Posts

Showing posts from March, 2022

सरसकट विशेषण

Image
  " जेवण काय सुंदर झाले."  माझ्या परिचयातील एकजण म्हणत होता. हल्ली बरेच वेळा ' सुंदर ' हे विशेषण सरसकटपणे वापरले जाते असे माझ्या लक्षात आले आहे.     बरेच जण म्हणत असतात. " भाषण फार सुंदर झाले." " लेख अतिशय सुंदर होता. ", " सुंदर प्रसंग" ,  "सुंदर सहल झाली." अशी काही उदाहरणे सांगता येतील. पण योग्य त्या ठिकाणी योग्य ते विशेषण वापरणे आवश्यक आहे असे वाटते.     जेवणाबाबत बोलायचे असेल तर  ' चविष्ट' , 'रूचकर' ही विशेषणे अनुरूप आहेत. भाषण लेखन याबाबत 'प्रभावी' , ' माहितीयुक्त', ' प्रेरणादायक '  अशी विशेषणे वापरता येतील. ' सुंदर ' हे विशेषण चित्र, छायाचित्र, व्यक्ती यांच्यासाठी वापरणे योग्य राहील असे वाटते. यात एक छोटी गोष्ट करता येते ती म्हणजे ' छान' , ' मस्त' ही विशेषणे मात्र सगळीकडे वापरता येऊ शकतात.      सरसकट एकच विशेषण सगळीकडे वापरण्याचे कारण म्हणजे भाषा चांगल्या पद्धतीने समजलेली ( अवघड शब्द ' आत्मसात केलेली ' ) नसणे हे आहे असे मला वाटते. तसेच भाषेचा वापर फक्त

म्हणींचे म्हणणे

Image
   ' दिव्याखाली अंधार' ही म्हण जेव्हा मी शाळेत असताना पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला प्रश्न  पडला होता की असं कसं असू शकेल. दिवा म्हणजे त्यावेळी प्रामुख्याने बल्ब असायचे. ते वरती टांगलेले असत. त्यांच्या खाली उजेडच असायचा मग असे कसे? नंतर केव्हातरी लक्षात आले की या म्हणीतील दिवा म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा असला पाहिजे. अशा दिव्याखाली अंधारच असतो. पण या म्हणीमुळे 'जो विचार सांगतो त्याच्या जवळपास त्याचे अनुकरण होतेच असे नाही' हा बोध झाला.      म्हणी ह्या माणसांच्या आयुष्याच्या अनुभवातून तयार होतात आणि पिढ्यानुपिढ्या चालत राहतात. अगदी कमी शब्दात जास्त बोध करून देतात. मानवी जीवन हजारो वर्षे शेतीला, गावगाड्याला धरून स्थिर राहिले. त्यामुळे अनेक जुन्या म्हणी या जीवनानुभवाशी संबंधित आहेत. पण औद्योगिकीकरणाने शहरांची वाढ झाली. त्यामुळे जीवनानुभव बदलला. त्यामुळे या म्हणी आता कालबाह्य झाल्या आहेत असे वाटते.     अशी एक आता कालबाह्य झालेली म्हण म्हणजे, 'घरोघरी मातीच्या चुली'. ही म्हण मी जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा घरोघरी चुलीऐवजी स्टोव्ह हे सर्रास होते. आता हळूहळू हा प्रवास एलपीज

धन्यवाद किती आवश्यक?

Image
 " धन्यवाद सुधीर!" काही महिन्यांपूर्वी एका कार्यकर्ता मित्राने मला फोनवर म्हणाला. फोन बंद झाला. मी लगेच त्याला परत फोन केला आणि म्हणालो, " धन्यवाद देण्याची आवश्यकता नाही. जे बोलणं झालं ते आपल्या कामाबद्दलच आहे." मग त्याला‌ थोडेसं (!) पटलं.    गेल्या काही वर्षांत धन्यवाद देण्याचं प्रमाण वाढलं आहे असे माझे निरीक्षण आहे. जिथे औपचारिकता आहे, अनोळखी व्यक्तिंनी केलेली मदत आहे तिथे धन्यवाद देणे योग्य आहे.‌ पण जिथे जिव्हाळ्याचे, नात्यांचे संबंध आहे तिथे अशा औपचारिकतेची गरज नाही असे वाटते.       अशाप्रकारे उठसूट धन्यवाद देण्यामुळे आपल्या मूल्यव्यवस्थेवर हळूहळू परिणाम होतो आहे. कारण आता काही घरांतही मुलाने किंवा मुलीने अगदी छोटंसं काम केले की धन्यवाद द्यायचे प्रमाण वाढत चाललं आहे असे माझे निरीक्षण आहे. उदाहरणार्थ आई किंवा वडिलांना तहान लागली असेल आणि मुलाने किंवा मुलीने पाणी आणून दिले तर लगेच पालक 'थँक्यू' म्हणतात. परंपरेने आपल्याकडे कर्तव्याला जास्त महत्त्व दिले आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे मुलामुलींचे कर्तव्य मानले गेले. ज्यावेळी अशाप्रकारे धन्यवाद दिले जातात त्याव

पुणेकरहो चालण्याची सवय करूया!

Image
  काल (६/०३/२०२२) मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले. त्यानंतर नव्याची नवलाई म्हणून कालपासून पुणेकर नागरिकांनी मेट्रोतून प्रवासाची उत्सुकता दाखवत गर्दी केली आहे. कालच्या (६/०३/२०२२) भाषणात मा.मोदीजींनी विकासाचा आराखडा, उद्दिष्ट सांगितले. पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्या पुणेकरांसाठी बोलून दाखवला की मेट्रोतून प्रवासाची सवय सर्वांनी लावून घ्यावी. सरकारी योजना एका टप्प्यावर पोचली आहे. पण ती यशस्वी होण्यासाठी आता पुणेकर म्हणून आपली जबाबदारी आहे की आता आपण ही सवय करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपले, घर, कामाचे ठिकाण ते मेट्रो स्थानकापर्यंत चालत जाणे आवश्यक ठरणार आहे. पण सर्वसाधारणपणे बोलायचे ठरले तर पुण्यातील बऱ्याच जणांना अगदी घराच्या, कार्यालयाच्या पहिल्या पायरीपर्यंत गाडी नेण्याची सवय असते. ही सवय बदलून चालण्याची सवय करायली हवी. याबाबत मुंबईकरांचे अनुकरण करण्यासारखे आहे असे मला वाटते. चला पुणेकरहो चालण्याची सवय करूया. आज  (७/०३/२०२२) मएसो शिक्षण प्रबोधिनी बैठकीसाठी मएसोचे आजीव सभासद श्री.गोविंद कुलकर्णी यांच्यासोबत आज मेट्रोतून प्रवास केला.

एक प्रसंग समाधानाचा

    सोमवार ७ मार्च २०२२ रोजी मएसो शिक्षण प्रबोधिनीच्या बैठकीत जाण्यासाठी निघालो असताना मुख्य दरवाजाजवळ आपल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची २०१७-१८ ची इ.१२ वी इलेक्ट्रॉनिक्सची माजी विद्यार्थ्यानी विस्मया मुळे भेटली. ती सध्या पुण्यामध्ये कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या चौथ्या वर्षाला शिकत आहे. मेट्रोतून जाण्यासाठी म्हणून ती आली होती. वाटेत आमची भेट झाली. ती अगदी मनापासून म्हणाली की सर तुमच्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक्स चांगले जमते आहे. छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात. आता पुन्हा जेव्हा प्रत्यक्ष रुपात महाविद्यालय सुरू झाले त्यावेळी तिच्याशिवाय तिच्या बरोबरच्या फक्त १-२ मुलींनाच प्रात्यक्षिक व्यवस्थित करायला जमले. हे अगदी उत्साहाने ती सांगत होती.  मी बऱ्याच वेळा आमच्या विद्यार्थ्यांना गंमतीने म्हणतो की सुधीर भोसलेसर आणि आमच्या जाचातून पुढे जाऊन तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकलातच तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. विस्मयाला मी त्या वाक्याची आठवण करून दिली. यानिमित्ताने मोकळेपणाने एक गोष्ट मी सांगतो की सुधीर भोसलेसरांकडून मलादेखील अनेक गोष्टी शि

काळं काळं मोत्याचं जाळं

Image
  "काळं काळं मोत्याचं जाळं ! अरे, सुधीर असं काय करतोस ,‌‌‌अरे आपला रंग पक्का आहे. उन्हामुळे अधिक पक्का होतो." भारतीमावशी मला समजावत होती.       भारतीमावशी दुधाळ ही तशी आमच्या नात्यातील नाही. परंतु आमचे वडील कै. बापू (शिवलिंगशेठ गाडे) यांची तिच्या घरच्यांशी चांगली ओळख होती.‌ मी प्राथमिक शाळेत शिकत होतो तेव्हा ती साखरवाडी येथील सरकारी आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करत असे. आमच्या घराजवळ खोली भाड्याने घेऊन रहात असे. तिचा हसरा,  विनोदी, बोलका, स्वभाव परिचितांना लगेच आपलंस करून घेत असे.      मला स्मरतं तसे मी प्राथमिक शाळेत असताना मला माझ्या काळ्या सावळ्या रंगाबद्दल वाईट वाटत असे. कारण माझे दोन्ही भाऊ सचिन आणि संदीप हे रंगाने उजळ आहेत. गंमतीगंमतीत आई मला म्हणत असे की , " तू पोटात असताना मी काळी माती खात होते म्हणून तू काळासावळा झालास." मग मी चिडत असे, बहुधा आरडाओरडाही करत असे की , " तू का काळी माती खाल्लीस?" त्या वयात अनुवांशिकता वगैरे काही समजायची शक्यता नव्हती. पण याच वेळी भारतीमावशी साखरवाडीत आली आणि तिनं मला समजावायला सुरूवात केली, " काळं काळं म

लागली पैज

Image
 " लागली पैज शंभर रूपयांची!" माझा मित्र संजयकुमार तांबे म्हणाला आणि पैज लागली.          ही गोष्ट १९९० मधील आहे. त्यावेळी आजच्यापेक्षा १०० रूपयांना जास्त किंमत होती. मी तेव्हा पुण्यात स.प.महाविद्यालयात शिकत होतो आणि वसतिगृहात राहत होतो. त्यावेळी माझे काका कै. विष्णुपंत गाडे हे राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. मलाही राजकारणाच्या चर्चांमध्ये आजच्यापेक्षा जास्त रस होता. माझा तेव्हाचा वर्गमित्र संजयकुमार तांबे याचे वडील कै.गणपतराव तांबे उर्फ बापू हे देखील राजकारणात सक्रिय होते. आम्हा दोघांच्या घरी राजकारणाची पार्श्वभूमी असल्याने दोघांनाही राजकीय चर्चांमध्ये खूप रस होता. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झालेली होती. या पार्श्वभूमीवर कोणाला किती जागा मिळणार याबाबत आमची जोरदार चर्चा चालू असताना एकदम पैजेचा विषय निघाला आणि पैज लागली. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यावेळी ही खूपच मोठी रक्कम होती. पण लागली पैज!   बहुधा युतीला जास्त जागा मिळणार की नाही याबाबत ती पैज होती. काही दिवसानंतर विधानसभा न