Posts

Showing posts from February, 2024

शब्द प्रयोगांच्या गमतीजमती

Image
           मध्यंतरी एका शैक्षणिक बैठकीत असताना बरोबरच्या एका उद्योजकांना त्यांच्या कारखान्यातून वारंवार फोन येत होते. बैठक संपल्यानंतर ते म्हणाले,‌ " तिकडे आग लागली आहे!".असं त्यांनी म्हटल्याबरोबर सगळ्यांना एकदम धक्का बसला. मग लक्षात येऊन मी म्हणालो, " आग लागली म्हणजे काहीतरी तातडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. शब्दश: अर्थ घेऊ नका." मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं.         बरेच वेळा चर्चा करताना शब्द, वाक्प्रयोग यामुळे गडबडी होतात. त्यामुळे एका विचारवंतांने म्हटले आहे, " चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आपण व्याख्या निश्चित करूया." असे झाले नाही तर घोटाळे होतात.      काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे.‌ आमच्या वसतिगृहातील एक विद्यार्थिनी बाहेर एकेठिकाणी जाते असे सांगून दुसरीकडे गेली होती. हे नंतर लक्षात आल्यामुळे तिच्या वडिलांना मी भेटायला बोलावले. मी त्यांना म्हणालो, " तुमची मुलगी परवानगी एके ठिकाणची घेऊन भलतीकडेच गेली होती." भलतीकडे असं मी म्हणताच ते रागावले. आमच्या सातारा जिल्ह्यात 'भलतीकडे' हा शब्द 'दुसरीकडे' या अर्थानेही वापरतात. पण त

छ.शिवराय : गुणीजनांचे आश्रयस्थान

Image
       छ.शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात अतिशय प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कर्तृत्वाची माहिती जसजशी पसरत गेली तसतसे अनेक ठिकाणांहून गुणीजन आणि निष्ठावंत शिवरायांकडे आकर्षित झाले‌. यामध्ये सर्व स्तरातील लोक होते. बुद्धिमंत, कलावंत, सामान्य जन सर्वचजण स्वराज्याकडे खेचले गेले. महाराजांपाशी आपल्या कलागुणांचे चीज होईल, निष्ठेची कदर होईल अशी सर्वांना खात्री होती. त्यापैकी काही उदाहरणे पाहूया.        अफजलखानाच्या वधानंतर सुमारे १८ दिवसांत नोव्हेंबर १६५९ मध्ये महाराजांनी प्रतापगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत स्वतः विस्तार केला. या परिसरातील जनतेला शिवरायांच्या आचार विचार आणि धोरणामधील वेगळेपण, सच्चेपण भावले. यातच एक होते पन्हाळ्याजवळील नेबापूरचे शिवा काशीद. लोकांचे केशकर्तन उपजीविका करणाऱ्या काशीदांचे अनोखेपण म्हणजे ते शिवरायांसारखे दिसत. शिवरायांचा आणि काशीदांचा सहवास जेमतेम ६-७ महिन्यांचा. परंतु मोक्याच्या वेळी प्राण जाण्याची खात्री असतानाही शिवरायांची वेशभूषा करून ते सिद्दी जौहरला चकवा देण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले आणि शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी आत्माहुती पत्करली. त्यांचे बलिदान इतिहासात

छ.शिवराय : हिंदुंवरील आक्रमणाचा प्रतिकार

Image
  मध्ययुगीन काळातील मुस्लिम व ख्रिश्चन शासकांचा हेतू केवळ राज्य जिंकणे व संपत्तीची लूट करणे एवढेच होते असे मानणे भाबडेपणा ठरेल. धर्मप्रसार हा या राज्यकर्त्यांचा एक हेतू होताच. यासाठी अनेक क्रूर प्रकार केले जात. याची काही मोजकी उदाहरणे पाहूया.  फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये लिहितो,  " कालाबाग हे एक मोठे गाव आहे आणि येथे पुर्वी मुघल बादशहाला खंडणी देणारा एक मोठा राजा रहात असे. येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकडून आणि व्यापाऱ्यांकडून तो मोठ्या प्रमाणावर लूट गोळा करीत असे, परंतु औरंगजेब राज्यावर आल्यानंतर त्याने या राजाचा आणि त्याच्या बऱ्याचशा प्रजेचाही शिरच्छेद केला. गावातील मुख्य रस्त्यांच्या नजीक असंख्य खिडक्यांचे मनोरे बांधून प्रत्येक खिडकीवर ठार मारलेल्या माणसाचे डोके ठेवले आहे. प्रत्येक दोन फुटांवर एक-एक डोके याप्रमाणे ही डोकी सर्व मनोऱ्यावर लावून ठेवण्यात आली आहेत. माझ्या मागच्या प्रवासाच्या वेळेस म्हणजेच सन १६६५ रोजी मी कालाबागवरून गेलो तेव्हा हे हत्याकांड होऊन फार दिवस झाले नसावेत , कारण त्यावेळेस ही डोकी शाबूत होती आणि त्यातून अत्यंत घाणेरडा दर्प येत होता."        सन १५८६ चे

छ.शिवराय : शेती व महसूलविषयक धोरण

Image
       " महसूल न्यून होणे ही राज्याची सीर्णता. तो राज्यलक्ष्मीचा पराभव" असे वाक्य ऐतिहासिक साधनात वाचायला मिळते. त्यामुळे मध्ययुगात शेतीपासून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हेच राज्यकर्त्यांचे धोरण असे.  ( लाल महालातील शिल्प इंटरनेटवरून साभार )          शिवाजी महाराजांचे धोरण पाहण्यापूर्वी तत्कालीन अन्य राज्यकर्ते मोगल, आदिलशाह निजामशाह, कुतुबशाह यांचे धोरण पाहिले पाहिजे. या सर्वांच्या राज्यांमध्ये शेतीवर ६० % कर आकारणी होत असे. त्यामुळे लागवडीचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. तसेच जे शेतकरी सारा देऊ शकत नसत अशांवर पाशवी अत्याचार होत असत. त्यांची मुंडकी तोडून त्यांचे मिनार रचले जात असत. शिर नसलेली धडे झाडांना टांगली जात. पीटर मुंडी या इंग्लिश प्रवाशाने पाटणा ते आग्रा या प्रवासात जे मुंडक्यांचे मिनार पाहिले त्यातील मुंडक्यांची मोजदाद करून आठ हजार मुंडकी पाहिल्याचे लिहून ठेवले आहे. मुघलांचा मनसबदार अब्दुल्ला फिरोजजंग बहादूर याने १६३२ मध्ये स्वतःच लिहून ठेवले आहे की मी दोन लाख शेतकऱ्यांना ठार मारले आहे. औरंगजेबाने गुजरातचा सुभेदार १६६५ मध्ये रसिकदास करोरी, गुजरातचा दिवाण

गुरूंची सदैव सोबत

Image
    " माझे गुरु हे ज्ञानरूप आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. माझ्याकडून जे काही चांगले बोलले गेले याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे." असे विनम्र उद्गार स्वामी विवेकानंद यांनी काढले आहेत. संत तुकाराम आपल्या एका अभंगात असे म्हणतात, " जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया " या ओळींचा अनुभव स्वामीजींना सदोदित आला.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )  स्वामीजींचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या घशाच्या कर्करोगाचे निदान १८८५ मध्ये झाले आणि उपचारांसाठी त्यांना कोलकात्यामधील काशीपूर उद्यानात ठेवण्यात आले. त्यांच्या निधनाच्या काहीच दिवस अगोदर श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला, म्हणजेच स्वामीजींना, आपल्याजवळ बोलावले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून स्वतःच्या ठायी असणाऱ्या सर्व शक्ती स्वामीजींमध्ये संक्रमित केल्या. हे केल्यानंतर श्रीरामकृष्ण असे म्हणाले की ," नोरेन आता तुला मी सर्व काही देऊन फकीर झालो आहे." श्रीरामकृष्णांचे निधन झाल्यानंतर त्यांची तरुण शिष्य मंडळी वराहनगर येथील मठात एकत्रित राहू लागली. परंतु स्वामीजींना अद्याप आपल्या जीवित कार्याची पुरेशी स्पष