Posts

Showing posts from September, 2025

परदेशप्रवास आणि शाकाहार

Image
     भारतामध्ये शाकाहाराला काही समाजवर्गांमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे भारतात सर्वत्र शाकाहारी अन्न सहजपणाने मिळते. विशेष अडचण येत नाही. परंतु अशा शाकाहारी व्यक्तींना ज्यावेळी परदेशी जाण्याची वेळ येते त्यावेळी मात्र अडचण होते. कारण परदेशात प्रामुख्याने मांसाहाराचा समावेश अन्नामध्ये होतो. याबाबत दोन ऐतिहासिक व्यक्तींचे अनुभव सांगणारा हा लेख आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       महात्मा गांधी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. ते निवारण्यासाठी परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणे हा पर्याय पुढे आला. तो पर्याय सगळ्यात जास्त योग्य वाटत होता. परंतु महात्मा गांधींच्या आई पुतळीबाई यांना आपल्या मुलाने परदेशी जाऊ नये असे वाटत होते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी गेल्यावर आपल्या मुलाचे राहणीमान बदलून जाईल. आपल्या कुटुंबाच्या परंपरेला धरून ते राहणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे महात्मा गांधी यांनी परदेशी जाण्यापूर्वी आपल्या आईला वचन दिले ते म्हणजे, " परदेशी मी मांसाहार...

संघाचे प्रचारक

Image
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण होत असताना संघाबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. तसे कुतूहलदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. संघाचे काम चालते कसे त्याचा विस्तार कसा होतो गेला याबाबत देखील बऱ्याच जणांना माहिती हवी असते. संघ कामाच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी संघाची असलेली प्रचारक यंत्रणा हा एक महत्त्वाचा घटक आहे.              ( पुस्तकाचे मुखपृष्ठ )         भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये हजारो वर्षापासून संन्यासी वर्गाचा उदय झालेला  बघायला मिळतो. लौकिक जीवनापासून दूर राहून परमेश्वर प्राप्तीसाठी निरंतर साधनारत असणारे अगणित साधू,संन्यासी होऊन गेले. असेच जीवन जगणारे अनेकजण आजही आहेत. या परंपरेचा धागा काही अंशाने संघाच्या प्रचारक व्यवस्थेत बघायला मिळतो. आपले कुटुंब, लौकिक आकांक्षा यांचा त्याग करून संघाच्या योजनेनुसार सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीचे पूर्ण वेळ काम करणाऱ्या  संघाच्या स्वयंसेवकांना 'प्रचारक' असे म्हणतात. यातील बरेच जण काही वर्षे 'प्रचारक' म्हणून संघकाम करतात आणि नंतर आपापल्या व्यावहारिक गरज...

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी

Image
       मध्यंतरी एक घरगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पदार्थ कसे झाले आहेत हे आधी चाखून बघायचे होते. ते करत असताना एक माझा फोटो काढला गेला. तो बघताना मनात विचार आला की कोणकोणते पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्याच्या आठवणी आहेत. तर वेगवेगळे पदार्थ आणि ते खाण्याचे प्रसंग आठवत गेले. त्यातील हे काही मोजके प्रसंग.       ( छायाचित्रकार कु.शंतनू गाडे )          मी त्यावेळी इयत्ता नववीमध्ये शिकत होतो. आमच्या साखरवाडीमधील शाखेची सहल पुण्यात काढली होती. त्या सहलीचे नियोजन त्यावेळचे फलटण तालुका प्रचारक श्री. मिलिंदराव फडके आणि साखरवाडीमधील संघाचे कार्यकर्ते श्री. संजयकाका वाळिंबे यांनी या सहलीचे नियोजन केले होते. वर्ष बहुतेक १९८७ असावे. पुण्यात लालमहाल, शनिवारवाडा, पर्वती, सिंहगड किल्ला अशा काही ठिकाणांना भेट दिल्याचे आठवते. याच पुण्याच्या सहलीत पहिल्यांदा पाणीपुरी हा प्रकार खाल्ल्याचे आठवते. तोपर्यंत साखरवाडीमध्ये कधी पाणीपुरी खाल्ल्याचे आठवत नाही. एका घासात मोठ्ठा आ करून ती एक पाणीपुरी खायची. पहिली खाऊन व्हायच्या आत पाणीपुरीवाल्याची पुढची ...

समुद्रावर स्वारी

Image
     'अनंत अमुचि ध्येयासक्ती किनारा, तुला पामराला' अशी ओळ कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत लिहिली आहे. त्यात कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की माणसाची ध्येयासक्ती इतकी मोठी आहे की समुद्राचा अफाट विस्तार तिला रोखू शकत नाही. समुद्र जरी विस्तीर्ण असला तरी देखील त्याला किनारा आहे. पण माणसाच्या इच्छाशक्तीला किनारा नाही. समुद्रावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन वेगवेगळ्या राजांची माहिती यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      यातील पहिले राजे म्हणजे प्रभू श्री राम! रावणाने कपट करून सीतामाईचे हरण केले. सुग्रीवाच्या मदतीने, हनुमंतांची योजना झाली . त्यातून सीतामाई लंकेत आहे हे समजले. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. श्रीराम , लक्ष्मण यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या संख्येने वानर सैन्य चालू लागले. शेवटी ते समुद्र किनाऱ्यावर पोचले. लंका हे समुद्रातील बेट असल्यामुळे समुद्राने वाट दिली तर पुढे जाता येणार होते. श्रीरामांनी तीन दिवस समुद्राची विनवण केली. परंतु समुद...

माणूस आणि निसर्गाचे सहजीवन

Image
        सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक श्री गणेश मूर्तीचे पूजन होते. श्री गणेशाची मूर्ती उंदीर असल्याशिवाय पूर्ण झाली असे मानले जात नाही.‌ मानव आणि अन्य प्राण्यांच्या सहजीवनाचे हे एक भारतीय उदाहरण आहे असे समजता येईल. अशाचे प्रकारे श्री  शंकराच्या पिंडीसोबत नंदी, श्री शंकराच्या मूर्तीसोबत साप, श्री विष्णुच्या मूर्तीबरोबर गरुड, श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीबरोबर गाय आणि कुत्रे आवश्यक मानले गेले आहेत. या प्राण्यांबरोबर देवी लक्ष्मीचे वाहन घुबड, देवी सरस्वतीचे वाहन हंस हीदेखील उदाहरणे आहेत. याचबरोबर पूजेसाठी वेगवेगळी पानेफुलेदेखील आवश्यक मानली गेली आहेत. ही प्रामुख्याने वैदिक हिंदू संस्कृतीमधील उदाहरणे आहेत.        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        पृथ्वीच्या पाठीवर मानवीजीवन हजारो वर्षांपासून सुरू आहे. पृथ्वीवर जशा अन्य प्राण्यांच्या जाती होत्या तशाच मानवप्राण्यांच्याही जाती होत्या. माणसाच्या जातींपैकी होमो सेपिअन्स या जातीने अन्य जातींना संपवले. यासाठी शक्त...