आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी
मार्च १९८८ मध्ये मी १० वीची परीक्षा दिली. त्याचा निकाल जून १९८८ मध्ये बहुतेक १४ जूनला लागला. आता पुढे कुठे प्रवेश घ्यायचा याची चर्चा सुरू झाली. पुण्यात स.प.महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असे ठरले. पण यात दोन तीन दिवस गेले. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश मिळाला नाही. पुण्यात तेव्हा ११ वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये अर्ज केला आणि स.प. महाविद्यालयात प्रवेश मिळाला. वसतिगृहात राहायचे होते. तिथेही प्रवेश मिळाला. मग निघण्याची तयारी सुरू झाली. मला वसतिगृहावर सोडायला काका श्री बाळासाहेब गाडे आले होते. मला खोली क्रमांक १३ देण्यात आली. पहिल्या दिवशी काकादेखील मुक्कामी राहिले. ते दुसऱ्या दिवशी गेले. बहुतेक त्याच दिवशी थोड्या वेळाने बारावीत असलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने खोलीचे दार वाजवले. त्याने विचारले, " तुझं नाव काय? तुला १० वीला किती टक्के मिळालेत?" "सुधीर गाडे. ८६%" मी उत्तर दिले. " हा माझ्या करमाळा गावचा वीरेंद्र घोगरे. यालाही ८६% मिळालेत. तुम्ही एकत्र राहा. तुमचं जमेल!" या १२ वीतल्या मुलाचं नाव कळालं, "वैभव...