Posts

Showing posts from September, 2022

बालपणीचा आनंद पुन्हा एकदा

Image
   काही दिवसांपूर्वी खरेदीला गेलो‌ असताना ह्या गोळ्यांचे एक पाकिट घेतले.         लहानपणी या गोळ्या खूप आवडायच्या. या गोळीला दूध गोळी असे बहुधा म्हटले जायचे. मी शाळेत असताना बहुधा २५ पैशांना ही एक गोळी मिळायची. याबरोबरच आणखी एक गोळी मला आवडायची. ती म्हणजे खोबरा गोळी. त्यावेळी एकूणच गोळ्या बिस्किटे यांचे कमी पर्याय उपलब्ध असायचे. पण बाल वयात तशा एकूणच कमी अपेक्षा असतात आणि त्याकाळी एकूणच समाज म्हणून देखील कमी अपेक्षा असायच्या असे म्हणायला वाव आहे. पण अशा साध्यासुध्या गोष्टीतच आनंद वाटायचा. या दोन गोळ्यांसोबत अजून काही गोळ्या मोठ्या प्रमाणावर मिळायच्या. त्या म्हणजे पेपरमिंट, लेमन अशा.  ५ पैसे १० पैसे अशा किमतीत मिळणाऱ्या गोळ्या बालपणी आनंद देऊन जायच्या. मग कधीकधी मित्रांनी एकमेकांना गोळ्या घेऊन द्यायच्या. कुणीतरी आणलेल्या गोळ्या सगळ्यांनी वाटून घ्यायच्या. अशा मित्रांनी वाटून खाण्याच्या अजून बऱ्याच गोष्टी होत्या.          असाच एक स्मरणीय कार्यक्रम असायचा तो म्हणजे फोटो काढण्याचा. आजच्या काळात जवळपास सर्वांकडे मोबाईल फोन असल्याने आता फोटो काढणे फारच सुलभ झाले आहे. पण त्याकाळी साखरवाडी सारख्

स्वामी विवेकानंद यांचे कालजयी विचार

Image
    भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद हे खऱ्या अर्थाने जगाचे मार्गदर्शक होत. जगामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा आढळून येतात. त्या म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चात्य. आपापल्या विचारधारेला अनुसरून त्या त्या देशातील माणसांनी आपापले आयुष्य व्यतीत केल्याचा वर्षानुवर्षांचा इतिहास आढळून येतो. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दोन्ही विचारधारानुसार जगणाऱ्या माणसांची गरज ओळखून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन केले. या निबंधाच्या मर्यादेत आपण स्वामीजींनी पौर्वात्य विचारधारेनुसार जगणाऱ्यांना म्हणजे प्रामुख्याने आपणा भारतीयांना जे मार्गदर्शन केले त्याचा विचार करूया. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेमधील आपल्या ११ सप्टेंबर १८९३ च्या भाषणाने स्वामीजी एका अर्थाने जगद्विख्यात झाले.  त्यानंतर सुमारे तीन ते साडेतीन वर्षे स्वामीजींनी पाश्चात्य देशांमध्ये भ्रमण केले. हे भ्रमण संपवून स्वामीजी ज्यावेळी भारतामध्ये परत आले त्यावेळी त्यांचे सर्वत्र अभूतपूर्व असे स्वागत झाले. या स्वागताला उत्तर देताना स्वामीजींनी जी व्याख्याने दिली त्या व्याख्यानांच्या आधारे त्यांचा आपणा भारतीयांना कोणता उपदे

मनातलं जनासाठी भाग १० : खाद्य उद्योग - उद्भवणारे प्रशन

Image
     नेहमीप्रमाणे ई गृप आज कट्ट्यावर जमला होता. गप्पा टप्पा सुरू होत्या. पण प्रत्युष आज शांत शांतच होता. कुणी त्याला थेट प्रश्न विचारला तरच तो बोलत होता आणि तेही मोजकंच. शेवटी निधीने त्याला विचारले,‌‌‌‌‌ " अरे, प्रत्युष काय झालं आज? एकदम गप्प गप्प आहेस अगदी ." " अगं आमच्याकडे त्या कमलामावशी येतात त्या माहिती आहेत ना तुला?" प्रत्युषने विचारले. " प्रत्युषने विचारले. " हो तर. त्या किती व्यवस्थित आणि चांगलं काम करतात. अचानक काय झालं त्यांना?" निधी म्हणाली.        एवढ्यात तिकडून प्रफुल्ल मुर्डी येताना दिसले. मग विजयंतने त्यांना हात केला आणि तो म्हणाला " हाय अंकल! कुठून येताय?" मुर्डी सांगू लागले, " अरे माझ्या ओळखीचे एकजण आहेत. त्यांच्याकडे गेलो होतो. त्या घरातील सर्वांना एकाचवेळी उलट्या आणि जुलाब सुरू झालेत कालपासून. " त्यांच्या मदतीसाठी गेलो होतो. " अरेच्चा अंकल, आमच्याकडे कामाला येणाऱ्या कमलामावशींच्या मदर इन लॉला पण असलाच त्रास सुरू झालाय. त्यांना हॉस्पिटलाइज केलंय म्हणून कमलाबाई कामावर आल्या नाहीत. त्यांच्या मदर इन लॉची तब्येत