Posts

Showing posts from January, 2022

जनजागृतीची आवश्यकता

Image
 पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागात प्राध्यापक असलेला माझा मित्र डॉ.संजयकुमार तांबे साधारण ६ वर्षांपूर्वी माझ्याकडे आला. त्याच्या अनुभवावर आधारित त्याला एक पुस्तक लिहायचे होते. त्याचे शब्दांकन मी करावे असे तो म्हणाला. त्याप्रमाणे त्याच्याशी बोलून मी शब्दांकन केले. पुस्तक प्रसिद्ध करताना मात्र काही कारणांमुळे शब्दांकन म्हणून माझे नाव प्रसिद्ध झाले नाही. त्या  ' कुमारी माता : वैद्यकीय व कायदेशीर तरतुदी' या पुस्तकात मी लिहिलेला लेख.    आज अल्पवयीन कुमारी मातांचा प्रश्‍न समाजासमोर आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर होत जाईल असे दिसत आहे; परंतु या प्रश्नाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे असे लक्षात येते. या आधीच्या प्रकरणांमध्ये आपण यासंदर्भातील वैद्यकीय कायदेशीर सामाजिक इत्यादी बाबींची माहिती घेतली; परंतु ह्या गोष्टी ज्यांच्यावर हा प्रसंग येतो त्यांनाच माहिती होतात. इतरांना याबाबत काहीच माहिती नाही असे लक्षात येते.     साधारणपणे बाराव्या-तेराव्या वर्षी मुलगी वयात येते (म्हणजे तिची मासिक पाळी सुरू होते.) तर मुलगा साधारणपणे पंधराव्या

स.प. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आठवणी

Image
  १९८८-९० या वर्षांमध्ये ११वी१२वीला शिकत असताना पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या वसतिगृहात रहात होतो.१ल्या वर्षी डॉ.वीरेंद्र घोगरे हा माझा रूमपार्टनर होता.(दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी वीरेंद्रचं हृदयविकाराच्या झटक्यांनं निधन झाले.) २ऱ्या वर्षी डॉ.विजय साठे हा माझा रूमपार्टनर होता. विजयची आणि बाकिच्यांची महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने १/०५/२०१६ ला भेट झाली.तेव्हा डॉ.वैभव मेहता याने आमचा हा फोटो काढला. मनात विचार आला. शिकतानाचे दिवस म्हणजे स्टेडियममधल्या गोल ट्रॅकवर पळण्यासारखं आहे तर नंतरचं आयुष्य विस्तीर्ण जंगलात आपापल्या वाटा धुंडाळण्यासारखं आहे. स्टेडियममधले ट्रॅक वेगवेगळे असले तरी आपण एकमेकाला दिसतो.भेटीगाठीदेखील सहज होतात.पण आयुष्याच्या वाटा वेगवेगळया झाल्या की आपण एकमेकांना सहज दिसतही नाही आणि भेटही होत नाही. ठरवल्याशिवाय भेटी अवघडच.महाकवी ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावसं वाटतं सागरात होते दोन ओंडक्यांची भेट एक लाट तोडी दोघा "आता ठरवून भेट" या वसतिगृहातील अनेक आठवणी माझ्या मनात कोरल्या गेल्या आहेत. प्रवेश घेतल्यानंतर सुरु

बोल जलमहर्षीचे...

Image
  मे २०१६ मध्ये ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या स्थापना दिनानिमित्त डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. तेव्हा ते म्हणाले... काही शैक्षणिक संस्थांच्या संचालकांकडे "silent arrogance" असतो. ज्ञानप्रबोधिनीच्या संचालकांकडे मात्र नम्रता आहे. अनेक ठिकाणी " विकासाचा अंध:कार" पोचला नाही तिथे काम करता येईल. " माझं शिक्षण मी काम सुरु केल्यांनंतर ३ दिवसात झालं.१ ला दिवस आधी शिकलेलं विसरण्यात गेला. २ रा दिवस गावं फिरून परिस्थिती पाहण्यात गेला. ३ ऱ्या दिवशी मला सांगितले गेले आयुष्यभर एकच काम करशील तर सिद्धी मिळेल." भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर संत, वैज्ञानिक, समाज यांचा सदाचार सक्रीय व्हायला हवा. "जलयुक्त शिवार" योजनेत नागरिकांचा निर्णयात आणि कामात सहभाग हवा. त्यामुळे टिकाऊ काम होईल. कंत्राटदार लाभासाठी काम करतात तर समाजाचा सहभाग असेल तर काम शुभ होईल. महाराष्ट्र हा निसर्गाचा लाडका मुलगा आहे. लाडका मुलगा बिघडला तर सुधारणे अवघड असते. जलसंधारणाचे काम केल्यावर पाणी एकदा पृथ्वीच्या पोटात गेलं की सूर्य ते चोरी करू शकत नाही. या पद्धतीने काम करत राहिल्यास

मला लाभलेले भाषा शिक्षक

Image
   लहानपणापासूनच मला भाषा विषयाचीसुद्धा आवड होती. मी भाग्यवान आहे असं मला वाटतं कारण मला लाभलेले भाषा शिक्षक अतिशय चांगले होते. साखरवाडी विद्यालय साखरवाडी प्राथमिक विभाग या शाळेत असताना इयत्ता चौथीपर्यंत आम्हाला गोसावीबाई होत्या. शिक्षणशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे उत्साहाने त्या शिकवत. त्यामुळे भाषेची ,कवितेची गोडी लागली. पाचवीला साखरवाडी विद्यालय साखरवाडी माध्यमिक विभाग या शाळेत प्रवेश घेतला. तिथे भाषा विषयासाठी आम्हाला खूप चांगले शिक्षक होते. मातृभाषा मराठी शिकवणारे ल.क. देशपांडे सर, ऐनापुरे बाई, हिं दी भाषा शिकवणारे श्री.व्यं. कुलकर्णी सर ( नेहमी अनमोल घडी चित्रपटाचं उदाहरण देऊन वेळेचं महत्त्व सांगायचे), न रगुंदेबाई, वीरकर बाई, इंग्लिश भाषा शिकवणारे न .चिं.बर्वे सर, स.रा. बोकील सर, श्रद्धा वाळिंबे बाई अ से सर्व भाषा शिक्षक आम्हाला समरसून शिकवायचे. या सर्वांवर मी छोटे छोटे लेख लिहिले आहेत. या सगळ्या शिक्षकांमुळे पाठ्यपुस्तकातील धडे कविता याबरोबरच अन्य पुस्तकांच्या वाचनाची देखील गोडी लागली आणि ती वाढतच गेली. अकरावी-बारावीला पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला मरा

काचेचे पेले

Image
    " काचेचे पेले आणू का? " वेटरने विचारले आणि आम्ही बुचळ्यात पडलो. काही क्षणानंतर खुलासा झाला. आमच्या डोक्यात प्रकाश पडला की काचेचे पेले म्हणजे तुम्ही दारू पिणार आहात का असे तो विचारतोय. आम्ही सांगितले की काचेचे नको स्टीलचे पेले आण.      मी साताऱ्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाची ही गोष्ट. बहुधा दुसऱ्या वर्षाला असताना एके दिवशी रात्रीच्या जेवणासाठी माझे मित्र प्रशांत डोंगरे, भास्कर वाळिंबे, स्नेहदीप करंदीकर, अभिजीत पंतोजी, संजय गायकवाड,  सचिन उपाध्ये, मी एका ढाब्यावर गेलो. त्यावेळी हा प्रसंग घडला.       अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टी वारंवार कानावर पडायच्या. त्यातली एक म्हणजे अभियांत्रिकीचा अभ्यास खूप असतो. त्यामुळे रात्रभर जागून अभ्यास करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे अभियांत्रिकीला शिकायला गेल्यावर सिगारेट प्यायची सुरूवात आपसूकच होते. मी मनाशी निश्चय केला की अभ्यासाचं नियोजन करायचे आणि करावं लागलं तर रात्री १२ पर्यंतच जागरण करायचं. तसेच व्यसनांपासून दूर रहायचं. मला दोन्ही गोष्टी जमल्या. आई,कै.बापू, संघ यांच्या संस्कारामुळे व्यसनांपासून त्यावेळीही दूर रा

सहलींचे अनुभव

Image
    " आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत का हे खात्रीने सांगता येत नाही,"प्रशांत भिरंगे म्हणाला. थंडीचे दिवस सुरू झाले होते.रात्र झाली होती. आजूबाजूला पाच सहा फूट वाढलेलं गवत होतं.आम्ही पायवाटेने राजमाची गडाच्या दिशेने चालत निघालो होतो. आमच्यापैकी केवळ प्रशांत भिरंगे हा त्यापूर्वी एकदा गडावर येऊन गेला होता.     गोष्ट बहुधा १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यातील आहे. त्यावेळी मी पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो आणि मंगळवार पेठेत राहत होतो संघाच्या रचनेत त्या भागाला शाहूनगर असे नाव होते. त्या शाहूनगरातील प्रतापादित्य या सायम् शाखेचा मी मुख्य शिक्षक म्हणून काम करत होतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये नगराच्या शाखांतील बाल म्हणजेच विद्यार्थी स्वयंसेवकांची सहल राजमाची या गडावर घेऊन जायची असे आम्ही ठरवले. सहल घेऊन जाण्यापूर्वी आधीच्या एका शनिवारी चार-पाच कार्यकर्त्यांनी जाऊन गड पाहून यायचा असे ठरविले. प्रशांत भिरंगे , प्रशांत हिंगे बहुधा केदार लोणकर आणि मी असे आम्ही पुण्यातून चारजण संध्याकाळी लोकल ट्रेनने निघालो आणि लोणावळ्याला उतरलो तेथे थोडे खाऊन, चहा घेऊन चालायला सुरुवात केली. साधारण दोन-अडी