Posts

Showing posts from November, 2025

महायोगी श्री अरविंद

Image
          महान विभूती स्वतःच्या जीवनाला स्वकर्तृत्वाने आकार देऊन जगात भर घालतात की त्यांचे जीवन हे एका व्यापक योजनेचा निश्चित भाग असतो हा एक प्रश्न आहे. महायोगी श्री अरविंद यांच्या जीवनचरित्रावरून गोष्टी योजल्याप्रमाणे घडतात असे म्हणावे लागते. त्यांच्या जीवनातील २४ नोव्हेंबर १९२६ या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी परमेश्वर संदेशाचे दिव्य अवतरण झाले अशी श्रद्धा आहे. हा दिवस 'सिद्धी दिन' म्हणून अरविंद आश्रमाच्या वतीने साजरा केला जातो.                   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      १५ ऑगस्ट १८७२ ते ५ डिसेंबर १९५० असे ७८ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले श्री अरविंद यांचे जीवन म्हणजे विधात्याच्या योजनेनुसार वळत गेलेला पुण्यप्रद जीवनप्रवाह आहे. त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष यांनी जाणीवपूर्वक अरविंद आणि त्यांच्या भावडांना भारतीय सनातन धर्म, संस्कृती, विचार यांच्याशी कोणताही संपर्क येऊ नये म्हणून इंग्लंडमध्ये रेव्हरंड यांच्या घरी ठेवले तरीही अरविंद अंत:करणात देशभक्ती उफाळून आली कारण 'झरा मूळ...

जिवाभावाचे असावे कोणीतरी

Image
     माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे. त्यामुळे समूहाने राहणे ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. आपला जन्म ,बालपण, नोकरी व्यवसाय या सगळ्या टप्प्यांतून आपले नातेसंबंध निर्माण होतात. यातील नाती ही रक्ताची असतात तर संबंध हे वेगवेगळ्या निमित्ताने येतात. परंतु या नात्यांपैकी किंवा संबंधांपैकी काही जणांची माणसाशी कळत नकळत जवळीक निर्माण होते आणि त्यातून जीवाभावाचे मैत्र तयार होते. वेळ प्रसंगाला, अडीअडचणीला हे मैत्र , ही नाती उपयोगी पडतात. पण काही वेळा परिस्थिती अशी येते किंवा निर्माण होते त्यावेळी असे जिवाभावाचे कोणी नाही याची खंत वाटते. त्याचा स्वाभाविक परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. तणावातून , निराशेतून काही दु:खदायक प्रसंग देखील घडतत.‌ अशा परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग काढला पाहिजे. याबाबतीतले माझे दोन अनुभव सांगावेसे वाटले म्हणून लिहिले आहेत.                 ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )         साधारण सहा-सात वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा योग आला. नोकरी निमित्ताने अन्य राज्यातील हा...

सहज, सोपं बोलणे लिहिणे

Image
        "जीवनातील व्यामिश्रतेचे व्यापक परिप्रेक्षातून अवलोकन केले तर परस्परसंबंधांची जटिलता अनिवार्य पद्धतीने समाजाच्या आंतरप्रवाहांवर अपरिवर्तनीय परिणाम करते आहे." हे वाक्य मी गंमत म्हणून सांगितल्यावर सोबतचे म्हणाले, "गाडे सर, याचा नेमका अर्थ काय?" संवादामध्ये सोपपणा असायला हवा ह्याबद्दल चर्चा सुरू होती.  त्या दरम्यान हा संवाद झाला.                        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       साधारणपणे सहज समजेल असे बोलणे सोपे असते अशी समजूत आहे. पण सहज सोपे बोलणे ही बघायला गेली तर अवघड गोष्ट आहे.‌ त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते. ते असेल तरच सोपेपणा शक्य होतो. काहीवेळा हा माणसाचा अंगभूत गुणदेखील असतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे उदाहरण याबाबत आदर्श आहे. रुढार्थाने न शिकलेल्या बहिणाबाईंना आयुष्याची विलक्षण समज होती. त्या शहाणपणातून त्यांच्या काव्यरचना सोप्या परंतु अर्थपूर्ण झाल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी ये...

मन झाले नितळ

Image
               ( काल्पनिक कथा )        ( मन झाले मोकळे या कथेचा पुढचा भाग. आधीची कथा कॉमेंटमधील दुव्यावर )         उद्यानातून परतल्यावर राजे विक्रमगुप्त निश्चयपूर्वक कामाला लागले. आपल्याकडे दिवस अतिशय थोडे राहिले आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणून कोणत्या क्रमाने गोष्टी करायच्या याचा विचार त्यांनी उद्यानात असतानाच करून ठेवला होता. परंतु या सर्व गोष्टी करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्या कराव्या लागणार होत्या कारण त्यांच्या बोलण्यातून अथवा कृतीतून येणाऱ्या प्रसंगाची कोणालाही कल्पना येऊ द्यायची नव्हती.          ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )      उद्यानातून परतलेले राजे विक्रमगुप्त जवळपास आधीसारखेच वागत आहेत हे राणी शीलवती यांच्या लक्षात आले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. गेले आठवडाभर त्यांच्याही जीवात जीव नव्हता. राजेसाहेबांच्या अस्वस्थतेमुळे त्यादेखील बेचैन झाल्या होत्या. मनात नाही नाही त्या शंका उपस्थित झाल्या होत्या. सगळ्यात मोठे दुःख राजेसाहेब ...