Posts

विशाल हृदयाचे स्वामी विवेकानंद

Image
         "जोपर्यंत जगातील शेवटच्या व्यक्तिला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी कार्य करत राहीन."असा आपला निश्चय प्रकट करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे हृदय अतिशय विशाल होते जगामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान याविषयी त्यांच्या मनात अपार करुणाभाव होता. या सर्व गोष्टी संपून संपूर्ण प्राणीमात्र सुखी झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. "जगातील कट्टरतावाद, संकुचितपणा, धर्मांधता, सांप्रदायिकता यामुळे जगामध्ये वाहिले तेवढे रक्त पुष्कळ झाले. आता यापुढे यामुळे रक्तपात होणार नाही यासाठी सर्व धर्मपंथ संप्रदाय सत्य आहेत हे स्वीकारूया." ही प्राचीन वैदिक घोषणा यांनी पुन्हा एकदा उच्चारली आणि विश्वबंधुत्वाचे आवाहन केले. या बंधुत्वाने माणसाचे सहजीवन अर्थपूर्ण होऊ शकते याची त्यांना खात्री होती.                          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      स्वामीजींचे विचार हे जगाला सर्वकाळ मार्गदर्शक आहेत. आपल्या वाटते विचार व्यक्त करणारी स्वामीजी ही एक व्यक्ती आहे. परंतु स्वामीजींनी आपले गुरुबंधू रा...

बहादुरीचे काम करणारे भारताचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री

Image
  इतिहासात काळाचे असे अनेक क्षण येऊन गेले की ज्या क्षणी प्रश्न उपस्थित झाला की ही जबाबदारी कोण घेईल. त्या क्षणी जबाबदारी पार पाडायला कोणीतरी पुढे आले त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. ज्यांनी कर्तृत्वाने जबाबदारीला न्याय दिला त्यांचे गुणगान लोकांनी केले. ते इतिहासात नोंदले गेले. अशा कर्तृत्ववान लोकांच्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचे होय.                     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा विचार करताना हे निश्चितपणे लक्षात येते की स्वातंत्र्यानंतरची पहिली जवळपास पंधरा‌ वर्षे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या विचारांप्रमाणे भारताच्या आकारणीला दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अखेरच्या काळात विशेषतः १९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धानंतर 'नेहरूंनंतर कोण?' हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला. यात काही नावे पुढे आली. त्यात लालबहादूर ...

क्रिकेटच्या आवडीचा एक असाही फायदा

Image
         भारतात साधारणपणे तीन विषयांवर सर्वात जास्त वेळा चर्चा होत असते. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. कोणत्या वेळी कोणत्या विषयावर जास्त चर्चा होईल हे त्या त्या वेळी असणाऱ्या परिस्थितीवर ठरते. एखादा चित्रपट गाजला की चित्रपट सृष्टीबाबतची चर्चा रंगते. निवडणुकांच्या वेळी राजकारणाची चर्चा रंगते आणि क्रिकेट सामन्यांच्या वेळी क्रिकेटची चर्चा रंगते. मग यातील हौशी लोक आपापली मते सांगतात. तसे जाणकार लोक आकडेवारी सांगतात. चर्चा रंगत जाते.             आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला'लगान' सारखा चित्रपट तर काल्पनिक असूनही लोकांच्या मनाची पकड घेतो. भुवन या नायकाच्या बाजूने सर्वचजण उभे राहतात. इंग्रजांच्या खऱ्याखुऱ्या अत्याचारांची वर्णने काल्पनिक कथेतून केली गेली. चित्रपटातील भुवनच्या संघाचा विजय म्हणजे भारताचा विजय असे समाजमन तयार झाले.          एवढे सगळे असले तरी वस्तुस्थिती उरतेच की इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथेच हा खेळ बहरला. सध्यादेखील जगात फुटबॉल खेळणाऱ्या देशाच्या संख्येच्या तुलनेत अगदी कमी संख...

स्मरण विस्मरण

Image
                      काही प्रसंग, घटना, गोष्टी घडतात त्यावेळी खूप महत्त्वाच्या वाटतात त्यावेळी त्या लक्षात राहतात. परंतु काही दिवसानंतर अशा गोष्टी विसरल्या जातात. घडताना महत्त्वाच्या वाटलेल्या प्रसंगांची नंतर कोणीतरी आठवण करून देते पण त्याची आठवण येतेच असे नाही. मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते पंकज कपूर यांची एक मुलाखत पाहत होतो. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीची तयारी करताना पंकज कपूर यांच्या नातेवाईकांशी, मित्रांशी चर्चा करून प्रश्न काढलेले होते. त्यात एक प्रश्न असा होता की , "बऱ्याच वर्षांपूर्वी पंकज कपूर यांनी बसमध्ये भिकाऱ्याचे सोंग वठवून सर्वांना चकित करून सोडले होते." हा प्रसंग मुलाखतकाराला पंकज कपूर यांच्या भावाने सांगितला होता. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर पंकज कपूर म्हणाले, " मला यातले काहीही आठवत नाही." मुलाखतकाराने भावाचे नाव घेऊन हा प्रसंग त्यांच्याकडून कळल्याचे सांगितले पण तरीदेखील पंकज कपूर यांना तो प्रसंग काही पाठवला नाही. मोघमपणे ते एवढंच म्हणाले की , "असं घडलेलं असू शकतं ."त्यांच्या उत्तरावरून त्यांना हा प्रसंग आठवला...

अशाच काही आठवणी

Image
      आयुष्य जगत असताना अनेक प्रसंग घडतात. घडामोडी होतात. गोष्टी घडतात किंवा बिघडतात. त्या त्या प्रसंगाप्रमाणे त्या आठवणी मनावरती कोरल्या जातात. या आठवणींचा काळ हा कमी अधिक असतो. आठवणीच्या प्रसंगाच्या तीव्रतेप्रमाणे या आठवणी थोडा किंवा जास्त वेळ लक्षात राहतात. कमी तीव्रतेच्या प्रसंगांच्या आठवणी काही दिवसानंतर विस्मरणात जातात. म्हटले तर तो प्रसंग किंवा ती घटना तशी फारशी महत्त्वाची नसते. परंतु अशा आठवणींपैकी काही आठवणी प्रसंगानिमित्त पुन्हा वर येतात. एका अर्थाने ते काही क्षण अनुभवण्याची पुन्हा संधी देतात. या लेखाच्या निमित्ताने माझ्या अशाच काही आठवणी या प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर येथील १९९७ ते १९९९ या काळातील आहेत. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणजे प्रचारक म्हणून मी तिथे काम करत होतो.  काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते श्री. कुलभूषण बाळशेटे यांच्याशी काही निमित्ताने फोनवर बोलणे झाले त्यांना सर्व कार्यकर्ते दादा बाळशेटे म्हणून ओळखतात. फोनवर बोलताना मी त्यांना विचारले, " दादा, तुमच्या घरी अजून जिंदा तिलिस्मात नावाचे...

गुलामगिरीच्या खुणा

Image
     आपल्या प्राचीन भारतदेशावर सुमारे हजार वर्षे परकीय आक्रमणे झाली. संपत्ती सत्ता यांच्या अभिलाषेतून झालेल्या या आक्रमणांनी धर्मप्रसार देखील घडवला हा इतिहास आहे. आक्रमकांच्या या मालिकेत इंग्रजांच्या आक्रमणाचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पद्धतशीरपणे भारतीयांच्या मनात हीनपणाची भावना निर्माण केली. आपल्या धूर्त योजनाबद्ध प्रयत्नांतून त्यांनी भारतीय विचार ग्रंथ तत्वज्ञान यांची मोडतोड केली. भारतात सर्वच कसे चुकीचे होते असा भाव शिक्षणातून लोकांच्या मनात झिरपवला. ह्यातून गुलामगिरीची भावना निर्माण झाली. दुर्दैवाने ही भावना अनेक भारतीय यांच्या मनात खोलवर रुजली होती. १९४७ मध्ये खंडित भारत स्वतंत्र झाला. परंतु अजूनदेखील या गुलामगिरीच्या  काही खुणा  दिसून येतात.    ( क्रांतिसिंह नाना पाटील यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)  ( मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.  १९९० १९९१मध्ये सातारा जिल्ह्य...

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

Image
      मार्च १९८८ मध्ये मी १० वीची परीक्षा दिली. त्याचा निकाल जून १९८८ मध्ये बहुतेक १४ जूनला लागला. आता पुढे कुठे प्रवेश घ्यायचा याची चर्चा सुरू झाली. पुण्यात स.प.महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असे ठरले. पण यात दोन तीन दिवस गेले. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश मिळाला नाही. पुण्यात तेव्हा ११ वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये अर्ज केला आणि स.प. महाविद्यालयात प्रवेश मिळाला.      वसतिगृहात राहायचे होते. तिथेही प्रवेश मिळाला. मग निघण्याची तयारी सुरू झाली. मला वसतिगृहावर सोडायला काका श्री बाळासाहेब गाडे आले होते. मला खोली क्रमांक १३ देण्यात आली. पहिल्या दिवशी काकादेखील मुक्कामी राहिले. ते दुसऱ्या दिवशी गेले. बहुतेक त्याच दिवशी थोड्या वेळाने बारावीत असलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने खोलीचे दार वाजवले. त्याने विचारले, " तुझं नाव काय? तुला १० वीला किती टक्के मिळालेत?" "सुधीर गाडे. ८६%" मी उत्तर दिले. " हा माझ्या करमाळा गावचा वीरेंद्र घोगरे. यालाही ८६% मिळालेत. तुम्ही एकत्र राहा. तुमचं जमेल!"  या १२ वीतल्या मुलाचं नाव कळालं, "वैभव...