Posts

Showing posts from April, 2025

महात्मा बसवेश्वर : मानवी‌ मूल्यांचा आग्रह

Image
      ' हे जग असे का आहे?' असे विचारणाऱ्यांनी जगात बदल घडवून आणले आहेत. पण ' हे जग असे का नाही?' असे विचारणाऱ्या माणसांनी जगात जास्त बदल घडवून आणले आहेत. अशाप्रकारे बदल घडवून आणणाऱ्या महान व्यक्तींमध्ये महात्मा बसवेश्वर स्वतःच्या आगळ्या कर्तृत्वाने, तेजाने , विचारांनी, कार्याने उठून दिसतात. काल पटलावर त्यांनी स्वतःची ठसठशीत नाम मुद्रा उमटवली आहे.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       पृथ्वीवर मानवी जीवनाची सुरुवात झाली.  सुरुवातीच्या काळात भटकणारा माणूस वेगवेगळ्या ठिकाणी हळूहळू स्थिर झाला. त्यातून समाजांची निर्मिती झाली. जगभर सर्व समाजांमध्ये काळाच्या ओघात वेगवेगळ्या प्रकारचे भेद निर्माण झाल्याचे आढळते. कालांतराने हे भेद दृढमूल झाले. हे भेद मोडण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला.          महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य सनाच्या १२ व्या शतकामध्ये मंगळवेढा (जि. सोलापूर, महाराष्ट्र) , कूडलसंगम, बसवकल्याण (जि. विजयपूर ,कर्नाटक) या सीमावर्ती भागात घडले. १२ व्या शतकात एकूणच हिंदू समाजाला जातीभेद ,अस...

आचार्य अत्रे यांचे वक्तृत्व

Image
      आचार्य अत्रे यांच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी एक पैलू आहे तो त्यांच्या वक्तृत्वाचा! आपल्या हयातीत आचार्य अत्रे यांनी अनेक वेळा हजारो तर काही प्रसंगी लाखो श्रोत्यांपुढे भाषणे केली. दीर्घकाळ ती भाषणे लोकांच्या स्मरणात राहिली समाज मनावर त्यांचा ठसा उमटला आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       'विनोदी वक्ते' हा आचार्य अत्रे यांचा लौकिक सर्वत्र आहे. आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे, ' व‌क्त्याचा लौकिक हादेखील वक्त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग समजला पाहिजे.' आचार्य अत्रे यांचे आयुष्यातील पहिले भाषण इयत्ता चौथी केलेले आहे. हे भाषण वेगळ्या कारणाने विनोदी झाले. पाठ केलेले भाषण विसरल्यामुळे ते मध्ये मध्ये 'झालं' असं म्हणू लागले. थोड्यावेळाने वर्गातील सर्व विद्यार्थीदेखील त्यांच्यासोबतच 'झालं' 'झालं' असं म्हणू लागले आणि त्यामुळे सर्व जण हसू लागले. नंतर म.ए.सो. भावे हायस्कूलमध्ये शिकत असताना एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी संत तुकारामांच्या जीवनावर भाषण केले. एक छोटे चरित्र मिळवून ते पाठ करून ते भाषण खणखणीत आवाजात केले. त्...

आचार्य अत्रे यांचे काही चित्रपट

Image
      नाट्य क्षेत्रात मिळालेल्या यशामुळे आचार्य अत्रे यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली. त्यातून त्यांचे चित्रपट लेखन सुरू झाले. सुरुवातीला दादासाहेब तोरणे, विश्राम बेडेकर यांच्यासाठी त्यांनी प्रत्येकी एक पटकथा लिहिली. परंतु दिग्दर्शकांनी त्या पटकथेत पुष्कळ दुरुस्त्या केल्या. ते आचार्य अत्रे यांना पटले नाही म्हणून त्यांनी चित्रपटासाठी कथा लेखन करायचे नाही असे ठरवले. पण नंतर 'हंस पिक्चर्स' संस्थेच्या निमित्ताने त्यांची बाबुराव पेंढारकर , मास्टर विनायक यांच्याशी ओळख झाली आणि चित्रपट लेखनाला सुरुवात झाली. त्यातून त्यांनी धर्मवीर, ब्रम्हचारी, ब्रॅंडीची बाटली, अर्धांगी अशा काही चित्रपटांच्या कथांचे लेखन केले. हे चित्रपट पुष्कळ प्रसिद्धीस आले.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       यानंतर नवयुग चित्रपट कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये हे सर्वजण संचालक म्हणून सहभागी झाले. परंतु या कंपनीच्या कामकाजात मतभेद झाल्यानंतर अत्रे बाहेर पडले.       पण चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा अत्रे यांना स्वस्थ बसू देत नव्हती...

आचार्य अत्रे यांची सत्यकथांवर आधारित काही नाटके

Image
      तत्कालीन कवींवर लिहिलेल्या विडंबन कविता आचार्य अत्रे यांनी 'झेंडूची फुले' या पुस्तकात प्रसिद्ध केल्या. यामुळे हळूहळू साहित्य क्षेत्रात त्यांची कीर्ती वाढू लागली. आचार्य अत्रे हे राम गणेश गडकरी यांच्या प्रभावाखाली तयार झाले होते. गडकरी स्मृतिदिनाची अत्रे यांनी केलेली भाषणे,  अत्रे यांचे शाळेतील प्रयोग, त्यांचे लंडनला जाऊन शिक्षणशास्त्र शिकून येणे,  ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयावर भाषणे करणे यामुळे आचार्य अत्रे प्रसिद्धीच्या झोतात आले होते.  ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       १९३३ मध्ये एके दिवशी त्या वेळच्या बालमोहन नाटक मंडळीचे प्रमुख दामू अण्णा जोशी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. अत्रे यांनी नाटक लिहावे असा यांनी आग्रह धरला. अत्रे यांनी तोपर्यंत व्यावसायिक नाटक लिहिलेले नव्हते. परंतु दामू अण्णा जोशी यांच्या आग्रहामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात आचार्य यात्रे यांचा प्रवेश झाला. स्वतःच्या प्रतिभेने आचार्य अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली‌. ती खूप लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांना एक प्रसिद्ध नाटककार म्हणूनदेखील ...

छ. शिवराय आणि पाश्चात्य योद्धे

Image
       चैत्र पौर्णिमा शके १६०२ रौद्र नाम संवत्सर म्हणजेच ३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला. एक अलौकिक महापुरुष पंचतत्वात विलीन झाला. हिंदवी स्वराज्यावर दुःखाची अतीव छाया पडली. या महापुरुषाचे वेगवेगळे गुण सर्वकालिक आदर्श आहेत. त्यातील त्यांचा युद्ध कौशल्याचा गुण देखील निर्विवाद आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        छत्रपती शिवरायांचा पराक्रम अतिशय जबरदस्त होता. त्यांच्या तलवारीच्या धाकामुळे शत्रूच्या हृदयात धडकी बसत असे. कविराज भूषणाने तर अशी कल्पना मांडली की 'शंकराचे गण, भूत, पिशाच्च  हे एकमेकांशी आनंदाने संवाद करीत निघाले आहेत. या आनंदाचे कारण असे की शिवरायांनी कोणातरी शत्रूवर चाल केली आहे. तिथे शिवरायांच्या पराक्रमामुळे प्रेतांचा खच पडेल आणि तो आपल्याला उपयोगी पडेल म्हणून हे सर्वजण आनंदित आहेत.            शिवरायांच्या जन्मापूर्वीच पाश्चात्य देशांनी भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करायला सुरुवात केली होती. काही देशांनी व्यापारी म्हणून भारतात बस्तान ब...

आचार्य अत्रे यांचा विद्यार्थी दशेतील खोडकरपणा

Image
     आचार्य अत्रे हे लहानपणापासूनच खोडकर वृत्तीचे होते. आपल्या शालेय आयुष्यातील खोडकरपणाचे काही प्रसंग त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहेत.       त्यांचे वडील केशवराव अत्रे काही काळ सासवड मुन्सिपलिटीमध्ये नोकरी करत होते. त्यांना बिडी ओढण्याची सवय होती. त्यांचे एक मित्र नेहमी घरी येत आणि दोघे मिळून बिड्या ओढत असत. अत्रे यांनी एके दिवशी बिडीच्या बंडलांमधील काही बिड्या काढून त्यात फटाक्यांतील दारू भरली आणि त्या पुन्हा बंडलामध्ये ठेवून दिल्या. त्यांचे वडील आणि मित्र बिड्या ओढू लागल्यानंतर साहजिकच त्याचा स्फोट झाला. नंतर अर्थातच अत्रे यांना भरपूर मार  मिळाला.       अत्रे मराठी शाळा शाळेतील म्हणजे आजच्या भाषेतील चौथीचे शिक्षण पूर्ण करून इंग्रजी पहिलीत दाखल झाले. आपल्याला खूप इंग्रजी यायला लागले असा त्यांना फाजील आत्मविश्वास वाटू लागला. ते शिकलेल्या मराठी शाळेत एक दिवशी इंग्रजी अधिकारी येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये Welcome असे लिहिले होते. त्यामध्ये एक L कमी असून ते Well Come असे लिहिले पाहिजे असे अत्रे यांनी ...