Posts

Showing posts from June, 2024

रामायणावरील दिनदर्शिका आणि चित्रफीत निर्मितीची गोष्ट

Image
      ५०० वर्षांच्या अविरत संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर होत असताना भारतात आणि जगभरात श्रीराम भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. त्यातील एक होते श्री सतीशजी, श्री. श्रीरंग, श्री. मुकुंद हे कुलकर्णी बंधू आणि त्यांच्या भगिनी सौ. उमा सामंत . मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किन्हई या गावातील असलेल्या कुलकर्णी कुटुंबीयांनी आपला मोठा उद्योग उभा केला आहे. औद्योगिक जगताबरोबरच सामाजिक कार्यातदेखील हे कुटुंब अग्रेसर आहे. कुलकर्णी कुटुंबांमध्ये रामभक्ती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यांनी किन्हईतील श्रीराम पट्टाभिषेक मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी केला आहे. श्री. सतीशजी कुलकर्णी आणि त्यांचे बंधू यांचे भरघोस सहकार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला नियमितपणे होत असते.  ( दिनदर्शिकेचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यांचे छायाचित्र )       २०२० मध्ये श्री. सतीश कुलकर्णी यांनी रामायणावर आधारित एक दिनदर्शिका बनवायची आहे असा आपला मानस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष आर्कि. राजीवजी सहस्रबुद्धे यांच्या कानावर घातला. भारतीय कालगणना आणि ग्रेगरियन का

छ. शिवराय : चिरकालासाठी प्रेरणास्रोत

Image
   "शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला | दहा दिशांच्या हृदयामधुनि अरुणोदय झाला || "   ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ! हीच आहे ती पवित्र मंगल प्रेरणादायक तिथी! संवत्सर होते आनंद नाम संवत्सर आणि शालिवाहन शके १५९६.  ग्रेगरियन कॅलेंडरनुसार दिनांक होता ६ जून १६७४. ( यावर्षी हा दिनांक २० जून २०२४ हा आहे.) याच दिवशी शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. वेदमंत्रघोषात त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करण्यात आला. या पवित्र भारतभूमीचे भाग्य पुनरपि उदयाला यावे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जो अविरत संघर्ष चालला होता त्याचा जणू हा सुवर्णबिंदूच!    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)    छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व, चरित्र, कर्तृत्व, विचार हे चिरकाल प्रेरणा देणारे आहे. शिवरायांनी जे ध्येय ठरवले होते ते केवळ महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशापुरते सीमित नव्हते तर त्यामागे अखिल भारतीय दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन आपल्याला शिकवतो की ध्येय नेहमी उत्तुंग ठेवा. परिश्रमांची पराकाष्ठा करा. कल्पकता नाविन्याची कास धरा. हे सर्व गुण सर्व कालात अनुकरणीय आहेत.    मध्ययुगातील धर्मवेड्या परकीय मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्

समासाच्या निमित्ताने...

Image
     काही महिन्यांपूर्वी इ.१२ वीच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून काम करत होतो. काम करताना एक गोष्ट पुन्हा लक्षात आली की बरेच विद्यार्थी उत्तरपत्रिका मिळाली की पानांवर असलेल्या समासाशेजारी आणि पानाच्या कडेला वर खाली पेन्सिलने आखून उत्तर लिहिण्यासाठी चौकट तयार करत होते. काहीजण तर उजवीकडे जवळपास एक इंचाचा समास आखत होते.  खरं तर उत्तरपत्रिकेत छापलेला समास पुरेसा असतो. पण उत्तराच्या सजावटीसाठी कुणाच्यातरी डोक्यातून ही कल्पना निघाली आणि आता ती बरीच रूळली आहे. अशी चौकट असल्याने उत्तरपत्रिका दिसताना चांगली दिसते आणि तपासताना परीक्षकाकडून जास्त गुण मिळतात अशी समजूत बहुधा पसरली आहे. पण या सगळ्यात कागद किती वाया जातो हे मात्र लक्षात घेतले जात नाही. तसेच गुण देताना उत्तराचा आशयच लक्षात घेतला जातो. अगदी अपवादात्मक परिस्थितीत सजावट विचारात घेतली जाते. हे काही ध्यानात घेतले जात नाही. मध्यंतरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एक फार बोधप्रद वाक्य ऐकण्यात आले. ते म्हणतात, " आशयगर्भ लेखनाला सजावटीची गरज नसते." हे अर्थपूर्ण वाक्य खरे तर सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा ल

लखलखीत अपवाद

Image
         अनुभव, निरीक्षण, परंपरा यांमधून काही नियम निर्माण केले जातात.  इंग्लिश भाषेत एक म्हण अशी आहे की, 'Exception proves the rule.' अपवाद हे नियम सिद्ध करतात. नियम सरसकट लागू होत नाही. अशा काही अपवादांचा विचार करता येईल.     ‌‌‌‌‌  विजेचा तीव्र धक्का बसला की माणसाचा मृत्यू होतो हा नियम आहे.‌ पण याला काहीजण अपवाद आहेत.‌ एक राज मोहन नायर या नावाची व्यक्ती आहे. त्यांच्यावर विजेच्या धक्क्याचा काहीही परिणाम होत नाही. गुगल, यूट्यूब यावर ' इलेक्ट्रिक मॅन ऑफ इंडिया ' या नावाने शोध घेतला तर ह्याचे व्हिडिओ, फोटो बघता येतात. विजेची तार तोंडात धरून ते दिवा पेटवणे यासारखी कामे करताना दिसतात. त्यावेळी लक्षात येते की हा एक अपवाद आहे.    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        अपवादाचे अजून एक उदाहरण संगीत क्षेत्रातील आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अद्भुत गोष्ट आहे. दीर्घकाळचे प्रयत्न, प्रयोग, परंपरा यातून ते विकास पावलेले आहे. या संगीतात रागदारीचे नियम हजारो वर्षांपासून ठरलेले आहेत. ते नियम पाळूनच गायन करता येते. ते नियम मोडणे योग्य मानले जात नाही. संगीत शिकणाऱ्या व्यक्तिकडून हे

पळसनाथ मंदिराला भेट

Image
 नुकताच सोलापूरला जाऊन आलो. बरेच वर्षे उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेले पळसनाथ मंदिराबद्दल ऐकले होते. यावर्षी ते मंदिर दुष्काळामुळे उघडे पडले आहे. सोलापूरवरून येताना ते पाहण्याची संधी आहे हे लक्षात आले. मग येताना ते पहायला गेलो.      पळसदेव गावातून आत गेलो. चौकशी केल्यावर समजले की तो रस्ता आता बंद केला आहे. पळसदेववरून पुण्याला येताना काळेवाडी नं. १ ह्या गावाचा फाटा लागतो. तिथून मंदिरापर्यंत जाता येते अशी माहिती मिळाली. त्या फाट्यावरून आत वळल्यावर साधारण २००-३०० मीटर रस्ता बरा आहे. नंतर बॅक वॉटर साठणाऱ्या भागातून जवळपास ५-६ किलोमीटर जावे लागले. तयार रस्ता नाही. पण गाड्यांच्या येणाजाण्यामुळे वाट‌ पडली आहे. त्यातून जावे लागले. ठिकठिकाणी खड्डे आहेत. त्याचे धक्के खात खात जावे लागते. थोडेफार खड्डे चुकवता येतात. पण काहींचा प्रसाद हा मिळतोच.  दुरून मंदिराचा कळस आणि मंदिरासमोरची भिंत दिसू लागली. मंदिरासमोरची भिंत सुमारे पन्नास फूट लांब आणि पंधरा फूट उंच आहे. तिचा जमिनीपासूनचा जवळपास सहा फूट भाग दगडी असून वरती वीटकाम केलेले आहे. आत गेल्यावर मंदिराची रचना लक्षात येते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारास