Posts

जिवाभावाचे असावे कोणीतरी

Image
     माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे. त्यामुळे समूहाने राहणे ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. आपला जन्म ,बालपण, नोकरी व्यवसाय या सगळ्या टप्प्यांतून आपले नातेसंबंध निर्माण होतात. यातील नाती ही रक्ताची असतात तर संबंध हे वेगवेगळ्या निमित्ताने येतात. परंतु या नात्यांपैकी किंवा संबंधांपैकी काही जणांची माणसाशी कळत नकळत जवळीक निर्माण होते आणि त्यातून जीवाभावाचे मैत्र तयार होते. वेळ प्रसंगाला, अडीअडचणीला हे मैत्र , ही नाती उपयोगी पडतात. पण काही वेळा परिस्थिती अशी येते किंवा निर्माण होते त्यावेळी असे जिवाभावाचे कोणी नाही याची खंत वाटते. त्याचा स्वाभाविक परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. तणावातून , निराशेतून काही दु:खदायक प्रसंग देखील घडतत.‌ अशा परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग काढला पाहिजे. याबाबतीतले माझे दोन अनुभव सांगावेसे वाटले म्हणून लिहिले आहेत.                 ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )         साधारण सहा-सात वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा योग आला. नोकरी निमित्ताने अन्य राज्यातील हा...

सहज, सोपं बोलणे लिहिणे

Image
        "जीवनातील व्यामिश्रतेचे व्यापक परिप्रेक्षातून अवलोकन केले तर परस्परसंबंधांची जटिलता अनिवार्य पद्धतीने समाजाच्या आंतरप्रवाहांवर अपरिवर्तनीय परिणाम करते आहे." हे वाक्य मी गंमत म्हणून सांगितल्यावर सोबतचे म्हणाले, "गाडे सर, याचा नेमका अर्थ काय?" संवादामध्ये सोपपणा असायला हवा ह्याबद्दल चर्चा सुरू होती.  त्या दरम्यान हा संवाद झाला.                        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       साधारणपणे सहज समजेल असे बोलणे सोपे असते अशी समजूत आहे. पण सहज सोपे बोलणे ही बघायला गेली तर अवघड गोष्ट आहे.‌ त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते. ते असेल तरच सोपेपणा शक्य होतो. काहीवेळा हा माणसाचा अंगभूत गुणदेखील असतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे उदाहरण याबाबत आदर्श आहे. रुढार्थाने न शिकलेल्या बहिणाबाईंना आयुष्याची विलक्षण समज होती. त्या शहाणपणातून त्यांच्या काव्यरचना सोप्या परंतु अर्थपूर्ण झाल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी ये...

मन झाले नितळ

Image
               ( काल्पनिक कथा )        ( मन झाले मोकळे या कथेचा पुढचा भाग. आधीची कथा कॉमेंटमधील दुव्यावर )         उद्यानातून परतल्यावर राजे विक्रमगुप्त निश्चयपूर्वक कामाला लागले. आपल्याकडे दिवस अतिशय थोडे राहिले आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणून कोणत्या क्रमाने गोष्टी करायच्या याचा विचार त्यांनी उद्यानात असतानाच करून ठेवला होता. परंतु या सर्व गोष्टी करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्या कराव्या लागणार होत्या कारण त्यांच्या बोलण्यातून अथवा कृतीतून येणाऱ्या प्रसंगाची कोणालाही कल्पना येऊ द्यायची नव्हती.          ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )      उद्यानातून परतलेले राजे विक्रमगुप्त जवळपास आधीसारखेच वागत आहेत हे राणी शीलवती यांच्या लक्षात आले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. गेले आठवडाभर त्यांच्याही जीवात जीव नव्हता. राजेसाहेबांच्या अस्वस्थतेमुळे त्यादेखील बेचैन झाल्या होत्या. मनात नाही नाही त्या शंका उपस्थित झाल्या होत्या. सगळ्यात मोठे दुःख राजेसाहेब ...

मन झाले मोकळे

Image
                   ( काल्पनिक कथा )     "आता काय करावे ?" राजे विक्रमगुप्त स्वतःशीच उद्गारले? आजूबाजूला कोणीही दासदासी उपस्थित नव्हते. राजांनीच तशी आज्ञा दिली होती एकांत हवा होता म्हणून. राजेसाहेब आपल्या कक्षात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांच्यासमोरची समस्या गंभीर होती.               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        अगदी आठ दिवसांपूर्वीच घडलेला प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. पुन्हा पुन्हा या प्रसंगाचे त्यानना स्मरण होत होते. राजे विक्रमगुप्त आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शिकारीसाठी राजधानी बाहेर पडून जंगलात गेले होते. यावेळी जरा वेगळी वाट त्यांनी निवडली. शिकारीचा आनंद घेताना महाराजांना विलक्षण स्फुरण चढत असे. अशा अनेक शिकारी त्यांनी आजपर्यंत केल्या होत्या. रस्ता नेहमीपेक्षा वेगळा होता. वाटेवरती एका सत्पुरुषांचा आश्रम असल्याची वार्ता महाराजांच्या अग्रदूताने त्यांच्याकडे पोचवली. या सत्पुरुषाच्या दर्शनाला जावे असे राजांच्या मनात आल...

निर्णय कोणता?

Image
                ( काल्पनिक कथा )       "आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच." लॅपटॉप बंद करताना निकिताच्या मनात विचार आला आणि तिच्या आयुष्यातील गेल्या दोन-तीन वर्षांचा प्रवास तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तरळू लागला.                   ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )       निकिता ही लहानपणापासूनच एक बऱ्यापैकी हुशार मुलगी होती. दिसायला देखील पाचपन्नास जणीत उठून दिसेल असे तिचे रूप होते.लहानपणापासूनच आपली हुशारी रूप यांचं कोडकौतुक ऐकत ती मोठी झाली होती. मोठी होताना आपलं शिक्षण पूर्ण करून ती नोकरीलादेखील लागली होती. तिची नोकरी चांगली होती.       आता सहाजिकच या टप्प्यावर लग्नासाठी मुलाची शोधाशोध सुरू झाली. सर्व उपवर मुलींच्या प्रमाणेच निकिताच्यादेखील आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा होत्या. चांगलं कमावणारा, घरदार व्यवस्थित असणारा, चांगल्या घराण्यातील मुलगा तर तिला हवा होताच. परंतु तिची एक सर्वात महत्त्वाची अपेक्षा होती ती म्हणजे मुलगा दिसायला देखणा...

भावनांचा बडेजाव कशाला?

Image
                ( काल्पनिक कथा )       निहारने आजूबाजूला नजर टाकली. विमानतळावर निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. अनेकजण आपले प्रियजन, नातेवाईक, स्नेही यांना निरोप देण्यासाठी आलेले होते. कुणी पर्यटनासाठी तर कुणी कामासाठी तर काही तरुण शिकण्यासाठी परदेशी निघालेले होते. जाणाऱ्या एका माणसाला निरोप द्यायला दोनतीन जणांपासून आठदहाजणांपर्यंत लोक आलेले दिसत होते. कुणाचे चेहरे वियोगाच्या दु:खाने मलूल झालेले होते तर काही चेहरे आनंदाने फुलले होते. जिकडेतिकडे भावभावनांचा मळा बहरलेला दिसत होता. या सगळ्या वातावरणात निहारला जणुकाही गुदमरल्यासारखं होत होतं.              ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )          निहारचे वडील शास्त्रज्ञ होते तर आई डॉक्टर होती. लहानपणापासूनच आई-बाबांनी निहारला भावनेपेक्षा आवश्यकतेवर भर द्यायला वारंवार सांगितले होते. आयुष्यातील सगळे निर्णय हे तर्काच्या कसोटीवर घासून घेण्याची शिकवण त्याला लहानपणापासूनच मिळाली होती. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्...

पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत घेण्याचा अनुभव

Image
        "तुम्ही नेहमी मुलाखती घेता का?" ५/१०/२५ यादिवशी एका व्यक्तीने मला विचारले. निमित्त होते जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगर यांच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे. २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री चैत्रामजी पवार यांच्या हस्ते स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये नुकतेच झाले. यावेळी त्यांची मुलाखत मी घेतली.मी घेतलेली ही तिसरी मुलाखत. ही मुलाखत संपल्यानंतर श्रोत्यांपैकी एका व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा मला आनंद झाला. साधारणपणे भाषणे करणाऱ्या माणसाला मुलाखत घ्यायला सांगितले म्हणजे मुलाखत घेणारा जास्त बोलेल अशी शक्यता असते. परंतु कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते श्री. विनायक खाडे यांनी आग्रहपूर्वक हे काम मला सांगितले. कार्यक्रमानंतर बऱ्याच जणांनी मुलाखत घेण्याची पद्धत आवडल्याचे आवर्जून सांगितले. त्यावरून मी श्री खाडे यांना अडचणीत आणले नाही असे म्हणता येईल.       या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वैयक्तिक संस्मरणीय योग आला. सन १९८८ ते १९९० अशी दोन वर्षे मी इयत्ता अकरावी ब...