पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्गदर्शक दीपशिखा

काल पटलावर आपला ठसा उमटवून गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन एखाद्या दीपशिखेसारखे आहे. ही दीपशिखा तिच्या अंगभूत तेजाने तळपत आहे आणि समाजाला वाट दाखवत आहे. समाज जीवनाची उभारणी होताना काही जीवनमूल्यांची चौकट असणे नेहमीच आवश्यक असते. जगामध्ये वेगवेगळ्या मानव समुहांनी आपल्या समूहासाठी काही मूल्ये आपापल्या वाटचालीच्या, अनुभवांच्या आधारे निश्चित केली. ती जीवनमूल्ये पिढ्यानपढ्या संक्रमित होण्यासाठी काही पद्धती प्रथा परंपरा यांची निर्मिती केली. सर्व मानव समूहांना जगाच्या इतिहासात आपापले स्थान आहे. असाच एक प्राचीन मानव समूह भारतीयांचा आहे. भारताला हजारो वर्षांची जी अखंड परंपरा लाभली आहे. तशी परंपरा अन्य कोणत्या मानव समूहाला लाभली आहे याचे उत्तर नकारार्थी आहे. भारतीय मानव समूहाची जीवनमूल्ये ज्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेली दिसतात अशा महान व्यक्तींपैकी अहिल्याबाईंचे स्थान अद्वितीय आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) भारतीय समाज जीवनाचा पाया अध्यात्माचा आहे. जीवनाचे अधिष्ठान जेवढे लौकिक असावे अशी ...