Posts

Showing posts from November, 2023

सेवामूर्ती बुधरी ताती

Image
 दैन्य विघटना दिसे सभोती, मनात सलते हे शल्य ते काढाया यत्न करावे, यातच जीवन साफल्य        ज्येष्ठ संघकार्यकर्ते कै. नानाराव पालकर यांच्या या ओळी ज्यांनी गेली अनेक दशके आचरणात आणून स्वतःच्या जीवनाला साफल्य प्राप्त करून दिले आहे, अशा अखंड सेवारत असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, श्रीमती बुधरी ताती. साक्षात सेवामूर्ती असणाऱ्या श्रीमती बुधरी ताती यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी या लेखाचा प्रपंच !  ( महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा वर्ष २०२२ चा बाया कर्वे पुरस्कार स्वीकारताना श्रीमती बुधरी  ताती )          भारताच्या छत्तीसगड राज्यातील दक्षिण बस्तरमधील गीदम ब्लॉकमधील हीरानार या गावी श्रीमती बुधरी ताती यांचा जन्म सन १९६९ मध्ये एका जनजाती परिवारात झाला. त्यांच्या घरात आध्यात्मिक वारसा वडिलांपासून चालत आला आहे बुधरी यांनाही आध्यात्मिकतेची आवड लहानपणापासून आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून गुमरगुंडा आश्रम दिव्य जीवनसंघाशी त्यांचा संबंध आला. या आश्रमातील स्वामी पूज्य सदाप्रेमानंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. जनसेवेच्या कार्याची प्रेरणादेखील आपल्या गुरूंकडूनच त्यांना मिळाली.            या

एक क्षण आनंदाचा

Image
   तसे तर प्रत्येक अंक महत्त्वाचा असतो. परंतु काही अंकांचे महत्त्व थोडे अधिक असते. आजचा माझ्या दृष्टीने असाच एक महत्त्वाचा अंक म्हणजे ५०००१ आज माझ्या ब्लॉगचे लेख कितीवेळा वाचले गेले याची संख्या ५०००१ अंक ओलांडून पुढे गेली.      ( आज सायंकाळी ७ च्या सुमाराची आकडेवारी)      दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांसंबंधी लेख लिहून मी ब्लॉग लिहिण्याला सुरुवात केली. विविध विषयांवर,  विविध निमित्ताने लेखन झाले. आप्तेष्ट,  मित्र , स्नेही, सहकारी, परिचित या सगळ्यांकडून या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनाला सुखावणारी ही गोष्ट आहे.      ब्लॉग सुरू करताना मित्रवर्य निखिल वाळिंबे याच्याशी चर्चा केली होती. खूप महत्वाच्या सूचना त्याने मला केला. त्याचा निश्चितच उपयोग झाला.       ( ब्लॉग वाचकांच्या स्थानांच्या संख्येचे विश्लेषण)         आज २४ नोव्हेंबर २०२३ रोजी वाचक संख्या ५०००१ च्या पुढे गेली. योगायोगाची गोष्ट अशी भगवान गौतम बुद्ध यांच्या करूणेचा प्रभाव ज्यांच्या मनावर होता आणि बुद्धांच्या विषयी अतिशय श्रद्धा भाव ज्यांच्या मनात होता त्या स्वामी विवेकानं

नरेंद्रनाथांचा स्वामी विवेकानंद होतानाचा प्रवास

Image
 श्री. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ( म्हणजेच नरेंद्रनाथ) या विख्यात गुरु शिष्यांचा या जगातील प्रत्यक्ष सहवास जेमतेम पाच वर्षांचा होता. स्वतःला निर्विकल्प समाधी हवी या इच्छेने नरेंद्रनाथ अतिशय व्याकुळ झाले होते. गुरूंच्या कृपेने त्याचा अल्पसा अनुभव नरेंद्रनाथांना मिळाला. परंतु " तुला कालीमातेचे कार्य पूर्ण करायचे आहे. ते पूर्ण झाले की मगच तुला संपूर्ण अनुभव मिळेल." असे सांगून रामकृष्णांनी १६ ऑगस्ट १८८६ ला देह ठेवला. ( छायाचित्र पुढील दुव्यावरून साभार https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Swami_Vivekananda%27s_Statue_at_Vivekananda_Road,_Kolkata.jpg)    आपल्या गुरु बंधूंना एकत्र घेऊन नरेंद्रनाथ वराहनगर येथे एका पडक्या घरात राहू लागले. यासाठी आवश्यक ती मदत रामकृष्णांचे गृहस्थी शिष्य करू लागले‌ जणू काही एक मठच वराहनगर येथे स्थापन झाला. परंतु गुरूंनी सूचित केलले आपले जीवित कार्य कोणते याबाबतची स्पष्टता नरेंद्रनाथांच्या मनात येत नव्हती. त्यामुळे जीवितकार्याचा शोध घेण्यासाठी म्हणून जुलै १८९० मध्ये नरेंद्रनाथ भारताच्या परिभ्रमणासाठी बाहेर पडले. सर्व गोष्टी अनिश्चित होत्य

मातीची महती

Image
       जगातील काही देशात स्वतःच्या देशाला पितृभूमी असे म्हटले जाते. परंतु भारतात प्रामुख्याने मातृभूमी असे म्हटले जाते. जगातील प्राचीन ग्रंथ असलेल्या अथर्ववेदात असे म्हटले आहे,‌‌  " माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः"  यातून भूमीविषयीचा मातृभाव स्पष्टपणे प्रकट झाला आहे. आपले शेतकरी बांधवदेखील सहजपणे मातीला काळी आई म्हणतात हे याच प्राचीन वृत्तीचे प्रकटीकरण आहे.       दुष्ट रावणाचा वध केल्यानंतर बंधू लक्ष्मणाला लंकेची भुरळ पडली. त्यावेळी प्रभू श्रीरामांंनी त्याला सांगितले. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।  जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥ सोन्याच्या लंकेचे मोल माता आणि मातृभूमी यांच्यापुढे काहीच नाही.  ( २५/१०/२०२३ मेरा देश मेरी माटी अभियान)       मातृभूमीबद्दलचा हा विलक्षण भक्ती भाव वेगवेगळ्या महान व्यक्तिंच्या जीवनामध्ये प्रकट झाला आहे. जुलमी इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी निरनिराळ्या माध्यमातून प्रयत्न केले. जाहीर भाषणांतून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. व्यापाराच्या माध्यमातून इंग्रज देशाची पिळवणूक करतात हे ध्यानात घेऊन

अटळ ते होणार

Image
          अनेक वेळा माणूस एखादी योजना करतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष घडेल असे मानत राहतो. बऱ्याच वेळा याप्रमाणे होते परंतु काही वेळा वेगळेच घडून जाते. नंतर मग हे इलाजाने किंवा नाईलाजाने मान्य करावे लागते की अटळ ते होणार. हिंदू विचाराप्रमाणे ब्रह्मदेव विश्व घडवतो म्हणून असे म्हटले जाते,  'होणारे न चुके कधीही जरी ये ब्रह्मा तया आडवा'.       प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या आयुष्यातील एक कथा सांगितली जाते. भास्कराचार्यांचा फलज्योतिष्याचादेखील अभ्यास होता. त्यांनी आपली मुलगी लीलावती हिची पत्रिका बघून तिला विवाहानंतर वैधव्य येणार आहे हे जाणले होते. तिच्या आयुष्यामध्ये एकच असा मुहूर्त होता की ज्या मुहूर्तावर तिचे लग्न झाले असते तर वैधव्य टळणार होते. भास्कराचार्य यांनी सर्व काटेकोर तयारी केली. परंतु वेळ दाखविणाऱ्या घटिका पात्रात तांदळाचा कण अडकल्यामुळे मुहूर्त साधला गेला नाही.   दुसऱ्या वेळेवर लग्न लागल्याने लीलावती हिला वैधव्य आले. पुढे भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवण्यासाठी ग्रंथ रचना केली ती प्रसिद्ध आहे.      मी छत्रपती संभाजीनगर येथे संघाचा प्रचारक असताना तेथील जेष्ठ कार्यकर्