भावनांचा पेच (भाग १)

( काल्पनिक कथा ) " अगं मीनाक्षी, कुठं आहेस? मला माझे कागद पाहिजे आहेत." समीर हाका मारत तिला घरभर शोधत होता. शोधता शोधता तो बेडरूममध्ये पोचला. तिथल्या कपाटात तो आपले कागद शोधू लागला. काही महत्त्वाचे कागद तो शोधत होता. कपाटातील सर्व कप्प्यात तो ते शोधू लागला. शोधता शोधता तो मनाशी विचार करू लागला. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) ' वर्ष २००० आणि २००१ ही दोन वर्षे एकदम रोलरकोस्टर सारखी गेली. किती झपाट्याने घटना घडल्या.' समीर आणि प्रकाश ही नाना आणि माईंची दोन मुले. नाना आणि माई यांनी खटपट करून आपल्या मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं स्वतःच्या पायांवर उभे केले. एकाच आईबापांच्या पोटी जन्माला आलेली ही दोन मुले. पण स्वभाव, वागणं बोलणं यात मात्र किती फरक. समीर हा मोठा नेहमी शांत, गंभीर , मोजकं बोलणारा, आपलं काम बरं आणि आपण बरं अशा स्वभावाचा. तर दुसरीकडे प्रकाश मात्र उत्साही, बडबड्या सगळ्या गोष्टीत लक्ष घालणारा ,सतत काही ना काही खटपट करत असणारा. स्वभाव वेगवेगळे ...