Posts

Showing posts from October, 2021

कै.आबा कुलकर्णी यांचे पुण्यस्मरण

Image
 "सुधीर, चहा प्यायला जाऊया." मी साताऱ्यात शिकायला असताना अवचित आबाची हाक यायची. आणि मग चहाच्या निमित्ताने गप्पागोष्टी व्हायच्या. जाड भिंगाचा चष्मा, मोठ्याने बोलायची सवय, खांद्यावर थाप टाकून बोलणे ही त्याची वैशिष्ट्ये.     साखरवाडी (ता.फलटण) या गावचा मी मूळचा स्वयंसेवक. शिक्षणाच्या निमित्ताने १९९० ते १९९४ ही चार वर्षे साताऱ्यात राहत होतो.याच दरम्यान माझा कै. विनायक शंकर कुलकर्णी म्हणजेच आबा यांचा परिचय झाला आणि बघता बघता या परिचयाचे दृढ संबंधांमध्ये रूपांतर झाले. या लेखाच्या निमित्ताने विचार करू लागलो की खरंच याचं काय बरं कारण असेल? इतक्या वर्षांनंतर पुन्हा विचार करताना असं वाटतं की माझ्यासारख्या बाहेरगावहून आलेल्या स्वयंसेवकाला आबांनी लावलेला जिव्हाळा वयाचं अंतर बाजूला सारून मी आणि माझे महाविद्यालयातील मित्र यांच्याशी केलेली मैत्री हीच त्याची प्रमुख कारणे असावीत. आबा आणि मी किंवा आबा आणि आम्ही मित्र यांच्या बाबत आठवू लागलो आणि अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.         आम्ही शिकत असताना सातारा शहरातील महाविद्यालयीन तरूणांची सहल वासोटा किल्ल्यावर काढली होती. या सहलीमध्ये आम्हा स

कमलाकर पंत गद्रे

Image
पाच फुटांच्या आतबाहेर उंची, गव्हाळ वर्ण, कुरळे केस, खर्जाकडे झुकलेला आवाज अशा शरीरप्रकृतीचे कमालकर महादेव गद्रे हे पंत गद्रे म्हणून संघस्वयंसेवकांना परिचित आहेत. १७/१०/२०२१ रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतनाचा संस्मरणीय कार्यक्रम साताऱ्यात झाला. यावेळी संघशरण कमलाकरपंत गद्रे हे पुस्तक प्रकाशित झाले. यात मी एक लेख लिहिला आहे.      सातारा शहरात मी १९९० ते १९९४ या काळात शिकायला होतो. या काळात मी दोन वर्षे सेनापती सायं शाखा मुख्य शिक्षक आणि एक वर्ष शहर कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले. याकाळात माझा आणि कमलाकरपंतांचा संबंध आला. ११ सप्टेंबर १९९३ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेतील भाषणाला १०० वर्षे झाल्यानिमित्त देशभर सर्वत्र कार्यक्रम करण्याची योजना केली गेली होती. त्यानिमित्ताने सातारा शहरातदेखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होतो. तिथेदेखील  प्राचार्यांच्या परवानगीने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वक्ते म्हणून पंतांना बोलावले होते. या कार्यक्रमात पंतांचे ब