Posts

समुद्रावर स्वारी

Image
     'अनंत अमुचि ध्येयासक्ती किनारा, तुला पामराला' अशी ओळ कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत लिहिली आहे. त्यात कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की माणसाची ध्येयासक्ती इतकी मोठी आहे की समुद्राचा अफाट विस्तार तिला रोखू शकत नाही. समुद्र जरी विस्तीर्ण असला तरी देखील त्याला किनारा आहे. पण माणसाच्या इच्छाशक्तीला किनारा नाही. समुद्रावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन वेगवेगळ्या राजांची माहिती यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      यातील पहिले राजे म्हणजे प्रभू श्री राम! रावणाने कपट करून सीतामाईचे हरण केले. सुग्रीवाच्या मदतीने, हनुमंतांची योजना झाली . त्यातून सीतामाई लंकेत आहे हे समजले. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. श्रीराम , लक्ष्मण यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या संख्येने वानर सैन्य चालू लागले. शेवटी ते समुद्र किनाऱ्यावर पोचले. लंका हे समुद्रातील बेट असल्यामुळे समुद्राने वाट दिली तर पुढे जाता येणार होते. श्रीरामांनी तीन दिवस समुद्राची विनवण केली. परंतु समुद...

माणूस आणि निसर्गाचे सहजीवन

Image
        सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक श्री गणेश मूर्तीचे पूजन होते. श्री गणेशाची मूर्ती उंदीर असल्याशिवाय पूर्ण झाली असे मानले जात नाही.‌ मानव आणि अन्य प्राण्यांच्या सहजीवनाचे हे एक भारतीय उदाहरण आहे असे समजता येईल. अशाचे प्रकारे श्री  शंकराच्या पिंडीसोबत नंदी, श्री शंकराच्या मूर्तीसोबत साप, श्री विष्णुच्या मूर्तीबरोबर गरुड, श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीबरोबर गाय आणि कुत्रे आवश्यक मानले गेले आहेत. या प्राण्यांबरोबर देवी लक्ष्मीचे वाहन घुबड, देवी सरस्वतीचे वाहन हंस हीदेखील उदाहरणे आहेत. याचबरोबर पूजेसाठी वेगवेगळी पानेफुलेदेखील आवश्यक मानली गेली आहेत. ही प्रामुख्याने वैदिक हिंदू संस्कृतीमधील उदाहरणे आहेत.        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        पृथ्वीच्या पाठीवर मानवीजीवन हजारो वर्षांपासून सुरू आहे. पृथ्वीवर जशा अन्य प्राण्यांच्या जाती होत्या तशाच मानवप्राण्यांच्याही जाती होत्या. माणसाच्या जातींपैकी होमो सेपिअन्स या जातीने अन्य जातींना संपवले. यासाठी शक्त...

मैत्रीची गाडी

Image
            ( काल्पनिक कथा ) " विचार करतोय एखादी चारचाकी गाडी घ्यावी. बघूया कधी जमतंय ते." धीरज म्हणाला. "अरे,‌ मीपण या १०-१५ दिवसांत नवीन गाडी घेणार आहे." राजीव म्हणाला. नंतर थोड्या वेळात बोलणं संपलं आणि दोघं आपापल्या दिशांनी निघून गेले.  ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) धीरज आणि राजीव शाळेच्या असल्यापासूनचे मित्र. शेजारी शेजारी राहायचे. एकत्रच सायकलवर शाळेत जायचे परत यायचे. अभ्यास, दंगामस्ती, सणवार सगळं काही एकमेकांसोबतच. शाळा संपल्याच्या वळणावर वाटा वेगळ्या झाल्या. दोघंही आपापल्या मार्गाला लागले. अधूनमधून भेटी होत. ख्याली खुशाली समजत राहायची. यातल्या राजीवची आर्थिक प्रगती झपाट्याने झाली. शिक्षण, उच्च शिक्षण, स्वतःचा व्यवसाय. त्यात बसलेला जम. असं करत करत तो अधिकाधिक श्रीमंत होत गेला. एका टप्प्यावर आधीचे घर सोडून नवश्रीमंतांच्या वस्तीत राहायला गेला.      इकडं धीलचंही बरं चाललं होतं. आधीदेखील तो मध्यमवर्गीय घरातला होता. शिक्षण, नोकरी यामुळे त्याचीदेखील परिस्थिती सुधारली. त्यानंदेखील एका चांगल्या मध्यमवर्गीय सोसायटीत फ्लॅट ...

इकडे द्विधा मनस्थिती आणि तिकडे हुरहूर

Image
                ( काल्पनिक कथा )         "अरे निखिल, कधी येतोस गावी?" अण्णांनी फोनवरून विचारले. " अण्णा, इथं माझं काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का?" निखिल थोडं मोठ्यानेच बोलला. " ते काही सांगायचं नाही. ताबडतोब ये." तिकडून अण्णांनीही मोठ्यानेच सांगितले आणि फोन बंद केला.     ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )       छोट्या गावातून निखिल शिक्षणासाठी शहरात येऊन दोन तीन वर्षे झाली होती. गावाकडे अण्णांची शेतीवाडी, खतांचं दुकान असा मोठा व्याप होता. अनेक वर्षे कष्ट करून त्यांनी चांगला जम बसवला होता. निखिललाही कौतुकाने शहरात शिकायला ठेवलं होतं.         शहरात आल्यावर रुळताना निखिलला नाही म्हटलं तरी जरा अडचण आलीच होती. शहरात नवा असताना त्याला सारखंसारखं गावाकडं जावंसं वाटे. गावी गेलं की मित्रांबरोबर गप्पा टप्पा मारत गावभर आणि गावाबाहेर भटकायचं. मधेच शेतावर चक्कर मारायची. अधूनमधून दुकानावर बसायचं. आईकडून,‌आजीकडून लाडकोड करून घ्यायचं हे सारखं हवंहवंसं वाटायचं. मग तो निमित्त शो...

लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचे मार्गदर्शक जीवन

Image
        एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि कार्य शेकडो वर्षे समाजजीवनाला प्रेरणा देत राहते. समाजावर त्याचा प्रभाव पडतो. अशा व्यक्तिंच्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे लोकमाता अहिल्यामाई होळकर. त्यांच्या जन्माला तीनशे वर्षे होऊन गेली तरी त्यांचा प्रभाव आजही समाजजीवनावर आहे. तसेच त्यांच्या कृती आजदेखील मार्गदर्शक आहेत. या दीर्घ लेखात ह्या लोकविलक्षण जीवनाच्या प्रभावाच्या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा करण्यात आली आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        ही चर्चा सुरू करण्यापूर्वी तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. अहिल्यामाईंच्या १७२५ ते १७९५ या जीवनकाळात देशभर राजेशाही पद्धत होती. छोटेमोठे राजे देशभर होते. मराठी साम्राज्याचा विस्तार देशभर झाला होता. मराठी साम्राज्य उत्कर्षाच्या शिखरावर होते.ऐ आक्रमक इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यपाराला सुरुवात करून भारतात राज्यकारभार बळकवायला सुरुवात केली होती. प्रथम बंगाल नंतर अन्य भागात इंग्रजी सत्ता स्थिरस्थावर होत होती. भारतीयांवर चालीरीती, रुढी यांचा विलक्षण पगडा होता...

आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू

Image
    आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ या दिवशी झाला. एका सभेत बोलताना आचार्य अत्रे म्हणाले, " माझा जन्म १३ ऑगस्ट चा. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्टला मिळाले. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी लागते म्हणून स.का.पाटील यांचा जन्म १४ ऑगस्ट या दिवशी झाला. आपल्या विरोधकांना वेगवेगळ्या प्रकारे उपहासाने नामोहरम करण्याचा हा एक आचार्य अत्रे यांच्या शैलीचा नमुना होता. स. का. पाटील हे त्या काळात मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा विरोध होता. " सूर्य चंद्र असतोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." असे विधान त्यांनी केले होते. त्यावर अत्रे म्हणाले होते की , "सूर्य चंद्र काय तुझ्या बापाचे नोकर आहेत का?" अशा या विरोधकाला हिणवण्याची संधी आचार्य अत्रे यांनी आपल्या वाढदिवसाच्या भाषणात घेतली होती.        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          आचार्य अत्रे यांचे यांचा जीवनपट बघताना असे लक्षात येते की त्यांना जे करायचे होते ते करता आले नाही. त्यांना स्वतःला आपल्या काकांसारखे वकील व्हायचे होते. पण आ...

शब्दांविना संवाद

Image
    संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीमध्ये 'शब्देवीण संवादु' असा उल्लेख येतो. माणसाला संवाद साधण्यासाठी स्वाभाविकपणे भाषेचा म्हणजेच शब्दांचा वापर करावा लागतो. परंतु काही वेळा शब्दांशिवाय देखील संवाद होतो.         संवाद म्हणजे काय तर एकमेकांकडे असलेली माहिती ,विचार ,भावभावना एकमेकांकडे पोहोचवणे. या देवाणघेवाण करण्याला संवाद म्हणतात. या संवादाबद्दल अनेक प्रकारची चर्चा होत असते. संवाद कौशल्याच्या दृष्टीने शब्दातून संवाद किंवा आणि शब्दांशिवाय संवाद म्हणजे कृती किंवा हावभाव यातून संवाद असे त्याचे दोन प्रकार सांगितले जातात. एकूण होणाऱ्या संवादामध्ये दोन्हीही प्रकारांचा समावेश होतो आणि दोन्हीही प्रकारांचे प्रमाण लक्षणीय आहे.      काही वेळा माणसे मौन राहतात. परंतु अशा मौन अवस्थेत देखील कधीतरी अशी काही घटना घडते की साधारणपणे निःशब्द राहणारेदेखील बोलू लागतात. गीत रामायणामधील ' राम जन्मला ग सखी राम जन्मला' या गीतामध्ये शब्दप्रभू ग .दि. माडगूळकर यांनी 'मौनालाही स्फुरले भाषण' असे राम जन्माच्या वेळचे वर्णन केले आहे. यातून त्या प्रसंगाचा झालेला परिणाम प्रभ...