Posts

Showing posts from June, 2022

मनातलं जनासाठी भाग १ ओळख

Image
  " अरे, काय यार? काय बोअर होतंय ना?" मनोज म्हणाला. " हो ना नुसता पकलोय, दोन दिवस!" विजयंत उद्गारला. शहरातील अतिशय सुखवस्तू भागातील भजनलाल रस्त्यावरच्या " बोस्टन काऊंटी"मधील हा गृप. कोणाचे आईवडील डॉक्टर, तर कोणी बिल्डर, तर कोणाचे वकील तर कोणाचा घरचा उद्योग. त्यांच्यासारख्या पॉश लोकांची ही त्यांच्याच स्टेट्सला शोभणारी ही बोस्टन काऊंटी. त्यामुळे नवनवीन गाडया, या ना त्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्या, शहरातल्या प्रत्येक मॉलमध्ये ट्रेंडिंग काय आहे याचे अपडेट्स ठेवून त्याप्रमाणे शॉपिंग प्लॅन करणारा हा गृप.थिएटरला तर बऱ्याचवेळा फर्स्ट डे चा शो बघायचा ही तर जणू नेहमीची गोष्ट. पण मधूनमधून सिटीत होणारे लाइव्ह परफॉर्मन्सला जाणं तर मस्टच. असा सगळा माहौल असलेल्या या ग्रुपचं नावही Enjo गृप. कशाला उगीच ते लांबलचक enjoyment असं म्हणायचं म्हणून हा Enjo गृप किंवा नुसताच E गृप. आणि त देखील वेगळ्या अर्थानं खरं होतंच. कारण सर्वच जण 24×7 ऑनलाइन असणारेच. त्यामुळे सतत E communication चालूच.त्यामुळंही हा e गृप. आता सदैव आनंदात असणाऱ्या या गृपमध्ये मनोज, विजयंत हे जणू ल

मएसोची १६१ वर्षांची उज्वल परंपरा - भावे प्राथमिक शाळा १२५

Image
           संपूर्णपणे भारतीयांनी सुरू केलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली अशा दोन विशेषणांनी वर्णन केले तर बहुधा भारतातील सर्वात जुनी शिक्षण संस्था ठरेल ती म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही होय. भारतीयांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी पहिलाच संघटित संघर्ष केला सन १८५७ मध्ये. त्यानंतर ३ वर्षांनी सन १८६० मध्ये महागावकर्स इंग्लिश क्लासेस या नावाने सुरू झालेल्या ज्ञानयज्ञाची  आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या द्रष्ट्या त्रयींनी पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या नावाने संस्थारूपात स्थापना केली. ब्रिटिशांना सशस्त्र संघर्षाद्वारे उखडून टाकण्याच्या प्रयत्नात सहभागी झालेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी थोड्याच वर्षांत संस्थेपासून वेगळे होत आपला स्वतंत्र मार्ग निवडला. परंतु भावे आणि इंदापूरकर या दोघांनी एकत्रितपणे अथक प्रयत्न करत या ज्ञानयज्ञाची ज्वाला प्रज्वलित ठेवली.            कालसुसंगत आधुनिक विद्या देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या आणि राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देण्याचा वारसा जोपासणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या वाटचाल

बदललेल्या पद्धती

Image
          नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झालो. कार्यक्रमातील व्यक्तीचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थितांपैकी बऱ्याच जणांनी पुष्पगुच्छ आणले होते. बोलताना सहज लक्षात आले की पूर्वी एखाद्याचे अभिनंदन करायचे असेल तर पुष्पहार घालून अभिनंदन केले जायचे. आता मात्र बहुतेक सगळ्या ठिकाणी पुष्पगुच्छ हाच दिला जातो. अपवादानेच एखाद्या ठिकाणी पुष्प हार घातला जातो. या बाबतीतली समाजातील पद्धत आता बदलली आहे.               मध्यंतरी एक संदेश आला, ' संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!' त्यावेळी देखील मनात आले पूर्वी साधारणपणे दिवाळीला नववर्षाला शुभेच्छा देण्याची पद्धत होती. आता होळी, एकादशी , जयंती, जन्मदिन, विशेषदिन अशा सर्व प्रसंगी शुभेच्छा देण्याची पद्धत पडली आहे. मी विचार करू लागलो की असे का झाले असेल. तर यात व्यापारी कंपन्यांचा त्यांच्या जाहिरातीचा मोठा परिणाम असावा असे वाटते. आपल्या उत्पादनांचा खप वाढावा ती जास्त वापरली जावीत या उद्देशाने अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये रुजवल्या गेल्या आहेत.          अशीच एक पद्धत एका दैनिकाच्या संपादकांच्या कल्पनेने आता चांगली रूढ झाली आहे. ती म्हणजे देवीच्या नवरात्रात न