Posts

Showing posts from December, 2021

पुस्तक परिचय : ग्रीकपुराण

Image
 ग्रीकपुराण  लेखिका सुप्रिया सहस्रबुद्धे  रोहन प्रकाशन पुणे काही दिवसांपूर्वी हे पुस्तक वाचून पूर्ण केले. प्राचीन जगात ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. त्यातील काही संदर्भ विशेष नामे अजून देखील वापरले जातात. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी पॅंडोरा पेपर्स,  पेगासिस सॉफ्टवेअर यांची चर्चा झाली यातील पॅंडोरा,  पेगासिस यांच्या कथा प्राचीन ग्रीक साहित्यात आढळतात. असे अनेक संदर्भ आजदेखील वापरले जातात. अशा संदर्भांची माहिती होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक चांगले आहे. ज्यामध्ये देवांचा राजा झ्यूस , त्याची भावंडे पॉसिडॉन, हेडीज यांच्या बरोबरच झ्यूसची बहीण आणि पत्नी हेरा , युद्धकौशल्य आणि शहाणपणाची देवताअथीना , प्रेमदेवता ॲफ्रोडिटी, कृषीदेवता डिमीटर, आनंदाचा देव डायोनिसिस उषा अनेक देवदेवतांच्या कथा तसेच वीर व्यक्तींच्या कथा दिलेल्या आहेत. यातील काही विलक्षण कथा वीर हेरॅक्लीस, अकिलीस, स्वत:चा मुलगा पेलॉप्स याला मारून त्याचे मांस देवांना वाढल्याने झाडाखाली पाण्यात उभे राहून पाणी न पिऊ शकण्याची आणि  फळ न खाऊ शकण्याची शिक्षा मिळालेला टॅन्टॅलस, आतिथ्यधर्माचा भंग केला म्हणून  डोंगराच्या तळाहून मोठा पाषाण

असामान्य प्रतिभावंताची माणुसकी

Image
  संघाचे चौथे सरसंघचालक प.पू. राजेंद्रसिंहजी तथा रज्जूभैय्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहिलेला लेख ( पूर्व प्रसिद्धी २४ जुलै २०२१ , विश्व संवाद केंद्र, पुणे)                                                .           राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अद्भुत संघटना आहे. संघामध्ये असामान्य व्यक्तिंपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण सहजपणे बंधुतेचा व्यवहार करतात. असामान्य व्यक्ती आपले असामान्यत्व मागे सोडून सर्वांच्या सुखदुःखाशी समरस होतात. अशाच असामान्य व्यक्तिंपैकी एक म्हणजे संघाचे चौथे सरसंघचालक प.पू. राजेंद्रसिंहजी तथा रज्जूभैय्या. प्रतिभावंत असणाऱ्या रज्जूभैय्यांना नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रमण यांनी महाविद्यालयीन परीक्षेत 'रमण परिणामावरील प्रात्यक्षिकासाठी' १०० पैकी १०० गुण दिले आणि आपल्याबरोबर संशोधनासाठी बंगळुरू येथे आमंत्रित केले. स्वातंत्र्यानंतर भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांनी रजूभैय्या यांच्यातील शास्त्रज्ञाची गुणवत्ता ओळखून त्यांना भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात संशोधक म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. परंतु पूर्ण विचारांती 'संघाचे काम

एका अनुवादाचा प्रवास

Image
    " गाडे सर, पान २५ वर पहा काय लिहिलंय ते." काश्यपदादा साळुंके मला म्हणाले आणि हा प्रवास सुरू झाला. हा प्रसंग १४ एप्रिल २०१८ चा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझे भोर, जिल्हा पुणे येथील राजा रघुनाथराव विद्यालयात भाषण होते. हे भाषण झाल्यानंतर श्री.काश्यपदादा साळुंके यांच्याबरोबर संवाद झाला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यांचा परिचय करून घेणे, त्यांना समजून घेणे हा एक पैलू आहे. यानुसार त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देखील समजून घेतले होते असे निश्चितपणे म्हणता येईल. डॉ. आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला दिलेल्या भेटी, संघाच्या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाला दिलेली भेट, तेथे मांडलेले विचार, संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या भेटी याबद्दल संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष भेटींमध्ये वारंवार सांगितलेदेखील आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक आदरणीय कै. दत्तोपंत ठेंगडी, संगमनेरचे कै. अण्णा बागूल, पुण्यातील कै. भास्करराव

ज्येष्ठ प्रचारकांचा सहवास

Image
  " सहज बोलणे हाचि उपदेश" असं संतांबद्दल बोललं जातं. संघकार्यात ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारक यांच्या बोलण्याबरोबर वागण्यातूनही मार्गदर्शन होते. माझ्या प्रचारक काळातील अशाच काही आठवणी.  संभाजीनगरला असताना त्यावेळचे प्रांतप्रचारक कै.मुकुंदराव पणशीकर एका बैठकीसाठी तिथे आले होते.  मोठ्या प्रतिमा उपलब्ध नसल्याने बैठकीच्या ठिकाणी छोट्या प्रतिमा ठेवल्या होत्या. बैठक संपल्यानंतर मुकुंदराव म्हणाले, " प्रतिमा फार आटोपशीर होत्या. " त्यांना मी अडचण सांगितली. नंतर लगेच नवीन प्रतिमा तयार करून घेतल्या.     संभाजीनगरहून दोन ज्येष्ठ प्रचारकांना स्वतंत्र गाडीने पुण्यापर्यंत सोडण्यास येण्याचा अनुभवदेखील मिळाला. पहिल्यांदा कै.सुरेशराव केतकर यांच्याबरोबर पुण्याला आलो. त्यांचा स्वभाव थोडा गंभीर आणि अबोल होता. त्यामुळे प्रवासात विशेष काही बोलणे झाले नाही. नंतर काही दिवसांनी कै दामुअण्णा दाते यांच्याबरोबर पुण्याला येण्याचा योग आला. दामुअण्णा यांचा स्वभाव बोलका,  त्यामुळे प्रवासात विविध विषयांवर सहज गप्पा झाल्या. तसेच त्यांना संगीताची आवड असल्याने काही काळ गाणीदेखील ऐकली. अशा दोन वेगवेगळ्या स

संभाजीनगर: काही आठवणी

Image
      मराठवाड्यातील संभाजीनगर (प्रचलित नाव औरंगाबाद) इथे १९९७ ते १९९९ अशी दोन वर्षे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम केले. त्या कालावधीतील हे काही अनुभव.             पुण्यातून दुपारी बाराच्या सुमाराला सुटणाऱ्या गाडीने निघून मी सायंकाळी सहाच्या सुमाराला संभाजीनगर येथे पोहोचलो. रस्ता विचारत त्यावेळी लोकसेवा मंडळ, खडकेश्वर येथे असणाऱ्या कार्यालयात पोचलो. हनुमान सायं शाखेत गेलो. नंतर रात्री त्यावेळचे प्रांत सहसेवाप्रमुख श्री.गिरीशराव कुबेर यांच्याबरोबर ज्येष्ठ स्वयंसेवक श्री.पी.एस. उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांच्याकडे जेवायला गेलो. मराठवाडी पाहुणचाराचा अनुभव घेण्याचा तो माझा पहिला प्रसंग. हा अनुभव सातत्याने येत राहिला सातत्याने येत राहिला आणि याचा परिणाम चार-पाच महिन्यानंतर दिसला. माझ्या वजनात जवळपास १५ किलो वाढ झाली. त्यावेळी गमतीने एका बैठकीत त्यावेळचे प्रांत प्रचारक श्री.सुहासराव हिरेमठ म्हणाले, " हा सुधीरचा मोठा भाऊ नाही तर सुधीरच आहे!"             संभाजीनगरमध्ये त्यावेळी माजी मा. प्रांत संघचालक प्रल्हादजी अभ्यंकर राहत असत. प्रल्हादजी वेळेचे अगदी पक्के होते. एके

धुळे: अजून काही आठवणी

Image
 "इक दिन हाथी तो इक दिन घोडा,  इक दिन पैदल चलना जी" मी धुळ्यात असताना नाशिक विभागातील कार्यकर्त्यांची एक बैठक मातोश्री वृद्धाश्रमात झाली. ती संपल्यानंतर वाहन येण्याची वाट बघत असताना एक कार्यकर्ते हे गीत सुरेल आवाजात म्हणत होते. प्रचारकांच्या आयुष्याला हे गीत किती चपखल बसते. कारण समाजातील सर्व स्तरांमध्ये काम प्रचारकांना करावे लागते. वेगळ्या अर्थाने आयुष्यातील सर्व दिवस सारखे नसतात. सर्वच दिवस प्रेरणादायक नसतात. काही साधारण काही खारट काही तुरट तर काही कडू आठवणी घेऊन येत असतात. मी ज्या वेळेला धुळ्यात प्रचारक होतो त्या वेळेला जिल्ह्याचे कार्यालय देवपूर मधील प्राध्यापक कॉलनीत संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक ज.मो. दीक्षित यांच्या बंगल्यात होते. त्यांचे चिरंजीव श्री. सतीश दीक्षित यांचे बारकाईने लक्ष असायचे. धुळ्यातील कार्यालयाची आठवण म्हणजे नळाचे पाणी कधीही यायचे. एकदा उन्हाळ्यात बरेच दिवस पाणी आले नाही म्हणून सतीशरावांनी पाण्याचा टॅंकर मागवला. पाणी बंगल्यातील विहिरीत ओतून घेतले. पण ते सर्व पाणी जमिनीत मुरून गेले हा एक वेगळाच अनुभव होता. धुळ्यातील २६ जानेवारीचे दोन दिवस वेगवेगळ्या कारणांन

धुळे : काही प्रसंग, काही व्यक्ती

Image
 धुळे जिल्ह्यात आणखीनही काही प्रसंग,  व्यक्ती मनात घर करून राहिलेल्या आहेत. त्यापैकी हे काही प्रसंग. २००१ मध्ये महाराष्ट्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी समाजाला मदत करण्याच्या हेतूने धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा छावणी उभे करण्याचे ठरले. योग्य जागेची पाहणी करत असता दोंडाईचा या गावाजवळील मालपूर याठिकाणी पुरेसे पाणी आहे; तेथे ही छावणी उभी करता येईल असे ठरले. त्याची तयारी सुरू झाली आणि काही दिवसात सुमारे ५० जनावरांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था असणारी छावणी सुरू झाली. याकामी मालपूर गावामधील स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन ही सगळी व्यवस्था केली. काही महिने ही छावणी चांगल्या प्रकारे कार्यरत होती. या काळात तिथे अनेक वेळा जाणे झाले. त्यावेळी एके दिवशी घोंगडीच्या गादीवर झोपण्याचा प्रसंग आला.      २००० मध्ये राष्ट्रजागरण अभियानाच्या दरम्यान त्यावेळचे मा. प्रांत संघचालक पद्मभूषण डॉ. अशोकराव उपाख्य काका कुकडे यांचा धुळे शहरात प्रवास झाला. त्यांच्या उपस्थितीत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका ठरवलेल्या होत्या. त्यापैकी एक