जिवाभावाचे असावे कोणीतरी
माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे. त्यामुळे समूहाने राहणे ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. आपला जन्म ,बालपण, नोकरी व्यवसाय या सगळ्या टप्प्यांतून आपले नातेसंबंध निर्माण होतात. यातील नाती ही रक्ताची असतात तर संबंध हे वेगवेगळ्या निमित्ताने येतात. परंतु या नात्यांपैकी किंवा संबंधांपैकी काही जणांची माणसाशी कळत नकळत जवळीक निर्माण होते आणि त्यातून जीवाभावाचे मैत्र तयार होते. वेळ प्रसंगाला, अडीअडचणीला हे मैत्र , ही नाती उपयोगी पडतात. पण काही वेळा परिस्थिती अशी येते किंवा निर्माण होते त्यावेळी असे जिवाभावाचे कोणी नाही याची खंत वाटते. त्याचा स्वाभाविक परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. तणावातून , निराशेतून काही दु:खदायक प्रसंग देखील घडतत. अशा परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग काढला पाहिजे. याबाबतीतले माझे दोन अनुभव सांगावेसे वाटले म्हणून लिहिले आहेत. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) साधारण सहा-सात वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा योग आला. नोकरी निमित्ताने अन्य राज्यातील हा...