विशाल हृदयाचे स्वामी विवेकानंद
"जोपर्यंत जगातील शेवटच्या व्यक्तिला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी कार्य करत राहीन."असा आपला निश्चय प्रकट करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे हृदय अतिशय विशाल होते जगामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान याविषयी त्यांच्या मनात अपार करुणाभाव होता. या सर्व गोष्टी संपून संपूर्ण प्राणीमात्र सुखी झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. "जगातील कट्टरतावाद, संकुचितपणा, धर्मांधता, सांप्रदायिकता यामुळे जगामध्ये वाहिले तेवढे रक्त पुष्कळ झाले. आता यापुढे यामुळे रक्तपात होणार नाही यासाठी सर्व धर्मपंथ संप्रदाय सत्य आहेत हे स्वीकारूया." ही प्राचीन वैदिक घोषणा यांनी पुन्हा एकदा उच्चारली आणि विश्वबंधुत्वाचे आवाहन केले. या बंधुत्वाने माणसाचे सहजीवन अर्थपूर्ण होऊ शकते याची त्यांना खात्री होती. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) स्वामीजींचे विचार हे जगाला सर्वकाळ मार्गदर्शक आहेत. आपल्या वाटते विचार व्यक्त करणारी स्वामीजी ही एक व्यक्ती आहे. परंतु स्वामीजींनी आपले गुरुबंधू रा...