Posts

Showing posts from June, 2021

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ८ )

Image
 प.अ. वीरकरबाई शाळेतील दिवस हे मंतरलेले असतात याची जाणीव शाळा सोडल्यानंतर होते.शाळेत असताना अनेक चांगले शिक्षक मिळाले हे भाग्यच असं आता लक्षात येतं. अनेक शिक्षक अनेक कारणांनी आवडायचे.हिंदी विषय शिकवणाऱ्या वीरकरबाई आवडायच्या त्यांच्या शिकवण्यामुळे.शिकवता शिकवता जणू आयुष्याचे धडेच त्या द्यायचा. त्यांनी शिकवलेला प्रतिक्रिया ही जीवन की कसौटी है हा धडा तर माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे.राष्ट्रभाषा सभेच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या निमित्ताने होणारे तास मला नेहमीच आवडायचे. आम्ही शाळेत असताना एकट्या राहणाऱ्या वीरकरबाई नेहमी त्यांचा आब राखून असायच्या. त्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटायच्या. शाळेत असताना एक वर्षी बहुधा १९८६ मध्ये त्यांनी मला शाळेच्या हिंदी दिनाच्या कार्यक्रमाचा प्रमुख ( बहुधा अध्यक्ष) केलं होतं.त्यावेळचे माझं सादरीकरण त्यांना आवडलं होतं. त्यांनी आवर्जून कौतुक केलं होतं. नोव्हेंबर २०१९ मध्ये बाईंची भेट झाली. तेव्हा त्या साताऱ्यात बहिणीकडे राहत होत्या. त्यांचे स्मरण चांगले होते.व्यक्ती,घटना त्यांना चांगल्या आठवत होत्या .बरोबरीचे अनेक सहकारी क्रमाने काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुःख त्

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग (भाग २)

Image
  न.चिं. बर्वेसर बर्वेसर नेहमीच आवडायचे त्यांच्याशिकवण्याच्या पद्धतीमु ळे. त्यांचं शिकवणं मला फार आवडायचं. आम्हाला त्यांनी इंग्लिश, संस्कृत, इतिहास,भूगोल हे विषय शिकवले. आम्ही नववीत असताना शुक्रवारी त्यांचे या विषयाचे सलग चार तास होते.पण कधी कंटाळा आल्याचे आठवत नाही. एकदा तर ते गंमतीने म्हणाले की " शुक्रवारी मी शाळेत कपड्यांचे दोनतीन जोड आणले पाहिजेत.मधल्या वेळात कपडे बदलून आलो तर तेवढंच तुम्हाला काही वेगळं वाटेल." ते दरवर्षी दहावीचे मोजकेच ५ विद्यार्थी खाजगी शिकवणीसाठी घ्यायचे.आम्ही पाचजण त्यांच्याकडे नियमित जायचो.त्यांच्या शिकवणीमुळे इंग्लिश भाषेची गोडी लागली. ते be या क्रियापदाला त्याची आठ रूपे होतात म्हणून "अष्टपुत्रे" म्हणत असत. महासगरांना जोडणाऱ्या कॅनॉलबद्दल 'अ पॅ पनामा तांब्या भू सुएझ " असं लक्षात ठेवायचं हे त्यांनी सांगितल्याचं अजूनही आठवतं. एक इच्छा मात्र अर्धवट राहिली.शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिली.आम्ही बहुधा नववीत असताना गडकऱ्यांच्या नाटकातील काही प्रवेश त्यांनी बसवायचं ठरवलं होतं.सुरु