Posts

Showing posts from July, 2024

शब्दांचे उच्चार

Image
           " ते काम्पुटर म्हणताएत!" एका बैठकीनंतर त्या बैठकीतील सहभागी असणारे एक जण दुसऱ्याबद्दल म्हणत होते. " असा माणूस कसा काय योग्य निर्णय घेऊ शकतो?" असा त्यांचा प्रश्न होता.         बऱ्याच वेळा व्यक्तींच्या उच्चाराबाबत अशी प्रतिक्रिया येते विशेषतः इंग्रजी शब्दांचे उच्चार न जमल्यास मराठी माणसाबाबत अशी प्रतिक्रिया तर हमखास येते याची अजून काही उदाहरणे म्हणजे काही जण विशेषतः कमी शिकलेले अथवा न शिकलेले लोक accident ला ऑक्सिजन, late ला लॅट, overhaul व्हराइलिंग( किंवा तत्सम)  असे उच्चार करतात. काही मेकॅनिक " गाडीचा मोसम तुटतो." असे म्हणतात यात ' मोसम' हा उच्चार ' motion' चा आहे की 'momentum' चा हे सांगणे कठीण आहे.त्यावेळी बऱ्याच शिकलेल्या लोकांची प्रतिक्रिया ही गंमत वाटण्याची, कमी लेखण्याची अथवा काही वेळा टर उडवण्याची असते. असे करणे बरोबरच आहे असे त्यातील बऱ्याच जणांना वाटते.  ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले छायाचित्र)         परंतु याबाबत विचार करण्यासारखे काही मुद्दे आहेत. एक तर इंग्रजी भाषा ही आपली मातृभाषा नाही. इतिहासा

कचऱ्याचे व्यवस्थापन

Image
    आपल्या कुठल्याही गावातून किंवा शहरातून बाहेर पडताना लगेच लक्ष वेधून घेतो तो अस्ताव्यस्तपणे टाकलेला कचरा. सर्व प्रकारचा मानवनिर्मित कचरा बेशिस्तपणे टाकलेला असतो. गावागावात आणि शहराशहरातदेखील छोटे मोठे कचऱ्याचे ढीग बघायला मिळतातच. ते बघताना वाटते 'जगी हा माजला कचरा'. कचऱ्याच्या या ढिगाकडे पाहताना वाटते की यातील पाने, फुले, फळे यासारख्या नैसर्गिक गोष्टी कोणत्या? पण अशा नैसर्गिक गोष्टी फारच कमी दिसतात. कचऱ्याचे असे ढीग बघताना अतिशय अस्वस्थ व्हायला होते.   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )   गेल्या काही वर्षांत प्लास्टिकचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वापर करून झाला की प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, वेष्टने सर्रासपणे फेकून दिल्याजातात. हे प्लास्टिक वर्षानुवर्षे तसेच पडून राहते. त्याचे विघटनही होत नाही. तशा अर्थाने प्लास्टिक हे 'चिरंजीव' आहे. कचऱ्याच्या ढिगामध्ये सगळ्यात जास्त असते ते प्लास्टिक. ते तसेच पडून राहते. वजनाला हलके असणारे प्लास्टिक वाऱ्यावर इतस्ततः पसरते. अशा ढिगावर चरणारी जनावरे त्यातील काही प्लास्टिक खातात आणि आजारी पडतात. याबरोबरच आणखी काही प्रश्नदेखील निर्म

पाण्याचा प्रश्न

Image
      सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यावर्षी सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे. आपला भारत देश भाग्यवान आहे. कारण गेली हजारो वर्षे येथे मान्सूनचा पाऊस नियमितपणे पडतो. त्याच्या आधारावर शेती बहरली आणि जनजीवन स्थिर झाले. संपन्नता व समृद्धी आली. परंतु गेली काही वर्षे मान्सूनमध्ये बदल होताना आढळतो आहे.  त्याचे प्रमाण, वितरण यामध्ये बदल जाणवू लागले आहेत. याचा परिणाम सहाजिकपणे जनजीवनावर होतो आहे. कारण जर पाणी पुरवठा सुरळीत असेल तरच जनजीवन फुलते म्हणून पाण्याला जीवन असेदेखील एक नाव आहे‌.     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       पाण्याबाबत असे म्हटले जाते की पूर्वी माणूस सहजपणे नदीचे पाणी येऊ शकत होता वापरू शकत होता. नंतर परिस्थिती बदलत गेली आता बऱ्याच ठिकाणी विहिरीचे ,आडाचे पाणी प्यावे लागते. याचेच एक नवीन रूप बोअरवेलचे पाणी प्यावे लागते. हळूहळू आता बाटल्यांमधूनच पाणी प्यायचे ही पद्धत रूढ होताना दिसतेय. साधारणपणे पंचवीस तीस वर्षांपूर्वी याची कल्पना देखील कोणी केली नव्हती आता ती स्वाभाविक स्थिती झाल्याचे आपण अनुभवत आहोत.      काही वर्षांपूर्वी एक बातमी वाचल्याचे आठवते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रा

वेळ पाळणे?!

Image
     काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो संयोजकांकडून आलेल्या निरोपाप्रमाणे बरोबर अकरा ते साडेअकरा असा वेळ देण्यात आली होती. त्याप्रमाणे पावणे अकरा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. त्यावेळी संयोजकांपैकी एका प्रमुख व्यक्तीचे भाषण सुरू होते. त्यांचेच भाषण बरेच लांबले सहाजिकच पुढील कार्यक्रम देखील लांबतच गेला. आम्हाला सांगितलेल्या वेळेपेक्षा जवळपास २५-३० मिनिटे उशीरा संधी देण्यात आली. कार्यक्रमातील सहभाग घेऊन आम्ही बाहेर पडलो. तेव्हा या उशिराबदद्दल आमची थोडी चर्चा झाली. त्यावेळी गंमतीने मी म्हटले, " आपल्याकडे कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाला तर तो वेळेवर उशिरा सुरू झाला असे म्हटले पाहिजे." त्याच्या पुढे उशीर झाला तर मग उशीरा उशीरा, खूप उशीरा, फारच उशीरा असे शब्द वापरले पाहिजेत." सोबतच्या व्यक्तीला देखील ते पटल्यासारखे झाले आणि तो हसला.      वेळ पाळण्याबाबतचा इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग हा छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आहे. मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केल्यानंतर मोगली फौजेच्या जोडीने महाराज आदिलशाही मुलखावर चालून जाऊ लागले. स्वरा

स्वामी विवेकानंदांची कार्यशैली

Image
   स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कार्याने पवित्र भारतभूमीला पुन्हा एकदा स्वत्वाची जाणीव करून दिली. आत्मविश्वास जागृत केला आणि शिकागो येथे १८९३ मध्ये भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून दिले. हे करत असताना त्यांची कार्यशैली कशी होती याबद्दल काही विचार मनात येतात.      ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       स्वामीजींचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस हयात असताना त्यांनी अनेक वेळा आपल्या प्रिय शिष्याला सांगितले होते की , " नरेन, तुला काली मातेचे कार्य करायचे आहे." परंतु ते नेमके कसे करायचे किंवा काय कार्य करायचे याबाबतची स्पष्ट कल्पना त्यांना मिळाली नव्हती. गुरूंच्या निधनानंतर सुमारे चार वर्षांनी स्वामीजी भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. भारताची परिक्रमा पूर्ण केल्यावर भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी येथे १८९२ च्या शेवटी त्यांना कार्याची स्पष्ट कल्पना मिळाली. त्यानंतर ते सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी तेथे आपला ठसा उमटवला. आपले कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी व्याख्याने देण्याचा

ही तर देवीची कृपा

Image
    भारतात सगुण उपासनेची दीर्घ परंपरा आहे. त्यामध्ये देवीची उपासना करणारे अनेक जण आहे. भारतामध्ये ५२ ठिकाणी देवीची शक्तीपीठे आहेत अशी श्रद्धा आहे. याशिवाय ठीक ठिकाणी ग्रामदेवतेच्या रूपामध्ये देवीची उपासना चालते. श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवीची उपासना करणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात.       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी विसाव्या शतकामध्ये लक्षणीय कार्य केले अशांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचेही नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात देवीच्या कृपेचे काही अनुभव लिहिले आहेत. यापैकी एक अनुभव असा. केशव सोळा सतरा वर्षाचा असताना १९०२ मध्ये त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि इंग्रजांच्या न्यायालयात नोकरी करून निवृत्त झालेल्या त्यांच्या आजोबांच्या म्हणजे तात्यांच्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनावर जीवन जगण्याचा खडतर प्रसंग त्यांच्या कुटुंबियांवर आला. ते पनवेल येथे राहत होते. केशवाने त्यावेळची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण व्हावे यासाठी त्यांच्या वडिलांचे स्नेही दत्तात्रय गणेश मेढेकर हे त्यांना आ