Posts

Showing posts from December, 2022

केसांची कहाणी

Image
    " ही पुढे आलेली बट फार कापायला नको." काही दिवसांपूर्वी केस कापायला गेलो असताना केशकर्तनकार गृहस्थ म्हणाले. " हो , ना! " मी म्हटलं. कारण पडलेलं टक्कल थोडं झाकायचं काम ही बट करते आहे हे त्यांना म्हणायचं होतं. थोडंसं हसू आलं.      ( गेल्या वर्षीच्या एका कार्यक्रमातील छायाचित्र)     एखादा माणूस पहिल्यांदा भेटला की सुरूवातीला नजरेत भरते त्याची उंची,आकारमान आणि असेल तर केशसंभार किंवा टक्कल! त्यामुळे पुरूषमंडळीदेखील स्वतःच्या केसांबाबत बऱ्यापैकी जागरूक असतात. वय वाढत जाते तसे केस हळूहळू पांढरे होत जातात. असे पांढरे होणारे केस काहीजणांना नको वाटतात. मग मेंदी लावणे, केसांना रंग लावणे असे प्रकार सुरू होतात. नियमितपणे रंग लावणारा एखादा माणूस एखाद्यावेळी रंग लावायला उशीर करतो. मग काही केस स्वतःचा नैसर्गिक रंग दाखवतात आणि बाकीच्यांना लक्षात येतं की त्या माणसाचे केस पांढरे झाले आहेत. काही जण फक्त डोक्यावरील केसांना‌ रंग लावतात आणि मिशांना‌ रंग लावत नाही किंवा लावायचे विसरतात. अशावेळी डोक्यावरील केस काळे आणि मिशा काळ्यापांढऱ्या असं थोडं गंमतीदार दिसतं.      १८ नोव्हेंबर २०२२ ल

लग्नसोहळ्यातील गमतीजमती

Image
    'तोरणदारी आणि मरणदारी जायलाच हवे' अशी आपल्याकडे जनरूढी आहे. तोरणदार म्हणजे ज्यांच्याकडे मंगल प्रसंग विशेषत: विवाह सोहळ्याचा प्रसंग आहे असे घर. अशाच काही लग्नसोहळ्यातील मी अनुभवलेले हे थोडे गमतीचे प्रसंग.   मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचा प्रसंग आला. त्याकाळी लग्नमंडपात खुर्च्या टाकण्याची फार पद्धत नसे. जमीनवरच गाद्या, सतरंज्या टाकलेल्या असत. लग्नातील शेवटची मंगलअष्टका झाल्यावर लोक जागेवरच डावीउजवीकडे फिरून बसत आणि जेवणासाठी पंगती तयार होत. आम्ही या लग्नात पहिल्या पंगतीला जेवायला बसायचे असे ठरवून गेलो होतो. लग्न लागले. आम्ही जेवढ्या तयारीत होतो त्यापेक्षा अन्य वऱ्हाडीमंडळी जास्त तयारीत होते. त्यामुळे आम्हाला पहिल्या पंगतीला बसायला जागा मिळाली नाही. म्हटलं काही हरकत नाही. आता दुसऱ्या पंगतीला बसू. पण आमची तयारी कमी पडली . आम्हाला दुसऱ्या काय पण तिसऱ्याही पंगतीला बसायला जागा मिळाली नाही. शेवटी मित्राने काहीतरी करून जिथे स्वयंपाक चालला होता त्याच खोलीत आम्हाला जेवायला बसवले.      संभाजीनगरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम क

एका प्रेरणादायक आणि आनंददायक प्रक्रियेतला सहभाग

Image
     " सुधीरजी , तुम्हाला यावर्षीच्या 'बाया कर्वे पुरस्कार ' निवड समितीमध्ये सदस्य म्हणून काम करायचे आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे मा.कार्याध्यक्ष श्री. रवी देव यांचा मला फोन आला. त्यांनी आग्रहपूर्वक केलेल्या सूचनेला नकार देणे हा पर्यायच नव्हता. तेव्हापासून या प्रक्रियेत मी सहभागी झालो.      गेली २६ वर्षे सलगपणे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलेला दरवर्षी २९ नोव्हेंबर या दिवशी 'बाया कर्वे पुरस्कार'  दिला जातो. हा पुरस्कार कोणाला द्यायचा यासाठी दरवर्षी वेगवेगळी समिती नेमली जाते. यावर्षीच्या २७ व्या पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिताताई घैसास , राष्ट्र सेविका समितीच्या श्रीमती पौर्णिमाभाभी शर्मा यांच्याबरोबर  सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. समितीच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांमध्ये आमच्याबरोबरच श्री.रवी देव, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विद्याताई कुलकर्णी,

म.ए.सो.चे महानाट्य 'वज्रमूठ' साकारताना

Image
      संपूर्णपणे भारतीयांनी सुरू केलेली आणि आजदेखील विस्तार पावत असलेली शैक्षणिक संस्था अशा दोन विशेषणांनी वर्णन केले तर ते बहुदा आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेला लागू ठरेल. संस्थेने सन २०२० मध्ये आपल्या वाटचालीचा शतकोत्तर हीरक महोत्सवी म्हणजे १६० वर्षांचा टप्पा पार केला. यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम संस्थेने आखले होते. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ते सर्व उपक्रम त्याच वर्षी पूर्ण करणे शक्य झाले नाही. यातील बहुतेक सर्व उपक्रम नंतर पूर्ण झाले. एक उपक्रम राहिला होता तो म्हणजे संस्थेची स्थापना करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची संस्था स्थापनेमागे असलेली भूमिका, त्यांनी केलेला त्याग आणि संघर्ष महानाट्याच्या रूपात साकारणे. त्याची तयारी २०१९ मध्येच सुरू झाली होती. संस्थेच्या नियमक मंडळाचे माजी सदस्य श्री भालचंद्र पुरंदरे यांचा महानाट्य याविषयातील अनुभव लक्षात घेऊन संस्थेच्या नियमक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी हे महानाट्य लिहिणे आणि साकार करणे ही कल्पना पुरंदरे सरांना स