Posts

Showing posts from April, 2024

सश्रद्ध शिवराय

Image
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सश्रद्धपण! ईश्वरी अस्तित्वावरती , त्याच्या सगुण साकार रूपांवर महाराजांची निरतिशय श्रद्धा होती.              ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         आपले कार्य हे ईश्वरी कार्य आहे याच्यावर महाराजांची अभंग श्रद्धा अगदी लहानपणापासून होती. १६४५ मध्ये दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांचे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे , "हे राज्य व्हावे असे श्रींचे मनात फार आहे. पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन करून तो आम्हास यश देणार आहे." यावेळी शिवराय फक्त पंधरा वर्षांचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु इतक्या लहान वयातच त्यांना आपल्या ईश्वरी कार्याचा साक्षात्कार झाला होता आणि ईश्वरी कृपेने हे कार्य सिद्धीस जाणार आहे यावर त्यांची ठाम श्रद्धा होती हे सहजपणे समजते.       अफजलखानाचे स्वराज्यावरील आक्रमण प्राणांतिक संकट होते. यावेळी वय, अनुभव, फौजफाटा, धनसंपत्ती या सर्वात शिवराय तुलनेने कमी होते हे लक्षात घेतले पाहिजे. अफजलखान हा त्या काळातील अतिशय प्रसिद्ध , कसलेला मुरब्बी

फाळणीची पार्श्वभूमी सांगणारे आणि अखंड भारत होण्यासाठी कार्यक्रम सुचवणारे पुस्तक

Image
    १९४७ मध्ये भारताची फाळणी का झाली , गोष्टी कोणत्या क्रमाने बिघडत गेल्या याची कारण मीमांसा करणारे आणि पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ , भूतान यासह आजचा भारत राज्य म्हणून एकत्र न येताही तो संस्कृतिक आधारावर अखंड भारत कसा होऊ शकतो याचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक म्हणजे भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केलेले 'प्रत्येक राष्ट्रभक्ताचे स्वप्न अखंड भारत' हे डॉ. सदानंद दामोदर सप्रे यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्या पुस्तकाचा श्री.चित्तरंजन भागवत यांनी केलेला केलेल्या मराठी अनुवादाचे ११६ पानांचे पुस्तक. भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी कोणत्या प्रकारे आपली सत्ता स्थिर ठेवली आणि हा देश सोडून सात असताना रक्तरंजित फाळणी कशी घडवून आणली याचे विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते.  या पुस्तकाचे दोन भाग करण्यात आले आहेत. भाग एक 'फाळणी का व कशी झाली.' हा आहे. तर भाग दोन 'भारत अखंड कसा होईल?' हा आहे. पहिल्या भागात १७ मुद्द्यांच्या आधारे फाळणीचा घटनाक्रम उलगडून दाखवलेला आहे तर दुसऱ्या भागात १९ मुद्द्यांद्वारे भारत अखंड कसा होईल याचे विवेचन केलेले आहे. साधारणपणे जनसामान

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख

Image
            ' वरवर कितीही भेद दिसत असले तरी या आंतरिक एकता शक्तीवर जनमानसाचा विश्वास दृढ करत जाणे हे मूलभूत काम आहे असे संघ मानतो.' ' संघाने आपले सारे लक्ष पायाभूत सुविधा( इन्फ्रास्ट्रक्चर )वर म्हणजे व्यक्ती निर्माणावर केंद्रित केले आहे. व्यक्ती चांगली असेल तर कार्य चांगले होणारच.' 'संघटित समाजच सर्व प्रकारचे वैभव व सामर्थ्य प्राप्त करू शकतो हे सत्य ओळखून संघाने अध्यात्म ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम प्रारंभ केले.' संघाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  कामाचे मर्म सांगणारी अशी अनेक वाक्ये संघाचे वरिष्ठ प्रचारक माधव विनायक उपाख्य मधुभाई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या ४८ पानांच्या 'अथातो संघजिज्ञासा' या छोटेखानी पुस्तकात ठिकठिकाणी आढळतात.         केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात संघाच्या कामाबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याचे सध्याचे चित्र आहे. हितचिंतकांना संघाच्या विचारांचे, वाटचालीचे, कार्यविस्ताराचे,  कौतुक वाटते. त्याबद्दल नेमकेपणाने जाणून घ्यावेसे वाटते.

श्रीराम : विद्यार्थ्यांचा आदर्श

Image
      केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरलेला हिंदू समाज तसेच अनेक देशावरील कोट्यवधी नागरिक श्रीरामांना आदर्श मानतात. माणूस म्हणून जन्माला येऊन देवत्व प्राप्त करणाऱ्या श्रीरामंचे चरित्र सर्वांना सर्वकाळासाठी आदर्श आहे. यात विद्यार्थ्यांनादेखील ते आदर्श आहे. या लेखात विद्यार्थी श्रीरामांच्या कोणत्या गुणांचे अनुसरण करू शकतात हे आपण पाहूया.     ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)        अयोध्यचे महाराज दथरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांच्या पोटी जन्माला आलेले श्रीराम बालवयातच सर्वांना प्रिय झाले होते. तसेच त्यांच्या क्षमतांची प्रसिद्धीदेखील दूरवर पसरलेली होती. श्रीराम बारा वर्षांचे झाले असता एके दिवशी महाराज दशरथांच्या दरबारात महर्षी विश्वामित्र यांचे आगमन झाले. पूर्वायुष्यात स्वतः राजे असलेले विश्वामित्र तपश्चर्या करून ब्रम्हर्षी पदाला पोचले होते. त्यामुळे शस्त्र धारण करणे, युद्ध करणे हे त्यांनी सोडून दिले होते. ईश्वराचे अनुष्ठान करण्यासाठी ते यज्ञयाग करत असत. परंतु त्यांच्या आश्रमाच्या प्रदेशात दुष्ट राक्षसांनी थैमान घातले होते. हे राक्षस यज्ञकुंडात मांस टाकणे, यज्ञकुंड आणि ते ज्यावर बांधलेले असे

भारतीयांच्या बदललेल्या सवयी

Image
      आपल्या प्राचीन देशात अनेक सवयी, पद्धती हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत. परंतु गेल्या काही काळात या पद्धतींमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात अशा काही बदलांचा विचार आपण करूयात.      ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)         एखादी व्यक्ती भेटल्यानंतर तिला हात जोडून नमस्कार करणे ही आपली भारतीय पद्धत आहे. परंतु पाश्चात त्यांच्या विशेषतः इंग्रजांच्या प्रभावामुळे आता हस्तांदोलन हे सर्रास रूढ झाले आहे. हस्तांदोलन केले नाही तर आपण त्या व्यक्तीचा सन्मान केला नाही असेदेखील काही जणांना वाटते. वेगळा मुद्दा म्हणजे कोरोना काळात हस्तांदोलन टाळा असे सांगितले जात होते.      अभिवादन करण्याच्या विविध पद्धती भारतात प्रचलित आहेत. त्यातील भेटलेल्या माणसाला राम राम म्हणणे ही पद्धत बहुदा सर्वात जास्त प्रचलित आहे. परंतु आता याची जागा विशेषतः तरुण पिढीमध्ये हाय हॅलो या शब्दांनी घेतल्याचे दिसून येते. मी ११-१२ वीत शिकत असताना माझ्या एका मित्राने त्याच्या दुसऱ्या एका मित्राची एकदा ओळख करून दिली.  त्याला मी नमस्कार म्हणालो तर त्या दोघांनाही ते वेगळेच वाटले होते.           अशीच गोष्ट बसण्याच्या, जेवण्याच्या  सवयी

वयाचा परिणाम

Image
      "आप की दिखाई देनेवाली आयु कम है और जो आयु है वो जादा है" संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि स्वदेशी जागरण मंचाचे पदाधिकारी श्री.कश्मीरीलाल मला म्हणाले. ही गोष्ट २०१७ किंवा २०१८ मधील आहे. असा अनुभव मला अजून काही वेळा आलेला आहे.            जन्मदिनाकांनुसार माणसाचे वय ठरते. पण इतरांना वाटणारे वय काहीवेळा कमी वाटते किंवा जास्त वाटते. त्यातून वरील प्रकारचे संवाद होतात. ( बालगंधर्व)           ( छोटा गंधर्व) (दोन्ही छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)          वयाचा परिणाम वेगवेगळ्या माणसांवर वेगवेगळा होत असतो. मध्यंतरी बालगंधर्व या उपाधीने सन्मानित नारायणराव राजहंस आणि छोटा गंधर्व उपाधीने सन्मानित सौदागर नागनाथ गोरे या दोघांच्या ७५ निमित्त घेतलेल्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यात आल्या. बालगंधर्वांच्या आकाशवाणीवरील मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या पण विस्मरणाचा परिणाम, तसेच बोलण्यात अस्पष्टता जाणवत होती. गायन करण्याच्या स्थितीत मात्र ते नव्हते. छोटा गंधर्व यांची मुलाखत दूरदर्शनने घेतलेली होती. त्यात त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. पण स्मरण पक्के होते, बोलणे स्पष्ट होते. याचबरोबर अनेक रचना