Posts

गुजरात सहल

Image
        कोविडच्या वर्षी २०२० मध्ये आमचा मुलगा चि.शंतनू दहावीला होता. त्याची परीक्षा झाली की कुठेतरी सहलीला जायचे असं ठरवलं होतं. पण कोविडमुळे त्यावर्षी जमलं नाही आणि पुढची दोन वर्षे जमलं नाही. पण मग हा योग नोव्हेंबर २०२३ मध्ये आला. त्यावर्षी सहलीला जायचं यावर चर्चा सुरू झाली आणि मग गुजरातला जायचं असं नक्की झालं. मी आणि माझे साडू श्री जवाहर उपासे दोघांनीही १६ ते २१ नोव्हेंबर या दिवसात सहकुटुंब जायचं ठरवलं. गुजरात सहलीचे सगळे नियोजन आमचा भाचा चि.सिद्धांत उपासे याने केले.          गुजरातमध्ये बघण्यासारखी प्राचीन, ऐतिहासिक, निसर्गरम्य, धार्मिक अशी अनेक स्थळे आहेत. पण चर्चेतून ठरलं की आताच्या काळातील आश्चर्य असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा जिथे उभारला आहे त्या सरदार सरोवर प्रकल्पाला भेट द्यायची आणि येताजाता अहमदाबादमध्ये काही ठिकाणे पाहायची. १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता त्यामुळे त्यादिवशी अहमदाबादमध्ये राहण्यासाठी पाहिजे तसे हॉटेल मिळत नव्हते.‌ म्हणून त्यादिवशी बडोदा येथे मुक्काम करायचा असे ठरवले. या स...

स्वामी विवेकानंद यांचा पीडित महिलांविषयीचा दृष्टिकोन

Image
       स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यापैकी त्यांच्या ठिकाणी असणारा करुणाभाव विलक्षण आहे. या करुणा भावाची काही विशिष्ट उदाहरणे या लेखात मांडली आहेत.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       या लेखात वर्णिलेल्या महिलांसाठी या शब्दासाठी कोणते विशेषण वापरावे हा प्रश्न मला पडला होता. कारण या लेखामधील उल्लेख देहविक्रय करणाऱ्या महिलांबाबत आहेत. अशा महिलांना साधारणपणे 'पतित' असा शब्द वापरण्याची पद्धत आहे. परंतु माझ्या समजुतीप्रमाणे देहविक्रय करणारी कोणतीही महिला स्वखुशीने त्या मार्गाला जात नाही. नाईलाज झाल्यावरच ती त्या मार्गाला जाते. काही बाबतीत फसवणुकीने अशा महिला त्या मार्गावर ढकलल्या जातात. त्यामुळे 'पीडित' हा शब्द वापरला आहे. अशा महिलांमुळे समाजाचे पतन होते की समाजाच्या अध:पतनाचे निदर्शक अशा स्त्रिया आहेत हा चर्चेचा किंवा वादाचा विषय आहे. पण तो बाजूला ठेवून स्वामीजींच्या जीवनातील काही प्रसंग बघूयात.            स्वामीजींच्या पूर्व जीवनात त्यांना देहविक्रय करणाऱ्या महि...

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

Image
     'काशीस जावे नित्य वदावे' ही श्रद्धाळू हिंदू समाजाची हजारो वर्षांपासूनची पद्धत आहे. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये काशीचे स्थान अनन्यसाधारण आहे. यामुळे काशीला जाणे ही एक पवित्र गोष्ट आहे. यावेळी आमचे काशीला जायचे ठरले ते अयोध्या यात्रेमुळे‌. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर पुन्हा उभे राहिले. २२ जानेवारी २०२४ ला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ होती. यापूर्वी २००७ मध्ये काशी प्रयागराज यात्रा घडली होती. पण त्यावेळी अयोध्येला जाता आले नव्हते. तो योग यावेळी आला. ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या दिवसांत आमची ही यात्रा पार पडली.         माझे साडू आणि मी आमच्या दोघांच्या या कौटुंबिक यात्रेचे नियोजन आमचा भाचा कु. सिद्धांत उपासे याने केले होते. आता इंटरनेटवर बऱ्याच सुविधा उपलब्ध असल्याने फोनवरून सगळे नियोजन करता आले.        पुण्यातून निघाल्यावर पहिल्या दिवशी दुपारी प्रयागराजला पोचलो. पुण्यापेक्षा तिथे सूर्यास्त लवकर होत असल्याने हॉटेलमध्ये सामा...

उत्तराखंड सहलीतील अनुभव

Image
     हिमालय पर्वत आणि गंगा नदी गेली हजारो वर्ष भारतीय माणसाला भुरळ घालीत आहे. या दोन्हीचेही पावित्र्य मनामध्ये खोलवर झिरपले आहे. त्यामुळे हरिद्वार हृषिकेश येथे सहलीला जायचे असा विचार आला. या सहलीला जायचे निश्चित केले. दुसरी गोष्ट म्हणजे कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काही दिवस थंड हवेचे अनुभवता येतील या विचाराने मी , पत्नी सौ. शैलजा, साडू श्री जवाहर उपासे व सौ. शुभदा उपासे अशा चौघांनी बरोबर जाण्याचे निश्चित केले. १३ मे ते १९ मे अशी उत्तराखंडमध्ये सात दिवस आणि सहा रात्रींची ही सहल होती. गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या या सहलीमध्ये दिल्ली, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनीताल, मसुरी, हृषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणांचा समावेश होता. त्यामुळे काही नवीन ओळखी झाल्या.     या सहलीत विमानाचा प्रवास झाला तसा हृषिकेशमध्ये सहासीटर रिक्षाचाही प्रवास झाला. एसीबसने प्रवास झाला तशी वल्ह्याच्या होडीतून नैनीतालमधील तलावात फेरी झाली. हृषिकेशमध्ये मोटरबोटीतून गंगा नदी ओलांडली ते वेगळे . दिल्लीला कडक उन्हाळा अनुभवला तशी नैनिताल आणि मसुरी येथील अल्हाददायक थंडीदेखील अनुभवली. मैदानी प्रदेशात रखरखते ऊन हो...

पुस्तक परिचय 'मी कसा झालो?'

Image
     अंगभूत गुण आणि कर्तृत्व, योगायोग, मिळालेल्या संधी आणि त्या संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी केलेली धडपड अशा अनेक गुणांनी ज्यांचे आयुष्य विविधरंगी झाले अशी व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे. त्यांच्या गळ्यात सत्काराचे हार पडले तसे तुरुंगात जाण्याची वेळदेखील आली. स्तुतीसुमनांचा वर्षाव आणि शिव्याशापांचा भडिमार अशा दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे दंतकथा वाटाव्यात अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. या आयुष्याची वाटचाल कशी झाली याचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे 'मी कसा झालो?'.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         १३ ऑगस्ट १८९८ ते १३ जून १९६९ असे जवळपास सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्या आयुष्यतील १९५३ पर्यंत झालेली वाटचाल सांगणारे हे पुस्तक आहे. तोपर्यंत आचार्य अत्रे यांनी काव्य, विडंबन, शिक्षण, नाट्य, राजकारण , चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. अशा बहुपेडी आयुष्याची ओळख करुन देणारे अवघड काम या पुस्तकात सहजपणे पूर्ण झाले आहे.      माणस...

चौकटीबाहेरचे उपाय

Image
        माणसांना आयुष्यात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे उपाय योजावे लागतात. हे उपाय योजताना साधारणपणे बऱ्याचवेळा उत्स्फूर्तपणे जे‌ उपाय सुचतात किंवा ज्या भावना स्वाभाविकपणे निर्माण होतात त्यांच्या आधारावर सुचलेल्या गोष्टी अमलात आणल्या जातात. काहीवेळा आधी ऐकलेले , माहिती असलेले उपाय अमलात आणले जातात.    असे सर्व उपाय साधारणपणे ठराविक प्रकारचे असतात. संबंधित व्यक्ती आपल्याशी नातेसंबंध किंवा मैत्रीने निगडित असेल तर समजावून सांगणे, रागावणे, लहान वयाच्या मुले मुली असतील तर त्यांना फटके देणे किंवा शिक्षा करणे असे उपाय असतात. आर्थिक गरज असेल तर उसने मागणे, आपली गरज समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे अशा गोष्टी घडतात. संबंधित व्यक्ती विरोधक, शत्रू किंवा अपरिचित असेल तर शाब्दिक देवाणघेवाण, शिवीगाळ, मारामारी, प्रसंगी प्रभावी मध्यस्थ किंवा पोलिसांची मदत घेणे अशा गोष्टी होतात. आर्थिक विषय असेल तर बळजबरीने पैसे उकळणे, फसवणूक करणे अशा उपायांचा वापर होतो.       पण साधारणपणे असे सर्व उ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्गदर्शक दीपशिखा

Image
        काल पटलावर आपला ठसा उमटवून गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन एखाद्या दीपशिखेसारखे आहे. ही दीपशिखा तिच्या अंगभूत तेजाने तळपत आहे आणि समाजाला वाट दाखवत आहे. समाज जीवनाची उभारणी होताना काही जीवनमूल्यांची चौकट असणे नेहमीच आवश्यक असते. जगामध्ये वेगवेगळ्या मानव समुहांनी आपल्या समूहासाठी काही मूल्ये आपापल्या वाटचालीच्या, अनुभवांच्या आधारे निश्चित केली. ती जीवनमूल्ये पिढ्यानपढ्या संक्रमित होण्यासाठी काही पद्धती प्रथा परंपरा यांची निर्मिती केली. सर्व मानव समूहांना जगाच्या इतिहासात आपापले स्थान आहे. असाच एक प्राचीन मानव समूह भारतीयांचा आहे. भारताला हजारो वर्षांची जी अखंड परंपरा लाभली आहे. तशी परंपरा अन्य कोणत्या मानव समूहाला लाभली आहे याचे उत्तर नकारार्थी आहे. भारतीय मानव समूहाची जीवनमूल्ये ज्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेली दिसतात अशा महान व्यक्तींपैकी अहिल्याबाईंचे स्थान अद्वितीय आहे.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       भारतीय समाज जीवनाचा पाया अध्यात्माचा आहे. जीवनाचे अधिष्ठान जेवढे लौकिक असावे अशी ...