Posts

Showing posts from April, 2022

मन

Image
  ( १/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट) आपला आपल्या मनावर खूप ताबा आहे हा समज किती तकलादू असतो नाही. थोडं फार जरी मनाविरुद्ध घडलं तरी तोल जातो नि वेडेवाकडे शब्द तोंडातून बाहेर पडतात. अथवा बाहेर नाही पडले तरी ते आतल्या आत धुमसत राहतात. थोड्या वेळाने आपोआपच बाहेर पडतात जशी कोंडलेली वाफ आवाज करत बाहेर पडते. कधी कधी वाटत राहतं की नाही आपला तोल सुटणार नाही. पण शब्दाला शब्द वाढत जातो नि संयम, विवेक इ. गोष्टी कधी मागे पडतात हेच कळत नाही. सर्व शाब्दिक चकमक संपल्यानंतर राहते ती कडवट चव नि आपलं मन आपल्या ताब्यात आहे भ्रमाचा फुटलेला भोपळा!  (७/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)     माणसाचं मन एक गंमतीशीर गोष्ट आहे. कुठल्याही प्रसंगाबद्दल, गोष्टीबद्दल मनात काही ठोकताळे बनवलेले असतात.‌ त्याप्रमाणे सर्व काही होत असेल तर चांगलंच असतं. पण घडत नसेल तर मात्र मग मनाचं अस्तित्व प्रकर्षानं जाणवू लागतं नव्हे अस्वस्थ करू लागतं. आणि मनाची ही अस्वस्थता अशी बोट ठेवून दाखवतासुद्धा येत नाही नि तिच्याकडे दुर्लक्षसुद्धा करता येत नाही. मग मात्र विचारांच्या घुसळणीने डोकं बेजार होऊन जातं. कधी कधी इतकं की शारीरिक क्रियांवरसुद्धा

बेधडकपणा

Image
   (२८/०२/१९९५  रोजी लिहिलेले स्फुट)  काही प्रसंगी वागताना आपण बेधडकपणे वागतो. परंतु थोडा काल गेल्यानंतर आपल्याला त्याच्यातले धोके, त्रुटी लक्षात येतात. तेव्हा मग मन चुकचुकू लागतं की ' अरे आपण असं वागायला नको होतं'. पण एकदा प्रसंग घडून गेला की मग फक्त उरते ती चुटपुट. जी सगळ्या बेधडकपणावर पाणी फिरवते.       काही घटना एकदम अनपेक्षित रीतीने आपल्यावर येऊन आढळतात नि काही क्षण आपली प्रतिक्रिया काय हेच आपल्याला कळत नाही. काही क्षणानंतर मग आपण सावरतो. विचार करू लागतो. पहिल्या क्षणी त्या घटनेच्या खरेपणावर जो विश्वास बसलेला असतो तो एकदम उडाल्यासारखा वाटतो. पण मग पुन्हा विचार करताना तीच घटना आधीच्या घटनाक्रमाची अटळ परिणिती आहे असं लक्षात येतं. तेव्हा कुठं आपला त्या घटनेवर विश्वास बसतो. पण तरीसुद्धा अधून मधून ती घटना खरी नसावी अशी वेडी आशा डोकं वर काढत राहते नि वास्तवाचा फटका बसल्यावर पुन्हा खाली जाते. जीवाला हळहळ लावीत. ( २६/०४/२०२२ ला लिहिलेला मजकूर)    हे जुने लिखाण वाचताना मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना घडलेला प्रसंग आठवला. शेवटच्या वर्षाला आम्हाला गटाने प्रकल्प करायचा होता. त्यास

एकसुरीपणा

Image
 ( २३/०२/१९९५ यादिवशी रात्री १०:२० वाजता लिहिलेले स्फुट)     काही वायूंचं वर्णन करताना रसहीन रंगहीन चवहीन असं केलं जातं. आयुष्याचंही असंच काहीतरी असावं. एकदा का सगळं मार्गी लागलं की मग सर्व दिवस एकाच रंगाचे असतात. तोच दिवस तीच कामं फक्त वरच नाव बदलायचं. त्याच त्याच पायवाटेवर पुन्हा तीच तीच पावलं उमटवीत चालायचं. ते सुद्धा त्याच त्या ठिकाणाकडं. झालाच तर कधीमधी थोडासा बदल. त्याच त्या गोष्टींबद्दल चर्चा नि गप्पा. तरीसुद्धा या सर्व गोष्टी सारख्याच तन्मयतेनं करत राहिलं पाहिजे आणि आहे त्यातून आनंद शोधायला शिकलं पाहिजे. ( हा मजकूर लिहिला तेव्हा मी दमणमध्ये एका कंपनीमध्ये साचेबद्ध स्वरूपाचे काम करत होतो. तोपर्यंत मी विंदा करंदीकर यांची 'तेच ते' ही कविता वाचली नव्हती. नंतर बऱ्याच वर्षांनी ती वाचली. त्यातही याचसारख्या भावना व्यक्त केल्या आहेत.   पुढील मजकूर १८/०४/२०२२ ला लिहिला आहे.)    काही बाबतीमध्ये हा एकसुरीपणा आवश्यक असतो. काही गोष्टी परत परत त्याच पद्धतीने कराव्या लागतात. त्यातून काही गोष्टी निर्माण होतात किंवा साध्य होतात. रोज काहीतरी नवे करण्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. उदाह

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीने वर्णिलेली शिवरायांची मुत्सद्देगिरी

Image
 सा.विवेकच्या 'शिवऋषींची शिवसृष्टी' या चैत्र पौर्णिमा, शिवपुण्यतिथी १६/०४/२०२२ ला प्रकाशित अंकातील लेख सरित्पतीचे जल मोजवेना,  माध्यानीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वानर साहवेना,  तैसा शिवाजी नृप वर्णवेना        या उक्तीप्रमाणे शिवरायांची थोरवी शब्दमर्यादेत बद्ध करणे अशक्य आहे. परंतु शिवचरित्र जनमानसात पोचवण्याचा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांनी याबाबतीत उत्तम असे वर्णन केले आहे. शिवरायांच्या अनेक गुणांपैकी त्यांच्या मुत्सद्दीपणाचे वर्णन बाबासाहेबांनी कसे केले आहे ह्याची मोजकी उदाहरणे पाहणे उद्बोधक ठरेल. पुढे अवतरणचिन्हात दिलेली वाक्ये बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाच्या सोळाव्या आवृत्तीमधील आहेत.        स्वराज्य उभे रहावे ही ईश्वराची इच्छा आहे या श्रद्धेने स्वराज्याचा व्याप वाढवायला शिवरायांनी सुरूवात केली आणि सुरूवातीच्या टप्प्यात पेचप्रसंग उभा राहिला तो आदिलशाहने कपटाने शहाजीराजांना कैद केल्यावर. या प्रसंगात शिवरायांनी तोपर्यंत कुणालाही न सुचलेली युक्ती केली. वर्णन करताना बाबासाहेब लिहितात, ' आता बादशाह काय कर

मृत्यू एक वळण

Image
 ( २२/०२/१९९५ यादिवशी रात्री १०:३० वाजता लिहिलेले स्फुट)    घाटातून प्रवास करत असताना एखादं वळण असं येतं की त्या वळणापर्यंत पोचेतो त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही आणि वळणापाशी पोचल्यावर पुढचा असा रस्ता दिसतो ज्याची आधी कल्पनाही केलेली नसते. त्या वळणशी पोचेतोपर्यंत तेथे पोचायचे एवढेच एक ध्येय असतं. तिथं पोचल्यानंतर पुढे काय? पण या वळणाशी थांबायचं हे नसतंच कारण आयुष्याचा प्रवाह सदैव पुढं पुढं जात असतो. इच्छा असो अथवा नसो.       कल्पना थोडी लांबवली तर ती मृत्यूलाही लागू पडेल. मरणाच्या दारात पोचेतोपर्यंतच काय करायचं ते नियोजन. तिथं पोचल्यानंतर मग काय? माग उरलेला रस्ता नि त्याच्यावरचे पुढं जाणारे सहप्रवासी. पण घाटातलं वळण जसं निश्चित सांगता येईल तसं मृत्यूचं सांगता येईल का? आणि जर समजा सांगता आलं तर त्या वळणापर्यंतचा प्रवास न घाबरता धीरानं पार पाडता येईल का? विचार तसा डोक्याला चालना देणारा आहे. रोजच्या आयुष्यात आपण इतक्या बारीक-सारीक गोष्टींची चिंता करण्यात आणि त्या घडल्या नाहीत 'तर काय ?' असा विचार करण्यात वेळ घालवतो. पण असं करताना त्या अंतिम सत्याचं विस्मरण करतो. बरंचसं नकळत नि थो

वय म्हणजे फक्त एक अंक

Image
 " गेल्या वर्षी (२०२१ मध्ये) कोरोनाने गंभीर आजारी होतो. पुष्कळ पैसे आहेत. परंतु त्यावेळी आवश्यक वाटलेले रेमडेसिविर हे इंजेक्शन मिळवताना लक्षात आले की पैसे असून फार काही उपयोग नाही." ज्येष्ठ उद्योजक श्री. किशोर देसाई सांगत होते.  ( श्री.किशोर देसाई, छायाचित्र इंटरनेटवरून)      पंप्सच्या व्यवसायात जगभर आपला ठसा उमटवणाऱ्या श्री.देसाई यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. वय वर्षे ६५. काही वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे.  गेल्यावर्षी कोविडच्या आजारातून वाचले. बरे झाल्यावर त्यांनी पुणे महानगरपालिकेला लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभा करण्यासाठी खूप मदत केली. याशिवाय वेगवेगळ्या कल्पनांवर, उद्योजकता विकास, सामाजिक प्रश्न यावर काम करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना त्यांनी सांगितल्या. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.    ( श्रीमती अपर्णा डोंगरे, छायाचित्र प्रशांत डोंगरे)      श्रीमती अपर्णा डोंगरे काकू. सध्या वय वर्षे ७२. १९९०-९४ या काळात आम्ही साताऱ्यात शिकत असताना मायेने आम्हा सर्व मित्रांकडे लक्ष देणाऱ्या, वेळोवेळी रुचकर असे पदार्थ आग्रहाने खाऊ घालणाऱ्या डोंगरेकाकू गेली