Posts

Showing posts from February, 2022

राष्ट्रपती भवन वर्णन

Image
 " ३४० एकड परिसर में फैले हुए राष्ट्रपती भवन में ३४० कमरे हैं।" राष्ट्रपती भवनातील आमची मार्गदर्शिका सांगत होती.  गुरुवार दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ला मा.राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांची भेट संपवून आम्ही निघत असताना त्यांनी स्वतःहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आम्हाला राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्था करा. थोड्या वेळात आमच्यासाठी मार्गदर्शिकेची व्यवस्था करण्यात आली आणि आम्ही राष्ट्रपती भवनाची फेरी सुरू केली.     तत्पूर्वी आम्ही राष्ट्रपती भवनाच्या ३७ क्रमांकाच्या दरवाज्यातून आत येतानाच त्या वास्तूची भव्यता जाणवत होती. तळमजल्याचे छत जवळपास २५ फूट उंच होते. लालसर दगडात बांधलेले गोल स्तंभ, कॉरिडॉरमधील अर्धवर्तुळाकार छत, जाताना काही खांबावर कोरलेले भगवद्गीतेतील श्लोक हे त्यांची छाप पाडत होते. मोबाईल सुरक्षा अधिकाऱ्यांनी जमा करून घेतल्याने आमच्याकडे फक्त जगातील सगळ्यात भारी कॅमेरा होता तो म्हणजे आमच्या डोळ्यांचा. त्या डोळ्यांनी ती भव्यता, ते वास्तू सौंदर्य आम्ही साठवून ठेवत होतो.         आमच्या मार्गदर्शिकेने आमच्या फेरीत माहिती सांगण्याची सुरूवात पहिल्या मजल्यावरील भोज

मएसो भवन ते राष्ट्रपती भवन भाग ३

Image
 दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारीला नाष्टा करून राजीवजी, मोडक मॅडम आणि मी दिल्लीतील योगी अरविंद यांच्या आश्रमाकडे निघालो तर व्हनकटे सर विद्यापीठ अनुदान आयोगात गेले.  मोडक मॅडम अरविंद आश्रमाच्या वतीने निघणाऱ्या मराठी नियतकालिकाच्या संपादनाचे काम करतात. त्यांच्या आग्रहाने आम्ही आश्रमात पोचलो. तेथे आमचे आत्मीयतेने स्वागत झाले. आश्रमाच्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली. निसर्गसुंदर, पवित्र आश्रमाचा फेरफटका मारता आला. तेथील ध्यानमंदिर आणि योगी अरविंद यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करता आंतरिक शांततेचा अनुभव आला. आश्रमाच्या प्रमुख तारादीदी यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी व्यस्ततेतून थोडा वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. ' मएसोबरोबर काम करायला आवडेल.' असे त्या म्हणाल्या. ' तुम्ही निवृत्त झाल्यावर इथे येऊन काम करायचे आहे ' असे त्यांनी आग्रहाने मोडक मॅडमना सांगितले. आश्रमातील भोजनाचा लाभ घेऊन राजीवजी आणि मी विमानतळावर पोचलो. प्रवासात असताना सतीशजींचा मा.राष्ट्रपतींना भेटीची वेळ मागण्यासाठी  इमेल पाठवण्याचा व्हॉट्स अप संदेश आला होता. त्याप्रमाणे संस्था कार्यालयातून इम

मएसो भवन ते राष्ट्रपती भवन भाग २

Image
        अखेर ८ फेब्रुवारी २०२२ हा दिवस उजाडला. सकाळी हॉटेलमध्ये नाष्ट्याच्या वेळी आम्ही चौघे जण एकत्र आलो. आता दिल्लीत कोणकोणती कामे करणे बाकी आहे याचा आढावा घेऊन चर्चा सुरू झाली. तेवढ्यात माननीय उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या भाषणाचा मसुदा आम्हाला बघण्यासाठी पाठवण्यात आला. त्यामधील काही वस्तुस्थिती दर्शक छोटे बदल आम्ही सुचवून तसे त्यांच्या कार्यालयाला कळवले.         आदल्या दिवशी कार्यालयाकडून कार्यक्रमाच्या वेळी लावण्याच्या बॅनरबद्दल सूचना आली होती. पण आम्ही पाठवलेल्या बॅनरला त्यांच्याकडून मान्यता आली नव्हती. त्यामुळे बॅनर पुण्यातून घेऊन जाणे शक्य झाले नव्हते. आता मान्यता आली की बॅनर दिल्लीतून प्रिंट करून घ्यायचा या उद्देशाने आम्ही एका जवळच्या दुकानात गेलो आणि चौकशी केली. दरम्यान सकाळचे साडेदहा वाजले तरीदेखील बॅनरला मान्यता आली नव्हती. त्यामुळे त्याचा पाठपुरावा सुरू झाला. अखेर साडेअकराच्या सुमाराला बॅनरला मान्यता आली. आम्ही बॅनरचा आकार आठ × चार फूट गृहित धरला होता. पण दुकानदाराने सांगितले की या आकाराचा बॅनर छापायला किमान चार ते पाच तास लागतील. आता काय करायचे? मग दुकानदार

मएसो भवन ते राष्ट्रपती भवन भाग १

Image
 "Namaskaram Sir. Hon'ble Vice President of India can give time for the ceremony tomorrow or day after tomorrow. Please discuss with your office bearers and tell me immediately. " मा.उपराष्ट्रपती यांचे खाजगी सचिव श्री.चैतन्य यांचा रविवार ६ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी ३:३० च्या सुमाराला मला फोन झाला आणि एकच धावपळ सुरू झाली. हा फोन झाला त्यावेळी मी संघाच्या एका बैठकीसाठी मएसो भवनात  गुरूवर्य प्र.ल. गावडे सभागृहात होतो.         हा फोन झाल्यावर नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी यांना फोन केला. ९ फेब्रुवारीपासून मा. उपराष्ट्रपती सुमारे महिनाभरासाठी दिल्लीबाहेर जाणार ही चैतन्य यांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊनकार्यक्रम ८ फेब्रुवारीलाच करूया असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाच्या तयारीसाठी सुमारे तासाभरात राजीवजी, विजयराव भालेराव, बाबासाहेब शिंदे, भरत व्हनकटे सर, संतोष देशपांडे सर, सचिन आंबर्डेकर, श्रीहर्ष थत्ते आणि मी असे संस्थेच्या कार्यालयात भेटलो. आधी केलेल्या नियोजनाला उजाळा दिला. आधी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत आवश्यक ते बदल नक्की केले. पुण्य

विमानप्रवासाचा संस्मरणीय प्रसंग

Image
"यावर्षी इ.९वीत सर्वप्रथम आलेला विद्यार्थी आहे ,गाडे सुधीर शिवलिंग.  पारितोषिक आहे पुणे ते मुंबई विमानप्रवास" साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग शाळेत शैक्षणिक वर्ष १९८६-८७ च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ही घोषणा झाली. अतिशय आनंद झाला होता. त्यावेळी विमानप्रवास ही अपूर्वाईचीच गोष्ट होती. साखरवाडीसारख्या छोट्या गावातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने तर अविस्मरणीय अनुभवच. मी कोणती बॅग घ्यायची, कोणते कपडे घ्यायचे याचे बेत ठरवायला सुरूवात केली. पण...... पण केवळ मला एकट्याला विमानाने पाठवायला कै.बापू आणि आई तयार नव्हते. सोबत कुणीतरी हवेच असा त्यांचा आग्रह होता. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. विमानप्रवासाचा अनुभव घ्यायची इच्छा तेव्हापासून मनात घर करून राहिली होती. पण म्हणतात ना योग यावा लागतो. तो योग आज आला. आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि संस्थेचा इतिहास ग्रंथ 'ध्यासपंथे चालता' याचे प्रकाशन दिल्लीतील मान्यवरांच्या हस्ते व्हावे यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न चालू होते. रविवार ६ फेब्रुवारी २०२२ याद

चीनचे आव्हान आणि राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान

Image
 २०१७ मध्ये देशभर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान झाले. त्यावेळी भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील माझा लेख.   ज्या देशाला स्वाभिमानाने आपले अस्तित्व टिकवून प्रगती करायची आहे त्याला आपल्या इतिहासाबरोबरच भूगोलाचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसात डोकलाम (डोंगलांग) येथील चीनच्या हालचाली, भारतीय सैन्याने त्याला केलेला विरोध, चीनने मानससरोवर यात्रेवर घातलेली बंदी या घडामोडींमुळे चीनचे विस्तारवादी धोरण जगासमोर पुन्हा एकदा उघडे पडले आहे. या पार्श्वभूमीवर आपण याबाबतीतला इतिहास आणि भूगोल समजून घेऊया.       १९४९ मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. या क्रांतीनंतर जसजशी साम्यवादी राजवट स्थिरावू लागली तसतसा चीनचा विस्तारवाद सुरू झाला. १९५१ - १९५९ या वर्षांमध्ये चीनने तिबेट हा स्वतंत्र देश बळकावून आपल्या भूप्रदेशास जोडला. यामुळे भारताची सीमा थेट चीनच्या सीमेला भिडली. दुर्दैवाने तत्कालीन भारतीय नेतृत्वाला याचे गांभीर्य लक्षात आले नाही.चीनने तिबेट बळकावल्यानंतर भारताच्या आश्रयाला आलेले दलाई लामा हे तिबेटचे धर्मगुरू आणि राष्ट्रप