Posts

समर्थ भारत : जवळ तरीही दूर

Image
          गेल्या काही दिवसातील अनेक बातम्यांनी मनावरती ओरखडे उमटवले. काही बातम्यांनी तर मनावरती घाव घातले. खरोखरंच आपण एक देश समाज म्हणून समर्थ होण्याच्या किती जवळ आहोत अथवा किती लांब आहोत याची जणू माहिती या बातम्यांनी दिली.                   (कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)          यातील पहिली बातमी ही पुणे शहराजवळच्या शिरूर या महामार्गावरील गावामधील आहे. या बातमीनुसार वंचित समाजातील एका जोडप्यातील महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. काय करावे हे न कळून दोघेही सुन्नपणे तसेच बसून राहिले. काही संवेदनशील लोकांनी गावातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतले. ते पती-पत्नीदेखील तत्परतेने तिथे हजर झाले आणि त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय उपचार केले. या बातमीत सर्व संबंधितांची तत्परता अभिनंदनीय आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. परंतु त्याच वेळी या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या देशात सरकारी रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात हे या जोडप्याला माहीत नव्हते का? माहित अ...

बापाची धडपड

Image
                                  (कथा)          "सॅली, कुठाय डॅड?" स्पृहाचा प्रश्न कानावर आदळला आणि अमोल दचकला. ऑफिसचं प्रेझेंटेशन करण्याच्या अगदी महत्त्वाच्या कामात तो पुरेपूर गुंतला होता. त्यामुळे ह्या प्रश्नाने त्याला ओढून मनानं घरात आणलं. " अग, तुला सांगितलं ना स्पृहा! तो भूर गेलाय." "नाही डॅड! ते काही नाही! तुम्ही भूर जाऊन सॅलीला घेऊनच या. मला काही माहित नाही!" असं म्हणून स्पृहा मोठ्याने भोकाड पसरून रडू लागली. आता काय करावं हेच अमोलला सुचेना. त्यानं पटकन लॅपटॉप बंद केला आणि स्पृहाचा हात हातात घेऊन तिला थोपटत सांगितलं, "अगं, तो भूर गेलाय. कसा आणू त्याला?" "आणा! आणा! आणा!" हातपाय आपटत स्पृहा किंचाळली. आता मात्र अमोल हतबुद्ध झाला. शेवटी कसंबसं तो म्हणाला, " आणतो बरं, बेटा." स्पृहा थोडी शांत झाली आणि तिथून निघून तिच्या खोलीत गेली.                     (चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)         दिग्मूढ ...

महापुरुषांनी केलेली भीतीवर मात

Image
          साधारणपणे माणसाच्या मनात काही भीती पिढ्यानपिढ्या घर करून राहिली आहे असे सांगितले जाते. यात वेगवेगळ्या प्रकारच्या भीती समाविष्ट आहेत. त्यामध्ये आपण उंचावरून पडतो आहोत या प्रकारची एक भीती माणसाच्या मनात असते. या भीतीचा माणसाच्या उत्क्रांतीच्या क्रमाशी संबंध आहे असे सांगितले जाते. माणूस हा सृष्टीच्या क्रमात उत्क्रांत होत गेलेला प्राणी आहे. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे.  १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात हा सिद्धांत मांडण्यात आला. त्यानुसार माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाला आहे असे मानण्यात येते. माकडांचा निवास प्रामुख्याने झाडावर असतो.  याचबरोबर अनोळखी ठिकाणाची बऱ्याच जणांना भीती वाटते‌. तसेच मोठ्या जनसमुदायापुढे उभे राहून बोलण्याची भीती अनेकांच्या मनात घर करून असते. याला इंग्रजीमध्ये 'स्टेज फियर' असे म्हटले जाते तर मराठीमध्ये यालाच 'सभाधीटपणा नसणे' असे म्हटले जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती माणसाच्या मनात असतात.        ( चार्ल्स डार्विन यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )   ...

महामानवाची करूणा

Image
         'सर्वांभूती ईश्वराचा अंश आहे' असं सांगणाऱ्या संस्कृतीनेच माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारले हा केवढा मोठा विरोधाभास! हा विरोधाभास दुःखद, अन्यायकारक आणि संतापजनकही आहे. परंतु चालत आलेल्या रुढीला मोडता कसा घालायचा म्हणून हा अन्याय सहन करणाऱ्यांनी देखील तो जवळपास निमुटपणे सहन केला. केवळ आर्जवं केली. संत चोखामेळा यांच्या अभंगात 'उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही याती हीन' अशा प्रकारची हतबलता केवळ व्यक्त केली. परंतु या अन्यायकारक परिस्थिती विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज म्हणून तर अपमानित जिणं पिढ्यानुपिढ्या वाट्याला आलं होतंच. परंतु बाबासाहेब दहा वर्षांचे असताना साताऱ्याहून कोरेगावला वडिलांना भेटायला जाताना जो शून्य माणुसकीचा अनुभव त्यांना आला त्याने त्यांचा अंगभूत स्वाभिमान खडबडून चेतवला. रूढींच्या जुलमी साखळदंडांनी पाय जखडलेले असतानादेखील                                                      ...

सामाजिक समरसतेसाठी आचरणात आणण्याच्या गोष्टी

Image
          कै. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा' या गीतामध्ये उल्लेख असा आहे की: 'घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री.' मी विचार करत होतो की वैयक्तिक आयुष्यात तर कमी-अधिक प्रमाणात काही चुका आपल्या हातून घडतात,  कोणाच्या हातून पाप देखील घडतं. पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलंय का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेलं आहे. आणि ते एक-दोन दिवस नाही, एक-दोन वर्ष नाही, १००-२०० वर्ष नाही, जवळपास हजार-दोन हजार वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो. कोणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावर, विद्वानांच्यावर सोडून देऊयात. परंतु हो, आम्ही हे पाप केलंय हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया. ते पाप असं केलंय की 'आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं'. दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं.                  ( छायाचित्र कृत्रिम बुद्...

छ. शिवराय: ध्येयरूप जीवन

Image
           छ. शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल किती बोलावे आणि किती लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांचे जीवन उत्तुंग होते. ध्येयाशी एकरूप झालेले त्यांचे व्यक्तिमत्व भूतलावर होऊन गेले. अत्याचारी धर्मांध परकीय सत्ता उलथवून टाकून कल्याणकारी हिंदवी स्वराज्य उभारण्याचे ध्येय शपथरूपाने अगदी बालवयातच शिवरायांनी आपलेसे केले होते. त्यांच्या जीवनातील सर्व योजना, कष्ट , पराक्रम , त्याग या ध्येयासाठीच होता. त्यामुळे हे जीवन ध्येयरूप होते असे म्हणता येते. याचे एक उदाहरण पाहूयात.                      ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मुघलशाही,  गोवळकोंडाची कुतुबशाही, धूर्त व्यापारी इंग्रज, धर्मांध राजवट चालवणारे पोर्तुगीज या सगळ्यांच्या विरोधात महाराजांनी आपली समशेर उपसली.  देदीप्यमान यश मिळवले. परंतु जंजिऱ्याचा सिद्दी मात्र आपल्या अजिंक्य जंजिऱ्याच्या पाठबळावर आणि धूर्त तडजोडींमुळे महाराजांना जिंकता आला नाही. नेस्तनाबूत करता आला नाही. महाराजांची अनेक प्रयत्न ...

उत्सवाची परंपरा पुढच्या पिढीकडे

Image
           आपल्या प्राचीन देशामध्ये सण, उत्सव यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. यात वेगवेगळ्या टप्प्यांवर नवनवीन उत्सवांंची भर पडत गेली आहे. उत्सव सुरू होण्याच्या पाठीमागे धार्मिक , खगोलीय किंवा पर्यावरणीय कारणे आहे हे लक्षात येते. यातील बरेचसे उत्सव हे समाज एकत्र येऊन सुरू होतात. काही उत्सव एखाद्या व्यक्तिच्या पुढाकाराने सुरू होतात. असे सुरू झालेले पुढे कसे चालत राहतात हे समजून घेणे उद्बोधक वाटते.   (भाटे कुटुंबातील उत्सवातील छायाचित्र सौजन्य डॉ. मानसी भाटे)         श्री. नारायण उर्फ उल्हास भिकाजी भाटेकाका पुण्यात पेरुगेटजवळ राहायचे. १९८६ मध्ये ते सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर इथं राहायला गेले. भाटेकाकांनी एसकेएफ या कंपनीत अनेक वर्षे नोकरी केली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त आहेत. त्या भक्तितून घरात दर बुधवारी सत्संग सुरू केला. हळूहळू या सत्संगाला भक्तांची गर्दी वाढत गेली. भाटेकाकांनी याला जोड दिली ती स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाच्या उत्सवाची. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस हा स्वामीं...