Posts

संवादातील सहजपणा

Image
     माणसाचा अभिमान ही तशी स्वाभाविक म्हणावी अशी गोष्ट आहे. याचे कारण प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. एका अर्थाने प्रत्येक जण हा 'एकमेवाद्वितीय' असतो. यामुळेच की काय स्वतःच्या दिसण्याचा, ज्ञानाचा, संपत्तीचा, पदाचा, सत्तेचा अभिमान माणसांमध्ये सहजपणे तयार होतो.  हा तयार झालेला अभिमान कळत नकळत अहंकारामध्ये रूपांतरित होतो. जवळ असलेल्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतरांच्यापेक्षा आपण कोणीतरी खूप वेगळे आहोत अशी भावना माणसांच्या मनात निर्माण होते आणि त्यातून स्वतःच्या वरचढपणाचा अहंकार तयार होतो. असा वरचढपणा अंगात भिनला की मग काहीजणांना सर्वांशी बरोबरीच्या भूमिकेतून संवाद करणे शक्य होत नाही. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे संवाद ऐकू येतात. या संवादातून बहुदा बरेच जळ स्वतःचा वेगळेपणा ठसवत असतात किंवा ठसवण्याचा प्रयत्न करत असतो.     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      याला अपवाद असणारी मोठी माणसे आपला मोठेपणा सहजपणे विसरून इतरांच्यामध्ये मिसळून जातात. काही वर्षांपूर्वी एआरडीइ या संरक्षण खात्याच्या संशोधन संस्थेतून संचालक म्हणून निवृत्त झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. काशिनाथ देवधर या

विश्वबंधुत्व दिन

Image
     ११ सप्टेंबर १८९३ या दिनांकाने इतिहासात आपली नोंद अजरामर करून ठेवली आहे. याच दिवशी अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेल्या , "अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो!" या शब्दांनी उपस्थित हजारो श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडली गेली, नसानसातून विद्युत संचार झाला, मनाची स्पंदने जुळली. या परिषदेच्या एक दिवस आधी आगगाडीच्या डब्यामध्ये अनामिकपणे रात्र घालवलेल्या स्वामीजींवर जणू प्रसिद्धीचा प्रखर झोत पडला. स्वामीजींच्या या शब्दांचा प्रभाव इतका का पडला? याचे कारण स्वामीजींचे शब्द हे मनापासून उच्चारलेले होते. जे पोटामध्ये होते तेच ओठांवर आले.‌ स्वामीजींनी अन्य एके ठिकाणी म्हटले आहे, " शब्दांचा प्रभाव हा एक तृतीयांश असतो तर व्यक्तिमत्त्वचा प्रभाव दोन तृतीयांश असतो. " स्वामीजी उदार, व्यापक व्यक्तिमत्त्व असल्यानेच शब्दांचा हा विलक्षण प्रभाव पडला. ( जागतिक सर्वधर्मपरिषदेचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         स्वामी विवेकानंद यांच्या या छोट्याशा भाषणात साधारणपणे पाच मुद्दे होते. पहिला म्हणजे स्वागताबद्दल कृतज्ञता आण

स्त्री सन्मान राखण्यासाठी

Image
        गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात विविध ठिकाणी घडलेल्या मुली महिला यांच्यावरील अत्याचारांच्या बातम्या सातत्याने वाचायला मिळत आहेत. या बातम्या वाचून दुःख होते. वेदना होतात. सात्विक संतापदेखील उत्पन्न होतो. या बातम्यांमध्ये पश्चिम बंगालमधील डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याची बातमी किंवा बदलापूर येथील शाळेतील अगदी लहान वयातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची बातमी केरळमध्ये चित्रपटसृष्टीत महिलांचे पद्धतशीरपणे लैंगिक शोषण करण्याची यंत्रणा चालते असे निरीक्षण नोंदवणारा न्यायमूर्ती के. हेमा यांचा अहवाल अशा अनेक बातम्या आहेत.     ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        अशा घटना घडल्या की काही प्रमाणात त्या झाकून ठेवण्याकडे कल असतो. कारण साधारणपणे आपल्याकडे अत्याचार करणाऱ्या पुरुषांपेक्षा जिच्यावर अत्याचार झाला आहे अशा स्त्रीची जास्त बदनामी झाली असे मानले जाते. तिला पुढील आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही सर्वेक्षणात तर जवळच्या नात्यातील पुरुषांनीच अत्याचार केला दिसून आले आहे. अशा घटनांमध्ये तर व्यक्त होणे, तक्रार करणे हा जणू अपराध मानला जातो

विजयाचा क्षण

Image
     काही दिवसांपूर्वीच पॅरिस येथे ऑलिंपिकच्या स्पर्धा पार पडल्या. दर चार वर्षांनी हा खेळांचा जागतिक महाकुंभ भरत असतो. यामध्ये अनेक खेळ खेळले जातात. अनेक घटना घडत असतात. काही जण विजयी होतात तर काहीजण पराभूत होतात. यानिमित्ताने काही विचार डोक्यात आले.        ( छायाचित्र यूट्यूबरून साभार )        बऱ्याच वर्षांनी मी टेनिसचा सामना बघत होतो. नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेज यांच्यातील सामना अतिशय चुरशीने चालू होता. दोघांनाही एकमेकांची सर्विस काही भेदता आली नाही. त्यामुळे प्रत्येक सेट हा टायब्रेकरमध्ये गेला. जोकोविचला अल्कारेज याने हैराण करून सोडले होते. आता जोकोविचची सर्व्हिस भेदली जाईल असे वाटता वाटता जोकोविचने नाही बाजी पलटवली आणि गुण मिळवला. असे बऱ्याच वेळा होत होते. शेवटी नवागत तारुण्याचा उर्जेवर अनुभवी विजेत्याने मात केली आणि हा सामना जोकोविचने जिंकला. सामना जिंकल्यानंतर लगेचच तो आपल्या जागेवर जाऊन बसला आणि त्याला रडू फुटले. आपल्या डोक्यावर टॉवेल घेऊन त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली. आत्तापर्यंत जोकोविचने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सुरुवातीच्या काळात होणारी चेष्टा मागे पड

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर काही जीवन प्रसंग

Image
     पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या व्यक्तिच्या जीवनाला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला असतो. पारलौकिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणाऱ्या अशा व्यक्तिंनाही व्यावहारिक पातळीवर बरे वाईट अनुभव येत असतात. अशा वेळी आपल्या दिव्यत्वाची कास न सोडता अशा प्रसंगांना त्या सामोरे जात असतात. अहिल्याबाई यांच्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडले.       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          अहिल्याबाई यांचे पती खंडेराव यांचे ऐन तारुण्यात निधन झाले. कर्तबगार सासरे मल्हारराव होळकर यांचेही काही वर्षांनंतर निधन झाले. पेशव्यांनी अल्पवयीन मुलगा मालेराव याला जहागिरीचा वारसदार नेमले. तोही अकाली मरण पावला. सर्व राज्य कारभार अहिल्याबाई बघत होत्या. लष्करी आघाडी सांभाळण्यासाठी नातेवाईक तुकोजी होळकर यांना सेनापती म्हणून नेमले. होळकर आणि शिंदे मिळून उत्तर भारताचे राजकारण चालवत होते. तुकोजी यांनी लष्करी आघाडी सांभाळायची आणि अहिल्याबाई यांनी प्रशासन अशी योजना होती. पण हळूहळू तुकोजी अहिल्याबाई यांना पुरेसा मान देईनासे झाले. सहकार्य करनेसा झू. मोहिमेचा खर्च , त्यातून मिळालेले उत्पन्न याची माहिती देईनात. मिळाले

सर्वांगीण विचार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

Image
     १३ ऑगस्ट हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा स्मृतिदिन. या महान विभूतीबद्दल जसजशी अधिक माहिती होत जाते. तसतसे आपण अधिकच भारावून जातो. सर्वांगीण विचार करणाऱ्या अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे हे काही प्रसंग.  ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         मध्ययुगीन काळामध्ये जंगल भागात असणारा दरोडेखोरांचा वावर आणि त्यांच्याकडून होणारी लूट हे प्रकार साधारणपणे नित्याचेच म्हणता येतील. इंदूरजवळच्या जंगलात दरोडेखोरांनी एका वाटसरूला पकडले. त्याच्याकडची चीजवस्तू लुटून घेतली आणि त्याला झाडाला बांधून ते पळून जाऊ लागले. दरोडेखोर आपल्याला बांधून पळून जाताहेत हे पाहताच त्या वाटसरूने सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाचा प्रभाव पडून दरोडेखोर माघारी आले. त्यांनी त्याला सोडवले आणि विचारले की, " तू कुठे चालला आहे?" तर त्याने सांगितले की, " मी अहिल्याबाई होळकर यांना भेटायला चाललो आहे." हे ऐकताच येताच दरोडेखोर चपापले आणि त्या प्रवाशाला सोबत घेऊन ते मातोश्री अहिल्याबाई यांच्या भेटीला आले. अहिल्याबाई यांनी या वाटसरूची ओळख करून घेतली. त्याने सांगितले

वैयक्तिक दुःखाचे हलाहल पचवून समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

Image
     नुकताच श्रावण मास सुरू झाला आहे. हिंदू समाजात हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. अनेक व्रत वैकल्ये या महिन्यात केली जातात. भगवान शंकर यांची विशेष आराधना या महिन्यातील सोमवारी केली जाते. या भगवान शंकरांची ज्यांनी निस्सीम आराधना केली अशा १८ व्या शतकातील कर्तृत्ववान महान महिला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर! त्यांचे चरित्र ऐकत असताना मला भगवान शंकरांच्या नीळकंठ या विशेषणाची आठवण झाली. भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे हलाहल प्राशन करून जगाचे कल्याण केले त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यात अहिल्याबाईंना देखील दुःखाचे हलाहल प्राशन करावे लागले.    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         महाराष्ट्रातील चौंडी या गावी जन्मलेल्या अहिल्याबाई यांचे तेज थोरले बाजीराव पेशवे यांचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या नजरेत भरले. आपला मुलगा खंडेराव याच्याशी त्यांनी अहिल्याबाई यांचा विवाह लावून दिला. आपल्या अंगभूत गुणांमुळे महत्त्वाचे अहिल्याबाई विवाहानंतर आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या आणि पुढची अनेक दशके होळकरांच्या जहागिरीचा कारभार समर्थपणे पाहणाऱ्या अहिल्याबाईंनी