आचार्य अत्रे यांची सत्यकथांवर आधारित काही नाटके

तत्कालीन कवींवर लिहिलेल्या विडंबन कविता आचार्य अत्रे यांनी 'झेंडूची फुले' या पुस्तकात प्रसिद्ध केल्या. यामुळे हळूहळू साहित्य क्षेत्रात त्यांची कीर्ती वाढू लागली. आचार्य अत्रे हे राम गणेश गडकरी यांच्या प्रभावाखाली तयार झाले होते. गडकरी स्मृतिदिनाची अत्रे यांनी केलेली भाषणे, अत्रे यांचे शाळेतील प्रयोग, त्यांचे लंडनला जाऊन शिक्षणशास्त्र शिकून येणे, ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयावर भाषणे करणे यामुळे आचार्य अत्रे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) १९३३ मध्ये एके दिवशी त्या वेळच्या बालमोहन नाटक मंडळीचे प्रमुख दामू अण्णा जोशी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. अत्रे यांनी नाटक लिहावे असा यांनी आग्रह धरला. अत्रे यांनी तोपर्यंत व्यावसायिक नाटक लिहिलेले नव्हते. परंतु दामू अण्णा जोशी यांच्या आग्रहामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात आचार्य यात्रे यांचा प्रवेश झाला. स्वतःच्या प्रतिभेने आचार्य अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली. ती खूप लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांना एक प्रसिद्ध नाटककार म्हणूनदेखील ...