Posts

Showing posts from September, 2021

भारताचे ध्येय

Up, India, and conquer the world with your spirituality! -Swami Vivekananda Lectures from Colombo to Almora स्वामी विवेकानंद यांनी भारतापुढे आपल्या ध्येयाची स्पष्ट कल्पना मांडली आहे. आध्यात्मिकतेच्या आधारावर सर्व जगावर विजय हेच ते ध्येय. कैक हजार वर्षांपासून आपल्या देशामध्ये आध्यात्मिकतेचा प्रवाह अखंडपणे वाहत आलेला आहे. अध्यात्मिक कथेचे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग असे विविध मार्ग आपल्या देशामध्ये सांगितले गेले आहेत. यापैकी कोणत्याही मार्गाने गेल्यास अंतिम सत्याची, ईश्वराची प्राप्ती होते हे नि:संदिग्धपणे वारंवार सांगितले गेले आहे. या मार्गांपैकी ती भक्तिमार्गाची अखंडित परंपरा आहे. अनन्यभावाने ईश्वराला शरण जाऊन त्याची भक्ती करण्यासाठी नवविधा भक्ती सांगितली गेली. भक्त लक्षणे सांगताना संत तुकाराम म्हणतात भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारुनी ॥१॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥धृ॥ निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । काहीच साकडे पडो नेदी ॥२॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे । घातलिया भय नरका जाणे ॥३॥ महाराष्ट्रामध्ये विविध संप्रदायांच्या भक्ती पर

पी.टी.

Image
       "आपला पाल्य वसतिगृहातील सक्तीचा व्यायाम करण्यास तयार आहे का?" गेली अनेक वर्षे म.ए.सो.महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रवेश अर्जावर हा प्रश्न लिहिलेला असतो. सर्व विद्यार्थी हो असा पर्याय निवडून प्रवेश घेतात. मग एका नवीन अनुभवाला सामोरे जातात.        साधारण २५-२६ वर्षांपूर्वी त्यावेळचे वसतिगृहप्रमुख प्रा.र.वि.कुलकर्णी सरांनी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम वसतिगृहात सुरू केला. आयुष्याच्या धकाधकीला सामोरे जाण्यासाठी शारीरिक क्षमता प्राप्त करून घेणे अतिशय आवश्यक आहे. या कल्पनेने शारीरिक क्षमता जोपासावी या हेतूने हा उपक्रम सुरू झाला. सकाळी ६ ते ६:३० या वेळात महाविद्यालयाच्या सत्रात अध्यापन सुरू असताना सक्तीच्या व्यायामाचा हा उपक्रम घेतला जातो. याच्या अंमलबजावणीमध्ये मुला-मुलींना सहभागी करून घेतले जाते. मुलांचा आणि मुलींची पी.टी.लीडर यांची निवड केली जाते. त्यांच्यावर पी.टी.घेण्याची जबाबदारी सोपवली जाते. कुलकर्णी सर , उमराणी सर यांच्यासोबत मी आणि आता मी आणि  डॉ.विनायक पवार सर मुलांच्या बरोबर मैदानावर असतो. महाविद्यालयाच्या मैदानावर पळत -चालत फेऱ्या मारणे, जलदगतीचे व्यायामप्र

सहल

Image
       " तुमच्या दृष्टीने मौजमजेला प्राधान्य तर आमच्या दृष्टीने सुरक्षिततेला प्राधान्य." दरवर्षी निघणाऱ्या वसतिगृहाच्या सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात.           वसतिगृहातील उपक्रमांमध्ये सहलीची प्रतीक्षा अनेक विद्यार्थ्यांना असते. दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यात वसतिगृहाची सहल शिवनेरी, लेण्याद्री, रायगड, महाबळेश्वर, पाचगणी, दिवेआगर, आक्षी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात असते. याच्या नियोजनात विद्यार्थी प्रतिनिधींचा सहभाग असतो. कामे वाटून दिली जातात. जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. इच्छुक मुलेमुली उत्साहाने सहभागी होत असतात. जाता येताना गाण्यांच्या भेंड्या, आरडाओरडा, दंगामस्ती असा सहभाग मुला-मुलींचा असतो. परंतु अशा या आनंदाच्या प्रसंगी सुरक्षितता राखणं महत्त्वाचं असतं. कारण उत्साहाच्या भरात एखादा प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळे सहलीपूर्वी सभा घेऊन मुला-मुलींना तपशीलवार सूचना दिल्या जातात. त्यांच्या उत्साहात मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत इकडे लक्ष दिलं जातं. सुदैवाने आजपर्यंतच्या सहली चांगल्या पद्धतीने पार पडल्या आहेत.           अशा सहलींमधील अनेक प्रसंग मला आठवतात. २००८ मध्य

भोजनालय

      वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भोजनालय. मी आमच्या वसतिगृहातील तसेच अन्य वसतिगृहांमधील बऱ्याच जणांना विचारलं की भोजनालयातील जेवण कसं असतं. बहुतेक वेळा उत्तर येतं की " ठीक असतं."      म.ए.सो.महाविद्यालयीन वसतिगृहातील भोजनालयदेखील याला अपवाद नाही. इथल्या वसतिगृहात भोजनालय चालवताना अनेक गोष्टी होत गेल्या, होत जातात, होत जातील.    मुख्य गोष्ट म्हणजे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या हातचे जेवण या भोजनालयात मिळत नाही. तसे ते कुठल्याच भोजनालयात मिळू शकत नाही. त्यामुळे भोजन हे 'ठीक आहे' या गटातीलच वाटणार. दुसरी गोष्ट भोजनाच्या बाबतीत कंत्राटदारांचा, त्यांच्या कामगार वर्गाचा आपलेपणा हा नेहमी मर्यादितच राहणार. भोजनाच्या बाबतीत 'संगती दोष' नावाचा एक दोष सांगितला जातो. त्यामध्ये भोजन बनवणाऱ्यांच्या विचारांचा परिणाम भोजनावर होतो असे लक्षात येते. हाच संगती दोष भोजनालयातील भोजनाच्या बाबतीत अनुभवायला येतो. भोजनालयात मध्यम तिखट, मध्यम मसालेदार असे भोजन बनवले जाते. काही मुला मुलींना खूप तिखट खायची सवय असते

काळजी घेऊया धास्ती नको...

Image
  " गाडे सर तुमच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर कोविड केअर सेंटर सुरू होते आहे असं ऐकलं." दुसऱ्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या आवारात राहणाऱ्या माझ्या एका परिचितांचा काळजीच्या सुरात साधारण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात फोन आला. मी उत्तर दिलं," तुम्ही चुकीचं ऐकलं. माझ्या घरापासून पाच मीटर अंतरावर हे सेंटर सुरू होत आहे." इथे आम्ही काय काय काळजी घेणार आहे हे मी त्यांना सांगितले. त्यांच्या घरापासून थोड्या लांब अंतरावर सुरू होणाऱ्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरच्या कल्पनेने थोड्या काळजीत पडलेल्या त्यांना जरा हायसं वाटलं. कोरोनाचा प्रसार वाढत जाणार हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणा मार्च महिन्यातच कामाला लागल्या होत्या. २१ मार्चलाच मा.जिल्हाधिकाऱ्यांनी वसतिगृह अधिग्रहित केल्याचा आदेश दिला होता. एप्रिल महिन्यात याठिकाणी सेंटर सुरू करण्याबाबत महानगरपालिकेचे मा.उपायुक्त मुठे साहेब स्वतः येऊन पाहणी करून गेले होते. पोलीस खाते,शिक्षण सहसंचालक यांच्या कार्यालयातून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता वसतिगृह कोविड केअर सेंटर होणार हे लक्षात