छ. शिवराय: ध्येयरूप जीवन
छ. शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल किती बोलावे आणि किती लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांचे जीवन उत्तुंग होते. ध्येयाशी एकरूप झालेले त्यांचे व्यक्तिमत्व भूतलावर होऊन गेले. अत्याचारी धर्मांध परकीय सत्ता उलथवून टाकून कल्याणकारी हिंदवी स्वराज्य उभारण्याचे ध्येय शपथरूपाने अगदी बालवयातच शिवरायांनी आपलेसे केले होते. त्यांच्या जीवनातील सर्व योजना, कष्ट , पराक्रम , त्याग या ध्येयासाठीच होता. त्यामुळे हे जीवन ध्येयरूप होते असे म्हणता येते. याचे एक उदाहरण पाहूयात. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मुघलशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, धूर्त व्यापारी इंग्रज, धर्मांध राजवट चालवणारे पोर्तुगीज या सगळ्यांच्या विरोधात महाराजांनी आपली समशेर उपसली. देदीप्यमान यश मिळवले. परंतु जंजिऱ्याचा सिद्दी मात्र आपल्या अजिंक्य जंजिऱ्याच्या पाठबळावर आणि धूर्त तडजोडींमुळे महाराजांना जिंकता आला नाही. नेस्तनाबूत करता आला नाही. महाराजांची अनेक प्रयत्न ...