Posts

Showing posts from December, 2025

स्मरण विस्मरण

Image
                      काही प्रसंग, घटना, गोष्टी घडतात त्यावेळी खूप महत्त्वाच्या वाटतात त्यावेळी त्या लक्षात राहतात. परंतु काही दिवसानंतर अशा गोष्टी विसरल्या जातात. घडताना महत्त्वाच्या वाटलेल्या प्रसंगांची नंतर कोणीतरी आठवण करून देते पण त्याची आठवण येतेच असे नाही. मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते पंकज कपूर यांची एक मुलाखत पाहत होतो. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीची तयारी करताना पंकज कपूर यांच्या नातेवाईकांशी, मित्रांशी चर्चा करून प्रश्न काढलेले होते. त्यात एक प्रश्न असा होता की , "बऱ्याच वर्षांपूर्वी पंकज कपूर यांनी बसमध्ये भिकाऱ्याचे सोंग वठवून सर्वांना चकित करून सोडले होते." हा प्रसंग मुलाखतकाराला पंकज कपूर यांच्या भावाने सांगितला होता. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर पंकज कपूर म्हणाले, " मला यातले काहीही आठवत नाही." मुलाखतकाराने भावाचे नाव घेऊन हा प्रसंग त्यांच्याकडून कळल्याचे सांगितले पण तरीदेखील पंकज कपूर यांना तो प्रसंग काही पाठवला नाही. मोघमपणे ते एवढंच म्हणाले की , "असं घडलेलं असू शकतं ."त्यांच्या उत्तरावरून त्यांना हा प्रसंग आठवला...

अशाच काही आठवणी

Image
      आयुष्य जगत असताना अनेक प्रसंग घडतात. घडामोडी होतात. गोष्टी घडतात किंवा बिघडतात. त्या त्या प्रसंगाप्रमाणे त्या आठवणी मनावरती कोरल्या जातात. या आठवणींचा काळ हा कमी अधिक असतो. आठवणीच्या प्रसंगाच्या तीव्रतेप्रमाणे या आठवणी थोडा किंवा जास्त वेळ लक्षात राहतात. कमी तीव्रतेच्या प्रसंगांच्या आठवणी काही दिवसानंतर विस्मरणात जातात. म्हटले तर तो प्रसंग किंवा ती घटना तशी फारशी महत्त्वाची नसते. परंतु अशा आठवणींपैकी काही आठवणी प्रसंगानिमित्त पुन्हा वर येतात. एका अर्थाने ते काही क्षण अनुभवण्याची पुन्हा संधी देतात. या लेखाच्या निमित्ताने माझ्या अशाच काही आठवणी या प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर येथील १९९७ ते १९९९ या काळातील आहेत. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणजे प्रचारक म्हणून मी तिथे काम करत होतो.  काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते श्री. कुलभूषण बाळशेटे यांच्याशी काही निमित्ताने फोनवर बोलणे झाले त्यांना सर्व कार्यकर्ते दादा बाळशेटे म्हणून ओळखतात. फोनवर बोलताना मी त्यांना विचारले, " दादा, तुमच्या घरी अजून जिंदा तिलिस्मात नावाचे...

गुलामगिरीच्या खुणा

Image
     आपल्या प्राचीन भारतदेशावर सुमारे हजार वर्षे परकीय आक्रमणे झाली. संपत्ती सत्ता यांच्या अभिलाषेतून झालेल्या या आक्रमणांनी धर्मप्रसार देखील घडवला हा इतिहास आहे. आक्रमकांच्या या मालिकेत इंग्रजांच्या आक्रमणाचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पद्धतशीरपणे भारतीयांच्या मनात हीनपणाची भावना निर्माण केली. आपल्या धूर्त योजनाबद्ध प्रयत्नांतून त्यांनी भारतीय विचार ग्रंथ तत्वज्ञान यांची मोडतोड केली. भारतात सर्वच कसे चुकीचे होते असा भाव शिक्षणातून लोकांच्या मनात झिरपवला. ह्यातून गुलामगिरीची भावना निर्माण झाली. दुर्दैवाने ही भावना अनेक भारतीय यांच्या मनात खोलवर रुजली होती. १९४७ मध्ये खंडित भारत स्वतंत्र झाला. परंतु अजूनदेखील या गुलामगिरीच्या  काही खुणा  दिसून येतात.    ( क्रांतिसिंह नाना पाटील यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)  ( मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.  १९९० १९९१मध्ये सातारा जिल्ह्य...

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

Image
      मार्च १९८८ मध्ये मी १० वीची परीक्षा दिली. त्याचा निकाल जून १९८८ मध्ये बहुतेक १४ जूनला लागला. आता पुढे कुठे प्रवेश घ्यायचा याची चर्चा सुरू झाली. पुण्यात स.प.महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असे ठरले. पण यात दोन तीन दिवस गेले. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश मिळाला नाही. पुण्यात तेव्हा ११ वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये अर्ज केला आणि स.प. महाविद्यालयात प्रवेश मिळाला.      वसतिगृहात राहायचे होते. तिथेही प्रवेश मिळाला. मग निघण्याची तयारी सुरू झाली. मला वसतिगृहावर सोडायला काका श्री बाळासाहेब गाडे आले होते. मला खोली क्रमांक १३ देण्यात आली. पहिल्या दिवशी काकादेखील मुक्कामी राहिले. ते दुसऱ्या दिवशी गेले. बहुतेक त्याच दिवशी थोड्या वेळाने बारावीत असलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने खोलीचे दार वाजवले. त्याने विचारले, " तुझं नाव काय? तुला १० वीला किती टक्के मिळालेत?" "सुधीर गाडे. ८६%" मी उत्तर दिले. " हा माझ्या करमाळा गावचा वीरेंद्र घोगरे. यालाही ८६% मिळालेत. तुम्ही एकत्र राहा. तुमचं जमेल!"  या १२ वीतल्या मुलाचं नाव कळालं, "वैभव...

तंट्यामामा भिल्ल यांचे जीवन व कार्य

Image
     कोणत्याही सामान्य माणसाची इच्छा, ' आयुष्य साधे, सरळ थोड्याफार सुखात जावे' हीच असते. परंतु ज्या वेळेला परिस्थिती बिकट होते त्यावेळेला. हाच माणूस वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. कुणी लाचार होऊन परिस्थितीला शरण जातो. तर कोणी त्या परिस्थितीत स्वतःपुरता संघर्ष करून सुखी होतो. पण काहीजण परिस्थितीशी संघर्ष करून परिस्थिती बदलण्यासाठी धडपडतात. अशाच माणसांमध्ये तंट्यामामा भिल्ल यांचा समावेश केला पाहिजे.                        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )    १८४२ ते १८८९ असे ४७ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. या काळात भारतावर इंग्रजांची सत्ता होती. सत्ता गाजवणारे इंग्रज तसे मूठभरच होते. परंतु दुर्दैवाने आपल्याच भारतीय लोकांनी त्यांना साथ दिली आणि इतर भारतीयांच्या होणाऱ्या शोषणात सहभाग घेतला. आजच्या मध्य प्रदेशातील 'निमाड' या वनक्षेत्रात याच प्रकारची परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या प्रथा परंपरा , गरिबांचे शोषण करणारे इंग्रज सरकार आणि या शोषणात इंग्रजांना साथ देणारे भारतीय सावकार, पोलीसातील भा...