Posts

Showing posts from May, 2021

पुस्तक परिचय :- गोल्डा एक अशांत वादळ

Image
  लेखिका वीणा गवाणकर प्रकाशक इंडस सोर्स बुक्स, मुंबई नुकतेच हे पुस्तक वाचून पूर्ण केले. जवळपास दोन हजार वर्षे स्वतःचे राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय अढळ ठेवत ज्यू लोकांनी १४ मे १९४८ ला इस्त्राइल राष्ट्र पुन्हा उभे केले. हे उभे करण्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती अशांपैकी एक म्हणजे गोल्डा मायर(१८९८-१९७८). त्या इस्राईलच्याच्या १९६९-१९७४ या काळातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रवाही पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकातील भावलेले काही अंश ज्यांचे नाव गोल्डा यांना देण्यात आले त्या त्यांच्या पणजी ज्यूंच्या हालअपेष्टांची जाणीव रहावी म्हणून मीठ घालून चहा पीत असत. लहानपणी अमेरिकेत स्थलांतर झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी शाळेतील गरजू मुलांसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करून निधी जमा केला. पुढे मोठेपणी इसराइल साठी कोट्यावधी डॉलरचा निधी अमेरिकेतून उभा केला. संघटना, पक्ष यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या गोल्डा अर्धशिशीमुळे दोन दिवस विश्रांतीसाठी घरी राहिल्या तर त्यांच्या लहान असलेल्या मेनाहेम,सारा या मुला-मुलींना अत्यानंद झाला आणि त्यांनी दोन्ही दिवस दंगा-मस्ती केल

पुस्तक परिचय :- शहामतपनाह बाजीराव

Image
  लेखक :- कौस्तुभ कस्तुरे राफ्टर पब्लिकेशन्स मुंबई शहामतपनाह या शब्दाचा अर्थ शौर्य गाजवणारा किंवा शौर्यस्थान असा होतो. थोरले बाजीराव यांचा मोठा शत्रू निजाम उल मुल्कने या शब्दाने त्यांचे वर्णन केले आहे. या पुस्तकात आपल्याला प्रामुख्याने बाजीरावांनी केलेल्या लढायांचे वर्णन ऐतिहासिक संदर्भासह वाचायला मिळते. बाजीरावांच्या पराक्रमी कारकीर्दीतील महत्वाचे प्रसंग असे आहेत. फेब्रुवारी १७२८ मध्ये वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पालखेड येथे निजाम उल मुल्क याच्यावर मोठा विजय मिळवला. अतिशय चपळाईने वेगाने हालचाल करून निजामाला कोंडीत पकडले होते. माळवा या प्रांतामध्ये विजय प्राप्त करत असताना स्वत:च्या सरदारांवर ठेवलेला विश्वास दिसून येतो. स्वतःचे विशेष शिक्के राणोजी शिंदेेंना वापरायला दिले. वेळ प्रसंगी मल्हारराव होळकर यांना ते शिक्के वापरण्याची परवानगी दिली होती. माळव्यात प्रत्यक्ष नियंत्रण ठेवता येणार नाही हेेे लक्षात घेऊन मुत्सद्दीपणे होळकर, शिंदे, पवार ,बुळे, बुंदेले यासारख्या सरदारांकडे राज्यकारभार वाटून दिला. या सगळ्यातून बाजीरावांचे विकेंद्रीकरणाचे धोरण लक्षात येते. निजाम उल् मुल्क याची सातारा दर

रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद - भगिनी निवेदिता

Image
गुरूला दिवसा पहावे आणि रात्रीही पहावे अनेक वेळा तथाकथित आध्यात्मिक साधू, बुवा यांनी लोकांची फसवणूक केली असे लक्षात येते. त्या वेळेला जर बारकाईने माहिती घेतली तर असे आढळून येते की फसवल्या गेलेल्या लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवला.                                                                                ( रामकृष्ण परमहंस ) याबाबत रामकृष्ण परमहंस यांची एक आठवण अतिशय उद्बोधक आहे. एकदा त्यांच्या एका शिष्याच्या लक्षात आले की गुरुदेव रामकृष्ण परमहंस रात्रीचे उठून बाहेर निघाले आहेत. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. तो लपत-छपत त्यांच्या मागे गेला आणि ते कुठे जात आहेत हे पाहू लागला. झाले असे होते की रामकृष्णांना शौचासाठी बाहेर जायचे होते. त्यामुळे ते बाहेर पडले होते आणि ते बाहेर जाऊन परत येताना त्यांना हा शिष्य भेटला. त्यावेळेला ते त्याला म्हणाले, " गुरूला दिवसा पहावे गुरूला रात्री पाहावे ". ज्या व्यक्तीला आपण गुरू म्हणून मान्यता देणार आहोत त्याचे रात्रंदिवसाचे आचरण काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.                                                                         

स्वामी विवेकानंद - शेवटचे दिवस

Image
                                                                                      ( स्वामी विवेकानंद ) ४ जुलै १९०२ या दिवशी स्वामी विवेकानंदांचे निधन झाले. महान व्यक्तिंना त्यांच्या निधनाची पूर्वकल्पना असते असे वाटते. महाभारतामध्ये भीष्माचार्यांची गोष्ट आहे. त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता.त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मृत्यूचा दिवसही निश्चित केला होता. अनेक महान व्यक्तींबद्दल असे म्हणता येते.स्वामी विवेकानंदांना आपला निधनाचा दिनांक ४ जुलै असावा असे वाटत होते. त्या महिन्याच्या दिनदर्शिकेवर ४जुलैच्या दिनांकावर त्यांनी खूण करून ठेवली होती. दोन दिवस आधी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांना भेटायला आल्या. स्वामीजींनी त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांना प्रेमाने जेवू घातले. जेवण झाल्यानंतर स्वामीजींनी भगिनी निवेदितांच्या हातावर पाणी घातले. त्यांचे हात स्वतः पुसून कोरडे केले. स्वामीजींनी यापूर्वी असे कधीच केले नव्हते. तेव्हा भगिनी निवेदिता संकोचल्या.त्यांनी स्वामीजींना विचारले, "स्वामीजी आपण काय करता आहात?" स्वामीजी म्हणाले, " येशू ख्रिस्ताने नाही का त्याच्या शिष्यां

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग....(भाग ३ )

Image
                                                                                                ( स्वामी विवेकानंद ) ७ भारतभ्रमणाच्या काळात गाजीपुर येथे पवहारी बाबांशी नरेंद्राची भेट झाली. नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व पत्करावे असे ठरवले. सलग एकवीस दिवस रामकृष्ण नरेंद्राच्या स्वप्नात येऊन अश्रू ढाळत. त्यानंतर नरेंद्राने पवहारी बाबांचा अनुग्रह घेण्याचा विचार सोडून दिला. ८ भारतभ्रमणाच्या काळात एके दिवशी नरेंद्र स्नानासाठी नदीमध्ये उतरला. तेव्हा त्यांची वस्त्रे माकडाने पळवून नेली. नरेंद्र नग्नावस्थेत जवळच्या जंगलात माणसांपासून दूर जाऊ लागला. तेव्हा कुठून तरी एक व्यक्ती नवीन वस्त्रे घेऊन आला आणि त्याने ती वस्त्रे नरेंद्राला दिली. ९ भारतभ्रमणाच्या काळात एके दिवशी नरेंद्र आगगाडीतून प्रवास करीत होता. त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी ऐतखाऊ म्हणून नरेंद्राला हिणवले आणि भुकेल्या नरेंद्राला काहीही न देता स्वतः जेवण करू लागला. पुढील तारागढ यख स्टेशनवर जेव्हा गाडी थांबली तेव्हा त्या गावातील एक हलवाई मिठाई पुरी भाजी घेऊन आला आणि त्याने नरेंद्रला प्रेमाने जेऊ घातले. त्या हलवायाला विचारले अस

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग...(भाग २)

Image
                                                                           ( स्वामी विवेकानंद ) १ लहानपणी नरेंद्र सहजपणे ध्यानस्थ व्हायचा. ध्यानस्थ झाल्यानंतर त्याला आपल्या भुवयांच्या मध्ये प्रकाश दिसायचा. त्यावेळी त्यांना वाटे की सगळ्यांनाच असा प्रकाश दिसतो. पण नंतर खुलासा झाला की ही योग साधनेतील एक अवस्था आहे. साधनेच्या एका टप्प्यानंतर ती अनुभवायला येते. पण नरेंद्राला लहानपणापासूनच ही अवस्था अनुभवायला येत असे. २ गुरु रामकृष्ण यांच्याशी झालेल्या दुसऱ्या किंवा तिसर् ‍ या भेटीत रामकृष्णांनी नरेंद्राला(विवेकानंद हे नाव स्वामीजींनी जीवनात नंतर उशीरा धारण केले.) स्पर्श केला. त्यानंतर संपूर्ण विश्व गरगर फिरते आहे असा अनुभव नरेंद्राला येऊ लागला. हे काय होते आहे हे न समजल्याने नरेंद्र एकदम ओरडला , "तुम्ही हे काय करत आहात? मला घरी आई-वडील आहेत ना?" रामकृष्णांनी परत एकदा स्पर्श केला आणि या अनुभवातून नरेंद्राला बाहेर काढले. ३ नरेंद्राचे वडील बाबू विश्वनाथ दत्त यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दारिद्र्याची कुऱ्हाड कोसळली. अनेक दिवस उपास पडू लागले. यातून बाहेर पडण्यासाठी

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग.. (भाग १)

Image
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात २३,२४ आणि २५ डिसेंबर १८९२ हे तीन दिवस महत्त्वाचे होते. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांनी कोणते कार्य करायला सांगितले याचा शोध घेत कलकत्त्यातून बाहेर पडून भारताची परिक्रमा करून स्वामीजी कन्याकुमारी येथे पोचले. नावाड्याला देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून समुद्रातून पोहत जात श्रीपाद शिलेवर बसले. ध्यान लावले.                                                                                          ( स्वामी विवेकानंद ) तीन दिवस ध्यानावस्था राहिली आणि या ध्यानावस्थेत जीवित कर्तव्याचा साक्षात्कार त्यांना झाला. म्हणून ही लेखमाला. आज या शिलेवर विवेकानंद शिला स्मारक उभे आहे.                                                                           (  विवेकानंद शिला स्मारक ) स्वामीजींचे जीवन निःसंशयपणे प्रेरणादायक आहे. एका व्यक्तीच्या जीवनाबद्दल किती प्रकारे बोलता सांगता, अभ्यासता आणि अनुकरण करता येईल याचे हे विलक्षण उदाहरण आहे. साधारणपणे स्वामीजींचे शिकागोचे ११/०९/१८९३ चे भाषण किंबहुना त्यातील सुरुवातीचे संबोधन हे बहुतेक वेळा माहीत असते. परंतु स्वामीजींच्या जीवनातील अने

रामकृष्ण परमहंस जीवन "अंतिम सत्य एक मार्ग अनेक "

Image
  Bharat has got ancient philosophy that is darshan which says एकं सत् विप्रा: बहुधा: वदन्ति| which means that truth is only one but people understand/call it by many names. Bharat believes that you can attain the eternal truth by any path and all the paths are true. The same thing was told by by Swami Vivekananda in his famous speech on 11th September 1893. He referred to a shloka from Shivmahimna stotra रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां| नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव। which means ‘As the different streams having their sources in different places all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee.’ ( Link of the text of his speech https://belurmath.org/swami-vivekananda-speeches-at-the.../ ) This belief is not theoretical only but practiced by Bharatians for ages. Only one example There are many ancient Bhartiya ways for spiritual progress which