Posts

Showing posts from March, 2024

छ. शिवराय : अखिल भारतीय दृष्टी

Image
     भारताचा मध्ययुगीन इतिहास लिहिताना तुर्क, पठाण, मोगल, इंग्रज, फ्रेंच इत्यादी लुटारू आक्रमकांच्या दृष्टीने लिहिला गेल्याचे आढळते. त्यामुळे ही तत्कालीन आक्रमक मंडळी छ. शिवाजी महाराजांना बंडखोर, लुटारू अशी विशेषणे वापरत असत. जणू काही ते स्वतःच इथले मालक आहेत असा हा आविर्भाव. चोराच्या उलट्या बोंबा त्या ह्याच! छत्रपती शिवरायांचा लढा हा भूमिपुत्रांचा लढा असून तो स्वातंत्र्यलढा आहे ही भूमिका त्यांनी कधीच मान्य केलेली दिसत नाही. तसेच महाराजांचे विचार, दृष्टी महाराष्ट्रपुरती किंबहुना त्यांच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्राच्या, तामिळनाडूच्या आणि कर्नाटकाच्या काही भूमिपुरती मर्यादित होती अशीदेखील समजूत दिसते.             ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)  परंतु महाराजांची दृष्टी ही केवळ आपल्या ताब्यातील भूप्रदेशाएवढीच मर्यादित नव्हती तर ती अखिल भारतीय होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याचे अनेक पुरावे देता येतील. ॲबे बार्तुलमी कॅरे नावाचा एक युरोपियन प्रवासी शिवाजी महाराजांच्या जीवित काळात दोन वेळा भारतात प्रवास करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या आठवणी, तसेच आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्याने चौ

आनंद लुटण्याचा प्रकार

Image
         आनंद सर्वच प्राणीमात्रांना होतो. पण मानवाचे वेगळेपण असे की त्याला आनंद घेण्याचे विविध प्रकार आणि साधने माहिती आहेत. तसेच मानवाने आपली बुद्धिमत्ता, सृजनशीलता यांच्या आधारावर त्याने आनंदाची नवनवीन साधने निर्माण केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून माणूस विविध प्रकारे आनंद मिळवू शकतो.           आनंद मिळवण्याचे किंवा लुटण्याचे प्रकार वयोमानानुसार बदलत जातात. वय, अनुभव, पार्श्वभूमी यामुळे यात वेगवेगळ्या प्रकारचे स्तर होत जातात.      ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)       समुद्राचे अथांगपण जवळपास सर्वच माणसांना भावते‌. समुद्रकिनारी गेल्यावर बहुतेक सगळ्यांनाच समुद्रात डुंबण्याची इच्छा होते. पण अगदी लहान वयातील मूल ज्यावेळी समुद्रकिनारी जाते त्यावेळी ते बावरून जाते. पण पाण्याचे आकर्षण हे असतेच. पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा त्या मुलाला होते. आईवडील अथवा कोणी नातेवाईक अशा लहान मुलाला घेऊन समुद्राच्या अगदी काठावर उभे राहतात. थोड्याच पाण्यात त्याला नेतात. समुद्राच्या लाटा पायांवर येऊन आदळतात आणि परत जातात. लहान मुलाला याचे अप्रूप वाटते. थोड्या वेळाने या लाटांना सरावलेले मूल तिथेच लाटांवर किंवा ल

पतीपत्नींच्या अलौकिक जोड्या

Image
      आदिमानवाने समाजाची कल्पना स्वीकारून एकत्रित पणे राहायला सुरुवात केली या टप्प्यावर केव्हातरी कुटुंब व्यवस्थेचा जन्म झाला. माणसांच्या शारीरिक गरजा भागवणे याबरोबरच वंश सातत्य टिकवणे हा देखील हेतू यामागे आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या पत्रिकेत ......... यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे असे लिहिले जात असे. आता पत्रिका वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातात. परंतु विवाह संस्थेचा तो हेतू आहेच. अशा पार्श्वभूमीवर पती-पत्नी असूनदेखील हे नाते शरीरसंबंधात अडकले नाही याची काही विलक्षण उदाहरणे आहेत.            ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )     संत तुलसीदास यांचा विवाह रत्नावली यांच्याशी झाला. त्या अतिशय सौंदर्यवती होत्या. तारुण्यात काम भावनेचा प्रचंड पगडा तुलसीदासांच्या मनावर होता. एकदा रत्नावली माहेरी गेल्या असताना त्यांच्या आठवणीने ते अतिशय व्याकुळ झाले. श्रावण महिना, पावसाळ्याचे दिवस , दुथडी भरून वाहणारी नदी यांची त्यांना काहीच पर्वा वाटली नाही. नदीकिनारी पोचल्यावर नावाड्यांनी अशा परिस्थितीत नावेतून घेण्याचे घेऊन जाण्याचे नाकारले. तेव्हा वाहत येणार्‍या एका मृतदेहाचा आधार घेऊन नदी पार केली. वर

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

Image
      " सर, दुसऱ्या एखाद्या पालकांनी परीक्षेचा पेपर बुडवून विश्वचषकाचा सामना बघायला जाण्याची परवानगी मुलाला दिली असती तर मी त्यांना  भेटायला बोलावले असते. पण मी तुम्हाला ओळखतो त्यामुळे बोलावले नाही." आमच्या शंतनूचे महाविद्यालयातील प्राध्यापक संदीप राठोड‌सर मला सांगत होते. झालं होतं असं की क्रिकेट विश्वचषकाच्या पुण्यातील ऑक्टोबर २०२३ मधील सामन्याची तिकिटे शंतनूने खटपट करून इंटरनेटवरून मिळवली होती. पण नंतर परीक्षांचे वेळापत्रक बदलले आणि शंतनूचा एक पेपर सामन्याच्या दिवशीच आला होता. तेव्हा पुढील प्रयत्नात हा पेपर सोडवायचा या बोलीवर मी शंतनूला सामना बघायची परवानगी दिली होती. त्यानंतर हे बोलणे झाले.              ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)               या प्रसंगाने मनात विचार आला की सलग शिक्षण होणं किती महत्त्वाचे आहे किंवा तेच महत्त्वाचे आहे का?       माझ्या स्वतःच्या जन्मदिनाकांची नोंद चुकीची झाल्याने मी सहा महिने आधीच शाळेत दाखल झालो. पण पहिल्या वर्षात अभ्यासाची गोडी लागलीच नाही. त्यामुळे एक वर्ष अनुत्तीर्ण झालो. पुन्हा पहिलीत एक वर्ष काढले. नंतर पहिलीपासून दहावीपर्यंत प्रत्

शहरातील बालपण

Image
    गेल्या दिवाळीच्या दिवसात चालत घराकडे येत होतो. वाटेत एक बाल स्वयंसेवक भेटला. त्याचं घरं जवळच होतं. तिथे केलेली गडाची प्रतिकृती बघायला त्याच्या घरी गेलो. बोलताना विषय निघाला प्रतिकृतीसाठी माती कुठून आणली? तेव्हा खटपट करून माती आणावी लागली असं त्याने सांगितलं. मग पुन्हा लक्षात आलं की शहरात सगळीकडे डांबरीकरण, सिमेंटीकरण झाल्याने माती मिळवण्यासाठी खटपट करावी लागते. काही वर्षांपूर्वी एका ठिकाणी 'किल्ल्यांसाठी माती मोफत दिली जाईल.' असा फलक काही वर्षांपूर्वी एका राजकीय कार्यकर्त्याने लावल्याचे वाचले होते.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शहरांचा विस्तार वाढला आहे. शहरातील शाळा शहराच्या जुन्या भागात एकवटलेल्या असतात. शाळेला येण्यासाठी पालकांचे वाहन, रिक्षा , व्हॅन, बस यापैकी एकाने यावे लागते. शहराच्या वेगवेगळ्या भागातून एका शाळेत येणारे काही विद्यार्थी दिसतात. हे विद्यार्थी शाळेत एकत्र असतात पण राहायला वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे घराजवळ समवयस्क मित्र राहतातच असे नाही. तसेच काही शाळांमध्ये मातीचे मैदानच नसते‌. त्यामुळे मातीत खेळ