Posts

Showing posts from January, 2024

छ.शिवराय : व्यापाराबाबतची दूरदृष्टी

Image
        मध्ययुगीन काळात शेती व व्यापारावरील कर हेच महसुलाचे मुख्य साधन होते. यासाठी व्यापारी , सावकार यांचे राज्यकर्त्यांना महत्त्व वाटत असे. याबाबत शिवाजी महाराजांचे धोरण काय होते हे काही उदाहरणांवरून लक्षात येते.       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)      पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी इंग्रजांनी केलेल्या आतताईपणामुळे इंग्रजांचा एकूण दृष्टिकोन, व्यवहार शिवरायांनी चांगलाच ओळखला होता ते ओळखून त्यांच्याशी ते व्यवहार करत होते. याचेच एक विलक्षण उदाहरण आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी इंग्रजांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांबे विकत घेतले. आता व्यवहार पूर्ण करायचा तर याचे पैसे द्यायला हवेत. परंतु रायगडावर सद्यस्थितीत रोख रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे तुम्हाला गोवळकोंड्याची हुंडी देतो. ती तेथे जाऊन वटवा आणि पैसे घ्या असे महाराजांनी सांगितले. हुंडी घेऊन इंग्रजांचा माणूस रायगडावरवरून निघाला आणि मुंबईला पोचला. त्या काळात प्रवासाची साधने म्हणजे घोडा , पालखी इत्यादी असल्यामुळे एकूण प्रवासाला खूप वेळ लागत असे. इंग्रजांच्या त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे सर्व कारभार सुरतेहून चालत असे. म्हणून मुंबईचा इंग्रज अधि

छ.शिवराय : स्वामिनिष्ठांचा प्रामाणिकपणा

Image
  छ. शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी उभी केलेली स्वामिनिष्ठांची मांदियाळी.‌ स्वराज्याच्या कामासाठी सर्व प्रकारचा त्याग करायला तयार असणारे हजारो लोक त्यांनी उभे केले. यामध्ये " आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे" असे म्हणणारे तानाजी मालुसरे आहेत. " तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे आहेत. ' मातेस्तव धडही लढते संग्रामात ' असं ज्यांच्या आवेशाचं वर्णन केलं जातं ते मुरार बाजी देशपांडे आहेत. महाराजांच्या आज्ञेसरशी आखाड्यात उतरून पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेऊन त्याला लोळवणारे येसाजी कंक आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. अशी कणखर मनाची माणसे शिवरायांनी उभी केली. त्यांच्याबद्दल म्हणता येईल की, ' कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणे".           ‌( छायाचित्र सौजन्य अपूर्व सुरवसे )     या सगळ्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा पराक्रम, कर्तृत्व ते शिवरायांना सांगायचेच पण प्रसंगी आपल्या चुकादेखील सांगायचे. हा प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा

गुणसागर श्रीराम

Image
  आध्यात्मिकता हा प्राचीन भारताचा मूळ स्वभाव आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतातील व्याख्यानांमध्ये वारंवार याचा उच्चार केला आहे आध्यात्मिकतेचा हा प्रवाह नेमका किती वर्षांपासून वाहतो आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. आध्यात्मिकतेच्या या प्रवाहाची निर्गुण उपासना आणि सगुण उपासना अशी दोन अंगे आहेत. जनसामान्यांना निर्गुण तत्वाची उपासना करणे जड जाते. त्यासाठी आदर्श तत्त्व साकार रूपात त्यांना हवे असते. हा साकार रूपातील आदर्श म्हणजे श्रीराम! म्हणूनच ' रामो विग्रहवान् धर्मः' असे म्हटले जाते. म्हणजे राम हे धर्माचे रूप आहे. भारतभूमीच्या हजारो वर्षांच्या जीवनप्रवाहामध्ये या महामानवाने आपल्या जिवंतपणीच देवत्वाची मान्यता मिळवली असे ते  मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम! सार्वकालिक प्रेरणा देणारे असे श्रीरामांचे चरित्र आहे. या चरित्रातील अनेक गोष्टी सदैव मार्गदर्शक आहेत. 'चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ' हे लक्षार्थाने आणि वाच्यार्थानेही खरे आहे. त्यातील मोजकेच पैलू पाहूया. ( कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून काढलेले चित्र फेसबुक वरून साभार) राम चरित्र वाचताना अनेक मुद्दे लक्षात येतात त्या

छ.शिवराय : ध्येयासाठी भावनांची कठोरता

Image
   'भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी ' अशी बा.सी.मर्ढेकर यांच्या एका कवितेतील ओळ आहे. बऱ्याच वेळा माणसांच्या निर्णयावर भावनांचा प्रभाव दिसून येतो. विशेषतः आप्तस्वकीयांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीत तर विशेषत्वाने भावनाशीलता दिसून येते. ती भावनाविवशता देखील ठरते. परंतु छ.शिवराय वेळ प्रसंगी भावनांवर कठोर नियंत्रण ठेवत असत असे म्हणता येते.        २५ जुलै १६४८ यादिवशी विजापूरच्या दरबारी मंडळींनी शाहजीराजे बेसावध आहेत असे पाहून त्यांना कैदेत टाकले. शाहजीराजांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू झाले. शहाजीराजांच्या मुक्ततेसाठी शिवाजी महाराजांनी शाहजहान याला पत्र लिहून आपले वडील व आपण स्वतः मुघलांचे सेवक होऊन त्यांच्या वतीने दख्खनचा कारभार बघायला तयार आहोत अशा आशयाचे पत्र पाठवले आणि याबाबतचे फर्मान मिळवले. शाहजहानच्या दबावामुळे आदिलशाहने १६ मे १६४९ यादिवशी शाहजीराजांची सुटका केली. वाटाघाटींच्या पुढील टप्प्यात शहाजी राजांच्या मुक्ततेसाठी एकूण तीन किल्ले त्यांच्या दोन मुलांनी म्हणजेच संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांनी विजापूरच्या आदिलशाहला परत द्यावेत असे ठरले. संभाजीराजांनी बंगळूर आणि

कृतिशील महात्मा : स्वामी विवेकानंद

Image
  " ज्यांचे हृदय दुःखितांच्या वेदनेने कळवळते तोच खरा महात्मा" असे स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. स्वामीजींचे जीवन पाहिले की स्वामीजी हे देखील महात्मा होते असे निःसंशयपणे म्हणता येते.  दिनांक ११ सप्टेंबर १८९३ यादिवशी अमेरिकेत शिकागो येथे सुरू झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी केलेल्या भाषणाने स्वामीजींना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्या रात्री त्यांची निवासाची व्यवस्था शिकागोमधील प्रसिद्ध व्यक्ती श्री.जॉन लेयॉन यांच्या प्रसादतुल्य निवासस्थानी करण्यात आली होती. स्वामीजींची उत्तम बडदास्त त्या घरी ठेवण्यात आली होती. परंतु भारतातील दारिद्र्य आणि उपासमार यांच्या विचारांनी ते रात्रभर झोपू शकले नव्हते. त्यांच्या अश्रूंनी उशी पार भिजून गेली. व्याकुळ होऊन जमिनीवर पडून ढसढसा रडत ते म्हणू लागले, " जगन्माते माझी मातृभूमी कंगाल अवस्थेत असताना हे नाव - यश घेऊन मी काय करू? भारतीय समाजाचे उन्नयन कोण करेल? जगन्माते मी त्यांना कशी मदत करू शकतो, ते दाखवून दे!"       स्वामीजी केवळ बोलणारे नव्हते तर ' य: क्रियावान स पंडित:' या न्यायाने पंडित होते. अमेरिका व य

छ.शिवराय : स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आग्रह

Image
      " स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे." हे वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. या वाक्यामागची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांनी आपल्या आचरणांनी उदाहरणाने आणि कर्तृत्वाने ही प्रतिष्ठा जपल्याचे आपल्याला लक्षात येते. आपल्या दुर्दैवाने महाराजांची अतिशय मोजकीच पत्रे उपलब्ध होऊ शकली आहेत. त्यातील सर्वात पहिले पत्र सापडले आहे ते म्हणजे २८ जानेवारी १६४६ चे. त्यावेळी महाराजांनी वयाची सोळा वर्षेदेखील पूर्ण केलेली नव्हती. पुणे परगण्यातील रांझेगावच्या बाबाजी भिकाजी गुजर या पाटलाने बदअंमल केला.( म्हणजे व्यभिचार केला.) हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजले तेव्हा त्यांनी त्याला पकडून आपल्यासमोर हजर केले आणि त्याचे दोन्ही दोन्ही पाय तोडण्याची शिक्षा दिली. महाराजांनी केलेल्या शिक्षेची बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर काही काळाने मोसे खोऱ्याचा कुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने देखील बदअंमल केल्याचे उघडकीस आले. आता आपल्यालादेखील अशीच शिक्षा होणार हे लक्षात घेऊन रंगो त्रिमल मोऱ्यांच्या जावळीत पळून गेला. तिथेदेखील त्याला आपल्या जीवाची शाश्वती वाटत नव्हती. एके दिवशी तो भीतीनेच मेला असे तत्

छ.शिवराय : मानवाच्या प्रतिष्ठेचा आग्रह धरणारा महापुरुष

Image
          छ.शिवाजी महाराजांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायक आहे.‌ या महामानवाचे नवनवीन पैलू समजतात तसे आपण थक्क होतो. २०२३-२४ हे महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष. यानिमित्ताने मी पुन्हा एकदा महाराजांच्या उत्तुंग आयुष्यावरील व्याख्यानांचे श्रवण केले‌. पुस्तकांचे, लेखांचे वाचन केले. यातून महाराजांचा एक पैलू पुन्हा समजला. तत्कालीन भारतामध्ये माणसांना गुलाम करून विकण्याचे प्रचलन होते. यातून बादशहांना महसूलदेखील मिळे. युरोपियनांना स्वस्त कामगार मिळत. पण अशा या अमानुष व्यापाराला शिवरायांचा विरोध होता.               ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)           युद्धात जिंकलेल्या भूभागातील माणसांना गुलाम करून त्यांना नोकर म्हणून वागवणे अथवा त्यांची खरेदी विक्री करणे हे प्रचलन मोगल, तुर्क पठाण, हबशी या सर्व राज्यकर्त्यांमध्ये बघायला मिळते. तपन रायचौधरी या संशोधकाने स्थानिक साधनांच्या आधारे पुढील माहिती दिली आहे. '१६४५ मध्ये तंजावर,जिंजी आणि मदुराई येथील हिंदू नायक राजांचा विजापूरच्या मुस्लिम सैन्याने पराभव केला. त्यावेळी जवळपास दीड लाख लोकांना गुलाम करून विजापूर आणि गोवळकोंडा येथे नेण्यात आ