Posts

Showing posts from December, 2023

स्वप्रतिमेचे प्रेम

Image
      मध्यंतरी एकदा रस्त्यावरून जाताना एका दुचाकीवरून दोघे जण मोठा आरसा घेऊन जाताना दिसले. मागे बसलेल्या माणसाला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब त्या आरशात दिसत होते. मनात सहज विचार आला की आरशात आपण स्वतःचेच प्रतिबिंब किती वेळ बघू शकतो. मग ग्रीक कथा आठवली ती नार्सीससची. अतिशय देखणा असलेला हा तरुण स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात अखंड बुडाला. तासनतास तो नदीकिनारी राहून स्वच्छ पाण्यामध्ये स्वतःचेच प्रतिबिंब बघत राही. शेवटी तिथेच त्याचा मृत्यू झाला. नदीकिनारी सापडणाऱ्या एका फुलाला नार्सिससचे नाव देण्यात आले आहे. तसेच जी व्यक्ती स्वतःच्याच प्रेमात बुडालेली असते. स्वतःचेच मोठेपण जिला अपरंपार वाटते. तिला मानसशास्त्रीय परिभाषेत 'नार्सीसस सिंड्रोम' असे म्हटले जाते. ( छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)       बऱ्याच वर्षांपूर्वी एका विचारवंतांचे वाक्य वाचनात आले होते, " एकाच वेळी तुमच्यासमोर आरसा आणि एखादी सुंदर व्यक्ती आली तर तुमचे पहिले लक्ष आरशाकडेच जाईल." कारण साधारणपणे माणसाचे स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असते. त्यानंतर मग इतरांवर. याबाबतीत माकडीण आणि तिचे पिल्लू यांची गोष्ट प्रसिद्ध आहे

स्वभाषेचा अभिमान

Image
      सर्व माणसांना पहिली भाषा ऐकायला येते आणि समजते ती म्हणजे मातृभाषा! ही भाषा स्वतःला व्यक्त करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरते. परंतु त्यासाठी या भाषेचा आग्रह धरणे आवश्यक आहे. ज्या देशांना परक्यांच्या गुलामगिरीचा सामना करावा लागला त्यांच्यासाठी हे फार आव्हानात्मक ठरते. या संदर्भात महापुरुषांच्या उदाहरणांनी काय करायचे हे आपल्याला लक्षात येते.       याबाबत छ.शिवाजी महाराजांचे उदाहरण प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे. शिवकालापूर्वी सुमारे ७-८ शतके भारतावर परकीय आक्रमणे होत होती. ही आक्रमणे सर्वंकष होती म्हणजे भूमी, माणसे, संस्कृती, भाषा, धर्म या सर्वांवर ही आक्रमणे होती. याचा परिणाम म्हणून दिल्लीच्या राज्यकर्त्यांच्या भाषा पर्शियन, फारसी याचा प्रचंड प्रभाव ( की दुष्प्रभाव ) मराठी भाषेवर पडला होता. या दोन्ही भाषेतील अनेक शब्द मराठीत प्रचलित झाले होते.  १६७४ मध्ये शिवरायांना राज्याभिषेक झाला. आपले सरदार रघुनाथपंत हणमंते (पंडितराव ) यांना महाराजांनी राज्यव्यवहारकोश तयार करण्याची आज्ञा केली. हणमंते यांनी आपले सहकारी धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्या मदतीने १६७६-७७ मध्ये दोन्ही परकीय भाषांना संस्कृत

पाश्चात्त्यांचा श्रेष्ठत्वाचा अहंगंड

Image
        " सर्वज्ञ असलेल्या ईश्वराने संपूर्णपणे कृष्णवर्णीय शरीरात आत्मा आणि तोही अमर आत्मा घातला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. .... हे लोक मनुष्य जातीत मोडतात ही गोष्ट अशक्य आहे." १८ व्या शतकातील फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५) याचे हे अवतरण काही दिवसांपूर्वी वाचनात आले आणि मी सुन्न झालो. माणसाला माणूस म्हणण्याचे नाकारणारे हे विचार दुःखद आणि चीड आणणारे आहेत. मॉन्टेस्क्यू हा अतिश्रीमंत सरंजामदार  युरोपच्या प्रबोधन काळातील फ्रेंच विचारवंत होता. फ्रान्समधील तत्कालीन राजेशाहीच्या बेबंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कारभाराबद्दल त्याने महत्वाचे विचार मांडले. विशेषतः कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे तीनही स्वतंत्र विभाग असले पाहिजेत. त्यांचा एकमेकांच्या कामात हस्तक्षेप असता काम नये हा महत्त्वाचा विचार त्याने मांडला‌. परंतु फ्रेंचांना कृष्णवर्णीयांना गुलाम करून उसाच्या मळ्यांतून संपत्ती कशी मिळवता येईल याचे समर्थन करताना त्याने वरील निंदनीय विचार मांडले आणि वसाहती करण्यासाठी समर्थन देणारा युक्तिवाद पुरवला. ( जगातील वसाहतींचा नकाशा सौजन्य विकिपीडिया)

युगनायकाचा जिव्हाळा

Image
         ' दुरून डोंगर साजरे ' अशी एक म्हण आहे. काही मोठी माणसे दुरूनच चांगली वाटतात परंतु जर त्यांच्याजवळ जाण्याचा प्रसंग आला तर त्यांच्यामधील सवयी या आपल्याला चांगल्या वाटत नाहीत असा या म्हणीचा आशय आहे. तसेच जी माणसे अतिशय बुद्धिमान असतात, ज्ञानमार्गी असतात ती अनेकदा इतरांशी रूक्षपणे वागताना दिसतात. परंतु याला अनेक अपवाद आहेत. यापैकी एक अपवाद म्हणजे युगनायक स्वामी विवेकानंद हे होत.        १८९३ मध्ये शिकागो येथील सर्व धर्म परिषदेच्या वेळी स्वामीजींची राहण्याची व्यवस्था जॉन लेयॉन या धनवंतांच्या घरी करण्यात आली होती. स्वामीजींना या घरात आपुलकीचा अनुभव आला. ते जॉन लेयॉन यांच्या पत्नी श्रीमती एमिली लेयॉन यांना मदर असे संबोधत. त्यांची नात कॉर्नेलिया कॉंगर हिने नंतर आपल्या आठवणी लिहून ठेवल्या. १८९३ मध्ये कॉर्नेलिया ही सहा वर्षांची होती. स्वामीजी तिच्याशी अगदी सहजपणे संवाद साधत. ती त्यांच्या मांडीवर बसत असे. त्यांना गोष्ट सांगण्याचा हट्ट करत असे. स्वामीजी ही तिचा हट्ट पुरवीत. वेगवेगळ्या गोष्टी ते तिला सांगत असत. भारताचे वर्णन करून सांगत असत.  स्वामीजींनी सांगितलेल्या भारताविषयीच्या ग