Posts

Showing posts from November, 2021

कट्यार काळजात ठसली

  "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट काही वर्षांपूर्वी बघितला. कथा , संगीत, अभिनय, नेपथ्य अशा सर्वच बाबतीत चित्रपट फारच सुंदर व देखणा झाला आहे. चित्रपटाची पटकथा चांगली बांधली आहे. कथेला कलाटणी देणारे एकाहून एक सरस प्रसंग चित्रपटात आहेत. असा प्रत्येक प्रसंग आधीच्या प्रसंगाच्या तुलनेत कथेला वेगळेच परिमाण देऊन जातो. संगीताच्या बाबतीत मूळ नाटकाला दिलेले कै.पं.जितेंद्र अभिषेकी यांचे श्रवणीय संगीत आणि शंकर महादेवन यांची त्याच्या तोडीस तोड कामगिरी. यामुळे कान अगदी तृप्त होऊन जातात. अभिनयाच्या बाबतीत सचिन पिळगावकर यांची अजोड भूमिका. माझ्या मते त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथमच नकारात्मक छटा असलेली भूमिका केली आहे. त्यांची उर्दूतील संवादफेक लक्षणीय आहे. शंकर महादेवन यांनी पंडितजींची भूमिका ठीकठाक केली आहे. सुबोध भावे यांची भूमिका चांगली वठली आहे. अन्य कलाकारांची कामेही छान झाली आहेत. ऐतिहासिक काळात घडणाऱ्या या कथेला साजेसे देखणे नेपथ्य साकारले आहे. त्यातून तो काळ हुबेहूब उभा केला आहे. यासाठी विशेष अभ्यास केला आहे असे जाणवते. आणि कुठेही पैशासाठी काटकसर केलेली ना

पुस्तक परिचय:- 'व्यासांचे शिल्प' नरहर कुरुंदकर

Image
     महाभारत हा ग्रंथ हजारो वर्षांपासून हिंदूंच्या श्रद्धेचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखन महर्षी व्यासांनी केले ही समाजाची श्रद्धा आहे. याच महाभारतावरील मराठी भाषेतील चिकित्सक लेखक नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला लिहिलेल्या लेखांचा संग्रह व्यासांचे शिल्प या नावाने २००२ मध्ये पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रसिद्ध केला. त्याची दुसरी आवृत्ती २०१५ मध्ये प्रसिद्ध झाली. तो नुकताच वाचनात आला.     सामान्यपणे हिंदू कुटुंबात समाजात महाभारत ग्रंथातील प्रसंगांचा संदर्भ देण्याची पद्धत आढळते. परंतु मूळ ग्रंथ नेमका कधी लिहिला गेला हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. काळाच्या ओघात या ग्रंथात विविध लेखकांनी भर टाकली. त्यामुळे मूळ ग्रंथाचे स्वरूप पालटूनच गेले. महाराष्ट्रामध्ये निळकंठ या सतराव्या शतकातील लेखकाने लिहिलेली प्रत अनेक वर्षे प्रमाण मानली जात होती पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेने डॉ. सुखटणकर यांच्या नेतृत्वाखाली १९२७ ला काम सुरू केले. ते सुखटणकर यांच्या निधनानंतरही चालू राहिले आणि १९६१ या वर्षी चिकित्सक आवृत्तीचे शेवटचे पर्व प्रसिद्ध झाले.  या आवृत्तीतील महाभारत साधारण सन १००० च्या सुमारास प्र

धुळे जिल्ह्यातील अनुभव

Image
    दरवर्षी प्रांतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांची एकत्रित बैठक होत असते. या बैठकीमध्ये प्रचारकांची पुढील वर्षासाठी विविध ठिकाणी नियुक्ती होत असते. अशीच बैठक १९९९ सालच्या जून महिन्यात धुळे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. या बैठकीमध्ये माझी धुळे जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. १९९९ ते २००१ या दोन वर्षांमध्ये मला धुळे जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. या काळात विविध प्रकारचे प्रसंग अनुभवायला मिळाले. त्यापैकी काही प्रसंग या लेखाद्वारे मांडत आहे.     १९९९ मध्ये हिवाळी शिबिर दोंडाईचा येथे घेण्याचे ठरले. दोंडाईचा येथील एका महाविद्यालयात हे शिबिर सुरू झाले. अपेक्षित संख्येच्या जवळजवळ दुप्पट बाल स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले. परंतु पुरेशा प्रमाणात गण शिक्षक मात्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे आलेल्या मर्यादित तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने नियोजन करावे लागले. शिबिरात सहभागी झालेल्या बाल स्वयंसेवकांनी पैकी बरेचजण पहिल्यांदाच संघाच्या शिबिरात सहभागी होत होते. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी चे दुपारचे भोजन सुरू झाले आणि थोड्या वेळाने भोजन मंडपामधून सगळीकडून पापडी पापडी अशी बा

समर्थ भारतासाठी युवाशक्ती

Image
 "आपली प्रिय भारत माता पुनश्च एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान होईल आणि जगतास अभय प्रदान करील" स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. हे वचन साकार करण्यासाठी युवाशक्ती महत्त्वाची आहे. भारताचे हे ध्येय साकार करण्यासाठी या युवापिढी मध्ये कोणकोणते गुण असावेत याचा आपण विचार करूया.        सर्वात प्रथम राष्ट्र जे घडवू शकतात असे युवक आपापल्या क्षेत्रांमध्ये निष्णात असण्याची आवश्यकता आहे. यासाठी सातत्यपूर्ण कठोर असे परिश्रम करून युवकांनी ही निपुणता मिळवावयास हवी. ही निपुणता मिळवता आला कोणत्याही लघु मार्गाचा (शॉर्टकटचा) अवलंब करून चालणार नाही त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.        ज्या वेळेला समाजाचे व राष्ट्राचे काम करावयाचे असते त्या वेळी कोणा एका व्यक्तिचे परिश्रम त्यासाठी पुरेसे पडत नाहीत. त्यामुळे अशा कर्तृत्ववान व उत्साही व्यक्तींनी एकत्र येऊन समाजाचे काम पुढे नेले पाहिजे. यासाठी या युवकांमध्ये संघभावना असण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. केवळ मीच पुढे होईन वा मीच एकटा सर्व करेन ही भावना सामाजिक कामामध्ये उपयोगाची नसते. त्यामुळे युवकांच्या मनामध्ये ही संघभावना खोलवर रुजण्यासाठी आपणा

रवींद्रनाथ : विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत

Image
२०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष जवळपास ऑनलाइन अभ्यास करण्यातच गेले. फार थोडा काळ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकता आलं. परंतु समाज म्हणून आपण नाइलाजाने या सर्व परिस्थितीला सामोरे गेलो आहोत. अजून किती काळ ही परिस्थिती राहील ह्याबाबत अनिश्चितता आहे. पण आपण सर्वजण धीराने, निश्चयाने यापुढेही काम करत राहूया.                    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )     माणसासाठी शिक्षण ही कायमच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी शिकणं आणि शिकवणं हे नेहमी चालू ठेवणं आवश्यक आहे. यासाठी भारतातल्या अनेक महान व्यक्तिंनी शिक्षणाबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. या व्यक्तिंपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे रवींद्रनाथ ठाकूर होय. भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिले नोबेेल पारितोषिक विजेते म्हणून ते आपल्याला माहिती आहेत. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी शिक्षणतज्ञ हा एक पैलू आहे. विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत याबाबत त्यांनी अनेक मुद्दे सांगितले आहे. त्यापैकी आपण काही मुद्दे पाहूया. रवींद्रनाथांनी निसर्गाला "ईश्वराची संहिता "(manuscript of God) म्हटलं आहे.

आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते?

आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते असा विचार केला की अनेक गोष्टी लक्षात येतात. शाळा आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम, सततची मेहनत करत राहिलो तरच यशाची नवनवीन शिखरे आपण गाठत राहू. ही यशाची शिखरे गाठत असताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवत आपण स्वतःवर विश्वास ठेवू. आधुनिक जगात बाह्य स्पर्धा कितीही वाढली असली किंवा तसे वाटत असले तरी खरी स्पर्धा स्वतःशीच असते. कारण स्वतःच स्वतःला नवनवीन आव्हानांसाठी तयार करायचे असते. हे करत असताना स्वतःची काही तत्वे, मूल्ये निश्चित करत ती सदैव स्वतःकडून पाळली जातील याची काळजी घ्यायची असते.वेळोवेळी या मूल्यांवर ठाम राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात कोणतीही कुचराई करायची नसते. कोणतेही यश मिळवणे आणि ते खूप काळ टिकवून ठेवणे यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासू सोबत्यांची, सहकाऱ्यांची आवश्यकता असते. या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वतः एकसंघ भावनेने काम करण्याची आवश्यकता असते.  शाळेतील वर्षे ही हसण्याची, खेळण्याची , नवनवीन गोष्टी शिकण्याची आहेत. आपल्या संस्थेच्या शाळेत शिकत असताना संस्थेच्या आणि शाळेच्या प्रदीर्घ इतिहासाची आपल्याला ओळख होते. या वारशाची जाणीव होत

कार्यक्रमांच्या व्यवस्थेतील अनुभव

           वक्त्यांनी पाणी पिण्यासाठी तांब्यावरील भांडे उचलले आणि पाणी ओतून घेऊ लागले तर तांब्या रिकामाच होता. आमच्या मएसो महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या एका कार्यक्रमातील काही वर्षांपूर्वीचा हा अनुभव.           कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा त्याचे नियोजन करताना सर्व लहानसहान बाबींचा विचार करून योजना करावी लागते काम वाटून घ्यावे लागते आणि काम करून घ्यावे लागते. गरजेप्रमाणे जागेवर दुरुस्ती करावी लागते सातवा बदल करावा लागतो. काहीवेळा तपशीलवार विचार केला असला तरी अतिशय गमतीदार अनुभव येतात त्यापैकीच हे काही अनुभव.        आमच्या वसतिगृहात दरवर्षी अनेक कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमापूर्वी सर्व सूचना दिल्या जातात. पण तरीही एकदा वर सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. रिकामा तांब्या बघितल्यानंतर मग विद्यार्थ्यांनी धावपळ करून पिण्याचे पाणी आणून दिले ते वक्ते प्याले आणि मग कार्यक्रम पुढे सुरु झाला. या अनुभवानंतर मी कार्यक्रमापूर्वी सूचना देताना वक्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या आणि भांडे तयार ठेवायचे अशी सूचना देत असतो. अनुभवातून आलेलं शहाणपण..!      मी संभाजीनगरला १९९७ ते १९९९ या

शिवरायांचे सलगी देणे कैसे असे

Image
  छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन विलक्षण आहे.अनेक वेगवेगळे पैलू त्यांच्या जीवनात दिसतात. त्यात त्यांनी जोडलेली माणसे आणि त्यांना दिलेले हिंदवी स्वराज्याची प्रेरणा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर असलेले अनेक जण त्यांनी स्वराज्याच्या कामात जोडून घेतले हे तर आहेच. शिवरायांशी शत्रुत्व करणाऱ्याकडची माणसे त्यांनी पारखून स्वराज्याच्या कामात जोडली हा एक वेगळा महत्वाचा पैलू आहे. समोपाचाराचे सर्व प्रयत्न संपल्यावर जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यावर हल्ला चढवला. त्या लढाईत त्वेषाने लढणारे मुरारबाजी देशपांडे महाराजांच्या पारखी नजरेने लगेच हेरले. त्या लढाईत जय मिळवल्यानंतर महाराजांनी मुरारबाजी यांना स्वराज्याच्या कामात सहभागी होण्याची साद घातली. मुरारबाजी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते स्वराज्याच्या कामी रुजू झाले. १६६५ मध्ये त्यांनी गाजवलेला पराक्रम इतिहासात नोंदवला गेला आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर असलेल्या त्यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरचा आवेश पाहण्यासारखा आहे. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन कवीने केले आहे. मातेच्या स्वातंत्र्यास्तव धडही लढते संग्रामात किंवा मुरारब

गुरू नानक

Image
 गुरू नानक यांना तरूणपणी त्यांचे मेहुणे दिवाण जयराम यांच्या सांगण्यावरून त्यांच्या गावी सुलतानपूरला नबाब दौलतखान याच्याकडे धान्याच्या गोदामप्रमुखाची नोकरी मिळाली. काम करत असतानाही ते सदैव चिंतन करत असत.एके दिवशी धान्य मोजून देत असताना ते मापाने मोजू लागले "एक , दो, तीन,..........तेरा..." तेरा असा शब्द उच्चारल्यानंतर त्यांना लक्षात आले की या सृष्टीत सर्व काही ईश्वराचेच आहे. या चिंतनात मग्न होऊन ते तेरा, तेरा.... असे म्हणू लागले. धान्य घेणाऱ्याच्या पिशवीत धान्य भरून ओसंडून वाहू लागले. यानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रार झाली. तक्रारीनंतर केलेल्या मोजणीत धान्य, पैैसे याचा हिशोब बरोबर आढळला. सगळ्यांना प्रश्न पडला की असे कसे झाले. नंंत सर्वांना लक्षात आले की नानकजी स्वतःच्या कमाईइतके दान करत असत. ते पैसै स्वतः भरत असत. एकदा आपला शिष्य मर्दाना याच्याबरोबर भारतभ्रमण करीत असताना गुरू एका छोट्या खेड्यात गेले. त्या गावात एका कुष्ठरोग झालेल्या व्यक्तिच्या घरात राहून त्यांनी त्याची रात्रभर सेवा केली. त्याला उपदेश केला. कुष्ठरोगामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या त्या व्यक्तिच्या जीवनात आशेचा प्रक