Posts

Showing posts from April, 2025

आचार्य अत्रे यांची सत्यकथांवर आधारित काही नाटके

Image
      तत्कालीन कवींवर लिहिलेल्या विडंबन कविता आचार्य अत्रे यांनी 'झेंडूची फुले' या पुस्तकात प्रसिद्ध केल्या. यामुळे हळूहळू साहित्य क्षेत्रात त्यांची कीर्ती वाढू लागली. आचार्य अत्रे हे राम गणेश गडकरी यांच्या प्रभावाखाली तयार झाले होते. गडकरी स्मृतिदिनाची अत्रे यांनी केलेली भाषणे,  अत्रे यांचे शाळेतील प्रयोग, त्यांचे लंडनला जाऊन शिक्षणशास्त्र शिकून येणे,  ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयावर भाषणे करणे यामुळे आचार्य अत्रे प्रसिद्धीच्या झोतात आले होते.  ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       १९३३ मध्ये एके दिवशी त्या वेळच्या बालमोहन नाटक मंडळीचे प्रमुख दामू अण्णा जोशी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. अत्रे यांनी नाटक लिहावे असा यांनी आग्रह धरला. अत्रे यांनी तोपर्यंत व्यावसायिक नाटक लिहिलेले नव्हते. परंतु दामू अण्णा जोशी यांच्या आग्रहामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात आचार्य यात्रे यांचा प्रवेश झाला. स्वतःच्या प्रतिभेने आचार्य अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली‌. ती खूप लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांना एक प्रसिद्ध नाटककार म्हणूनदेखील ...

छ. शिवराय आणि पाश्चात्य योद्धे

Image
       चैत्र पौर्णिमा शके १६०२ रौद्र नाम संवत्सर म्हणजेच ३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला. एक अलौकिक महापुरुष पंचतत्वात विलीन झाला. हिंदवी स्वराज्यावर दुःखाची अतीव छाया पडली. या महापुरुषाचे वेगवेगळे गुण सर्वकालिक आदर्श आहेत. त्यातील त्यांचा युद्ध कौशल्याचा गुण देखील निर्विवाद आहे.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        छत्रपती शिवरायांचा पराक्रम अतिशय जबरदस्त होता. त्यांच्या तलवारीच्या धाकामुळे शत्रूच्या हृदयात धडकी बसत असे. कविराज भूषणाने तर अशी कल्पना मांडली की 'शंकराचे गण, भूत, पिशाच्च  हे एकमेकांशी आनंदाने संवाद करीत निघाले आहेत. या आनंदाचे कारण असे की शिवरायांनी कोणातरी शत्रूवर चाल केली आहे. तिथे शिवरायांच्या पराक्रमामुळे प्रेतांचा खच पडेल आणि तो आपल्याला उपयोगी पडेल म्हणून हे सर्वजण आनंदित आहेत.            शिवरायांच्या जन्मापूर्वीच पाश्चात्य देशांनी भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करायला सुरुवात केली होती. काही देशांनी व्यापारी म्हणून भारतात बस्तान ब...

आचार्य अत्रे यांचा विद्यार्थी दशेतील खोडकरपणा

Image
     आचार्य अत्रे हे लहानपणापासूनच खोडकर वृत्तीचे होते. आपल्या शालेय आयुष्यातील खोडकरपणाचे काही प्रसंग त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहेत.       त्यांचे वडील केशवराव अत्रे काही काळ सासवड मुन्सिपलिटीमध्ये नोकरी करत होते. त्यांना बिडी ओढण्याची सवय होती. त्यांचे एक मित्र नेहमी घरी येत आणि दोघे मिळून बिड्या ओढत असत. अत्रे यांनी एके दिवशी बिडीच्या बंडलांमधील काही बिड्या काढून त्यात फटाक्यांतील दारू भरली आणि त्या पुन्हा बंडलामध्ये ठेवून दिल्या. त्यांचे वडील आणि मित्र बिड्या ओढू लागल्यानंतर साहजिकच त्याचा स्फोट झाला. नंतर अर्थातच अत्रे यांना भरपूर मार  मिळाला.       अत्रे मराठी शाळा शाळेतील म्हणजे आजच्या भाषेतील चौथीचे शिक्षण पूर्ण करून इंग्रजी पहिलीत दाखल झाले. आपल्याला खूप इंग्रजी यायला लागले असा त्यांना फाजील आत्मविश्वास वाटू लागला. ते शिकलेल्या मराठी शाळेत एक दिवशी इंग्रजी अधिकारी येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये Welcome असे लिहिले होते. त्यामध्ये एक L कमी असून ते Well Come असे लिहिले पाहिजे असे अत्रे यांनी ...