
      मार्च १९८८ मध्ये मी १० वीची परीक्षा दिली. त्याचा निकाल जून १९८८ मध्ये बहुतेक १४ जूनला लागला. आता पुढे कुठे प्रवेश घ्यायचा याची चर्चा सुरू झाली. पुण्यात स.प.महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असे ठरले. पण यात दोन तीन दिवस गेले. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश मिळाला नाही. पुण्यात तेव्हा ११ वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये अर्ज केला आणि स.प. महाविद्यालयात प्रवेश मिळाला.      वसतिगृहात राहायचे होते. तिथेही प्रवेश मिळाला. मग निघण्याची तयारी सुरू झाली. मला वसतिगृहावर सोडायला काका श्री बाळासाहेब गाडे आले होते. मला खोली क्रमांक १३ देण्यात आली. पहिल्या दिवशी काकादेखील मुक्कामी राहिले. ते दुसऱ्या दिवशी गेले. बहुतेक त्याच दिवशी थोड्या वेळाने बारावीत असलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने खोलीचे दार वाजवले. त्याने विचारले, " तुझं नाव काय? तुला १० वीला किती टक्के मिळालेत?" "सुधीर गाडे. ८६%" मी उत्तर दिले. " हा माझ्या करमाळा गावचा वीरेंद्र घोगरे. यालाही ८६% मिळालेत. तुम्ही एकत्र राहा. तुमचं जमेल!"  या १२ वीतल्या मुलाचं नाव कळालं, "वैभव...

तंट्यामामा भिल्ल यांचे जीवन व कार्य

Image
     कोणत्याही सामान्य माणसाची इच्छा, ' आयुष्य साधे, सरळ थोड्याफार सुखात जावे' हीच असते. परंतु ज्या वेळेला परिस्थिती बिकट होते त्यावेळेला. हाच माणूस वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. कुणी लाचार होऊन परिस्थितीला शरण जातो. तर कोणी त्या परिस्थितीत स्वतःपुरता संघर्ष करून सुखी होतो. पण काहीजण परिस्थितीशी संघर्ष करून परिस्थिती बदलण्यासाठी धडपडतात. अशाच माणसांमध्ये तंट्यामामा भिल्ल यांचा समावेश केला पाहिजे.                        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )    १८४२ ते १८८९ असे ४७ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. या काळात भारतावर इंग्रजांची सत्ता होती. सत्ता गाजवणारे इंग्रज तसे मूठभरच होते. परंतु दुर्दैवाने आपल्याच भारतीय लोकांनी त्यांना साथ दिली आणि इतर भारतीयांच्या होणाऱ्या शोषणात सहभाग घेतला. आजच्या मध्य प्रदेशातील 'निमाड' या वनक्षेत्रात याच प्रकारची परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या प्रथा परंपरा , गरिबांचे शोषण करणारे इंग्रज सरकार आणि या शोषणात इंग्रजांना साथ देणारे भारतीय सावकार, पोलीसातील भा...

महायोगी श्री अरविंद

Image
          महान विभूती स्वतःच्या जीवनाला स्वकर्तृत्वाने आकार देऊन जगात भर घालतात की त्यांचे जीवन हे एका व्यापक योजनेचा निश्चित भाग असतो हा एक प्रश्न आहे. महायोगी श्री अरविंद यांच्या जीवनचरित्रावरून गोष्टी योजल्याप्रमाणे घडतात असे म्हणावे लागते. त्यांच्या जीवनातील २४ नोव्हेंबर १९२६ या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी परमेश्वर संदेशाचे दिव्य अवतरण झाले अशी श्रद्धा आहे. हा दिवस 'सिद्धी दिन' म्हणून अरविंद आश्रमाच्या वतीने साजरा केला जातो.                   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      १५ ऑगस्ट १८७२ ते ५ डिसेंबर १९५० असे ७८ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले श्री अरविंद यांचे जीवन म्हणजे विधात्याच्या योजनेनुसार वळत गेलेला पुण्यप्रद जीवनप्रवाह आहे. त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष यांनी जाणीवपूर्वक अरविंद आणि त्यांच्या भावडांना भारतीय सनातन धर्म, संस्कृती, विचार यांच्याशी कोणताही संपर्क येऊ नये म्हणून इंग्लंडमध्ये रेव्हरंड यांच्या घरी ठेवले तरीही अरविंद अंत:करणात देशभक्ती उफाळून आली कारण 'झरा मूळ...

जिवाभावाचे असावे कोणीतरी

Image
     माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे. त्यामुळे समूहाने राहणे ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. आपला जन्म ,बालपण, नोकरी व्यवसाय या सगळ्या टप्प्यांतून आपले नातेसंबंध निर्माण होतात. यातील नाती ही रक्ताची असतात तर संबंध हे वेगवेगळ्या निमित्ताने येतात. परंतु या नात्यांपैकी किंवा संबंधांपैकी काही जणांची माणसाशी कळत नकळत जवळीक निर्माण होते आणि त्यातून जीवाभावाचे मैत्र तयार होते. वेळ प्रसंगाला, अडीअडचणीला हे मैत्र , ही नाती उपयोगी पडतात. पण काही वेळा परिस्थिती अशी येते किंवा निर्माण होते त्यावेळी असे जिवाभावाचे कोणी नाही याची खंत वाटते. त्याचा स्वाभाविक परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. तणावातून , निराशेतून काही दु:खदायक प्रसंग देखील घडतत.‌ अशा परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग काढला पाहिजे. याबाबतीतले माझे दोन अनुभव सांगावेसे वाटले म्हणून लिहिले आहेत.                 ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )         साधारण सहा-सात वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा योग आला. नोकरी निमित्ताने अन्य राज्यातील हा...

सहज, सोपं बोलणे लिहिणे

Image
        "जीवनातील व्यामिश्रतेचे व्यापक परिप्रेक्षातून अवलोकन केले तर परस्परसंबंधांची जटिलता अनिवार्य पद्धतीने समाजाच्या आंतरप्रवाहांवर अपरिवर्तनीय परिणाम करते आहे." हे वाक्य मी गंमत म्हणून सांगितल्यावर सोबतचे म्हणाले, "गाडे सर, याचा नेमका अर्थ काय?" संवादामध्ये सोपपणा असायला हवा ह्याबद्दल चर्चा सुरू होती.  त्या दरम्यान हा संवाद झाला.                        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       साधारणपणे सहज समजेल असे बोलणे सोपे असते अशी समजूत आहे. पण सहज सोपे बोलणे ही बघायला गेली तर अवघड गोष्ट आहे.‌ त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते. ते असेल तरच सोपेपणा शक्य होतो. काहीवेळा हा माणसाचा अंगभूत गुणदेखील असतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे उदाहरण याबाबत आदर्श आहे. रुढार्थाने न शिकलेल्या बहिणाबाईंना आयुष्याची विलक्षण समज होती. त्या शहाणपणातून त्यांच्या काव्यरचना सोप्या परंतु अर्थपूर्ण झाल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी ये...

मन झाले नितळ

Image
               ( काल्पनिक कथा )        ( मन झाले मोकळे या कथेचा पुढचा भाग. आधीची कथा कॉमेंटमधील दुव्यावर )         उद्यानातून परतल्यावर राजे विक्रमगुप्त निश्चयपूर्वक कामाला लागले. आपल्याकडे दिवस अतिशय थोडे राहिले आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणून कोणत्या क्रमाने गोष्टी करायच्या याचा विचार त्यांनी उद्यानात असतानाच करून ठेवला होता. परंतु या सर्व गोष्टी करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्या कराव्या लागणार होत्या कारण त्यांच्या बोलण्यातून अथवा कृतीतून येणाऱ्या प्रसंगाची कोणालाही कल्पना येऊ द्यायची नव्हती.          ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )      उद्यानातून परतलेले राजे विक्रमगुप्त जवळपास आधीसारखेच वागत आहेत हे राणी शीलवती यांच्या लक्षात आले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. गेले आठवडाभर त्यांच्याही जीवात जीव नव्हता. राजेसाहेबांच्या अस्वस्थतेमुळे त्यादेखील बेचैन झाल्या होत्या. मनात नाही नाही त्या शंका उपस्थित झाल्या होत्या. सगळ्यात मोठे दुःख राजेसाहेब ...

मन झाले मोकळे

Image
                   ( काल्पनिक कथा )     "आता काय करावे ?" राजे विक्रमगुप्त स्वतःशीच उद्गारले? आजूबाजूला कोणीही दासदासी उपस्थित नव्हते. राजांनीच तशी आज्ञा दिली होती एकांत हवा होता म्हणून. राजेसाहेब आपल्या कक्षात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांच्यासमोरची समस्या गंभीर होती.               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        अगदी आठ दिवसांपूर्वीच घडलेला प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. पुन्हा पुन्हा या प्रसंगाचे त्यानना स्मरण होत होते. राजे विक्रमगुप्त आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शिकारीसाठी राजधानी बाहेर पडून जंगलात गेले होते. यावेळी जरा वेगळी वाट त्यांनी निवडली. शिकारीचा आनंद घेताना महाराजांना विलक्षण स्फुरण चढत असे. अशा अनेक शिकारी त्यांनी आजपर्यंत केल्या होत्या. रस्ता नेहमीपेक्षा वेगळा होता. वाटेवरती एका सत्पुरुषांचा आश्रम असल्याची वार्ता महाराजांच्या अग्रदूताने त्यांच्याकडे पोचवली. या सत्पुरुषाच्या दर्शनाला जावे असे राजांच्या मनात आल...