Posts

Showing posts from July, 2025

गुरू कधी भेटतात?

Image
     २०१३ मध्ये एका महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कार्यक्रमानंतर एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की , "गुरु कधी भेटतात?" मी त्याला उत्तर दिले , "मला याबाबत फारशी माहिती नाही. परंतु जे वाचले आहे त्याप्रमाणे त्यानुसार योग्य वेळ झाली की गुरू भेटतात." गेले काही दिवस याच मुद्द्याचा विचार करत असतांना वेगवेगळी उदाहरणे लक्षात आली. ती उदाहरणे या लेखात दिली आहेत.                ( संत तुकाराम आणि संत बहिणाबाई यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )   सतराव्या शतकामध्ये १६२८ मध्ये संत बहिणाबाई यांचा मराठवाड्यातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. लहानपणी त्यांचे लग्न गंगाधर पाठक यांच्याशी लावून देण्यात आले. बहिणाबाई यांना देखील अध्यात्माची गोडी होती. परिवारामध्ये वेदांचे अध्ययन होते परंतु भक्ती मार्गाची उपासना मान्य नव्हती. कोल्हापूर येथे हे कुटुंब राहायला गेले असताना तेथे जयराम स्वामी यांच्या कीर्तनांतून संत तुकाराम यांची वचने बहिणाबाईंच्या कानी पडली. आपल्याला संत तुकाराम या...

इंग्रजांच्या राज्ययंत्रेणेतील भारतीय आध्यात्मिक सत्पुरूष

Image
       भारताला अध्यात्माची दीर्घ परंपरा लाभली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक साधना करणारे स्त्री पुरुष सर्व काळात होऊन गेले. आध्यात्मिक साधना करणारे हे स्त्री पुरुष व्यावहारिक गोष्टींपासून दूर राहिलेले आढळतात. प्रामुख्याने अशा व्यक्ती या संन्यास घेऊन स्वतःच्या उपासनेत मग्न राहिलेल्या दिसतात. परंतु याला काही अपवाद आहेत. इंग्रजांनी १८ व्या शतकात क्रमाक्रमाने आपली सत्ता वाढवत नेली आणि १९ व्या शतकात ही सत्ता स्थिरावली. याच काळात काही अध्यात्मिक पुरुष इंग्रजांच्या राज्य यंत्रणेत कार्यरत होते. त्याची ही काही उदाहरणे.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        मूळ पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे निवासी असणाऱ्या देशपांडे कुटुंबात १८१५ मध्ये यशवंत महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांमुळे यशवंत महाराजांना वयाच्या चौदाव्या वर्षी कारकुनाची तात्पुरती नोकरी लागली. त्यांच्या अंगभूत हुशारीमुळे वयाच्या १६ व्या वर्षी ते नोकरीत कायम झाले. १८२९ ते १८७२ असा दीर्घकाळ त्यांनी इंग्रजांच्या महसूल खात्यात नोकरी केली. त...

नामवंतांची पहिली भाषणे

Image
 शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः |  वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ||  असे एक संस्कृत सुभाषित आहे. याचा अर्थ शंभरात एक जण शूर असतो. हजारातील एक जण विद्वान असतो. दहा हजारातील एक वक्ता असतो. पण दाता होईल किंवा नाही हे सांगता येत नाही.      साधारणपणे सामान्य माणसाला ज्या गोष्टींची जास्त भीती णीऋ आणि भ फभ  आहे वाटते त्यात वक्तृत्व ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर आढळते. याला इंग्रजीमध्ये याला 'स्टेज फियर' असे म्हणतात. तर मराठीमध्ये अशी भीती नसणे याला 'सभाधीटपणा' असे म्हणतात. एक वेगळा मुद्दा म्हणजे दोन शब्द प्रयोगांमधून व्यक्त होणारा एकाच गोष्टीकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन. या लेखामध्ये नंतर जे वक्ते म्हणून प्रसिद्ध झाले अशा काही नामवंत व्यक्तींच्या पहिल्या भाषणाची उदाहरणे आहेत. अगदी काटेकोरपणे बोलायचे झाले तर  ही भाषणे पहिली नाहीत.  यात वर्णन केलेले प्रसंग हे या मोठ्या व्यक्तींचे एका विशिष्ट समुदायापुढे बोलण्याचे हे पहिले प्रसंग असल्यामुळे आणि त्यांच्या या अनुभवांत थोडेफार साम्य असल्याने हे शीर्षक दिले आहे.      ( सर्व छाया...

गुजरात सहल

Image
        कोविडच्या वर्षी २०२० मध्ये आमचा मुलगा चि.शंतनू दहावीला होता. त्याची परीक्षा झाली की कुठेतरी सहलीला जायचे असं ठरवलं होतं. पण कोविडमुळे त्यावर्षी जमलं नाही आणि पुढची दोन वर्षे जमलं नाही. पण मग हा योग नोव्हेंबर २०२३ मध्ये आला. त्यावर्षी सहलीला जायचं यावर चर्चा सुरू झाली आणि मग गुजरातला जायचं असं नक्की झालं. मी आणि माझे साडू श्री जवाहर उपासे दोघांनीही १६ ते २१ नोव्हेंबर या दिवसात सहकुटुंब जायचं ठरवलं. गुजरात सहलीचे सगळे नियोजन आमचा भाचा चि.सिद्धांत उपासे याने केले.          गुजरातमध्ये बघण्यासारखी प्राचीन, ऐतिहासिक, निसर्गरम्य, धार्मिक अशी अनेक स्थळे आहेत. पण चर्चेतून ठरलं की आताच्या काळातील आश्चर्य असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा जिथे उभारला आहे त्या सरदार सरोवर प्रकल्पाला भेट द्यायची आणि येताजाता अहमदाबादमध्ये काही ठिकाणे पाहायची. १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता त्यामुळे त्यादिवशी अहमदाबादमध्ये राहण्यासाठी पाहिजे तसे हॉटेल मिळत नव्हते.‌ म्हणून त्यादिवशी बडोदा येथे मुक्काम करायचा असे ठरवले. या स...

स्वामी विवेकानंद यांचा पीडित महिलांविषयीचा दृष्टिकोन

Image
       स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यापैकी त्यांच्या ठिकाणी असणारा करुणाभाव विलक्षण आहे. या करुणा भावाची काही विशिष्ट उदाहरणे या लेखात मांडली आहेत.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       या लेखात वर्णिलेल्या महिलांसाठी या शब्दासाठी कोणते विशेषण वापरावे हा प्रश्न मला पडला होता. कारण या लेखामधील उल्लेख देहविक्रय करणाऱ्या महिलांबाबत आहेत. अशा महिलांना साधारणपणे 'पतित' असा शब्द वापरण्याची पद्धत आहे. परंतु माझ्या समजुतीप्रमाणे देहविक्रय करणारी कोणतीही महिला स्वखुशीने त्या मार्गाला जात नाही. नाईलाज झाल्यावरच ती त्या मार्गाला जाते. काही बाबतीत फसवणुकीने अशा महिला त्या मार्गावर ढकलल्या जातात. त्यामुळे 'पीडित' हा शब्द वापरला आहे. अशा महिलांमुळे समाजाचे पतन होते की समाजाच्या अध:पतनाचे निदर्शक अशा स्त्रिया आहेत हा चर्चेचा किंवा वादाचा विषय आहे. पण तो बाजूला ठेवून स्वामीजींच्या जीवनातील काही प्रसंग बघूयात.            स्वामीजींच्या पूर्व जीवनात त्यांना देहविक्रय करणाऱ्या महि...

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

Image
     'काशीस जावे नित्य वदावे' ही श्रद्धाळू हिंदू समाजाची हजारो वर्षांपासूनची पद्धत आहे. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये काशीचे स्थान अनन्यसाधारण आहे. यामुळे काशीला जाणे ही एक पवित्र गोष्ट आहे. यावेळी आमचे काशीला जायचे ठरले ते अयोध्या यात्रेमुळे‌. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर पुन्हा उभे राहिले. २२ जानेवारी २०२४ ला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ होती. यापूर्वी २००७ मध्ये काशी प्रयागराज यात्रा घडली होती. पण त्यावेळी अयोध्येला जाता आले नव्हते. तो योग यावेळी आला. ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या दिवसांत आमची ही यात्रा पार पडली.         माझे साडू आणि मी आमच्या दोघांच्या या कौटुंबिक यात्रेचे नियोजन आमचा भाचा कु. सिद्धांत उपासे याने केले होते. आता इंटरनेटवर बऱ्याच सुविधा उपलब्ध असल्याने फोनवरून सगळे नियोजन करता आले.        पुण्यातून निघाल्यावर पहिल्या दिवशी दुपारी प्रयागराजला पोचलो. पुण्यापेक्षा तिथे सूर्यास्त लवकर होत असल्याने हॉटेलमध्ये सामा...