Posts

Showing posts from July, 2021

अक्षरधाम मंदीर दिल्ली

Image
  ऑक्टोबर २०१७ मध्ये    दिल्लीला गेल्यावर आवर्जून भेट दिली ती अक्षरधाम मंदिराला. दुपारी एकच्या सुमारास मंदिरात पोचलो. सुट्टीचा वार नसतानाही मंदिरात चांगली गर्दी होती.आत जाताना मोबाइल, पुस्तक इ.सर्व साहित्य जमा केलं. विशेषतः मोबाइल जमा केल्यामुळे आता एका नव्या अनुभवाचा निर्विघ्न आनंद घेता येणार होता.या आंनदानुभवाचं हे वर्णन. ( छायाचित्र  सौजन्य विकिपीडिया  Copyright held by BAPS Swaminarayan Sanstha (web: www.baps.org, email: info@baps.org)           १०० एकर परिसरात हजारो कारागिरांनी काही वर्षे खपून भारतीय संस्कृतीचे हे मनोहर शिल्प उभं केलं आहे.ते बघताना काही किलोमीटर पायपीट ही होतेच.त्यात आनंद आहे.( ज्यांना चालण्याची अडचण आहे त्यांच्यासाठी चाकाची खुर्ची उपलब्ध करून दिली जाते.ढकलणारे खंबीर लोक बरोबर हवेत.)         आवश्यक अशा सुरक्षातपासणीतून आत गेल्यावर काय बघू आणि काय नको असं वाटेल इतकं आत बघण्यासारखं आहे.तिथल्या छोट्या माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे जायचं तर सुरुवातीला दहा दिशांची प्रतीकं म्हणून दशद्वार आहेत.त्या कमानीसारख्या दारांवरून पाणी सारखं खाली पडत असतं. जणू त्या दारांवर पारदर्शक

महाबळेश्वरकर पती पत्नी

Image
  कै. रवींद्र सदाशिव  महाबळेश्वरकर आणि कै. शर्मिला रवींद्र महाबळेश्वरकर                                                                           ( फोटो शंतनू अगदी लहान असतानाचा २००४ मधील)      पुण्यात १९९५ ते १९९७ मध्ये मी एका खाजगी कंपनीत नोकरीला होतो. त्या दरम्यान या दोघांची आणि माझी पहिली भेट झाली. त्यावेळी मी मंगळवार पेठेत रवीचे मित्र श्री.प्रकाश मुळे यांच्या खोलीवर राहत असे. महाबळेश्वरकर त्यावेळी असणाऱ्या शाहू नगराचे कार्यवाह होते. बऱ्याच वेळा दाढी वाढवत असल्याने महाराज आणि नगर कार्यवाह असल्याने कावा या नावाने ओळखले जात.         रवी हा एक कलंदर मनस्वी असा माणूस होता. सुरुवातीला लौकिक शिक्षण कमी असल्यामुळे रवी गाडी दुरुस्तीचे काम करीत असे. दोन चाकी गाड्या तो सफाईने दुरुस्त करत असे.त्याच दरम्यान एका गाडीदुरुस्ती केंद्रावर प्रशिक्षक म्हणून काम करत असे. आयुष्यात काही काळ केवळ संघासाठी द्यायचा असे ठरवून रवी काही महिने विस्तारक होता. परत आल्यानंतर रवीने पुणे जनता बँकेत सेवक म्हणून नोकरी सुरू केली. परंतु त्याचबरोबर लौकिक शिक्षण वाढवण्याचाही प्रयत्न केला. काही वर्षांच्या प्रयत्नाने पदवी

स्वारगेट - साखरवाडी एस.टी

Image
ऑगस्ट २०१८ मध्ये बऱ्याच वर्षांनी स्वारगेटवरून संध्याकाळी ६ वाजता सुटणाऱ्या एस.टी. ने साखरवाडीला जायचा योग आला. त्या प्रवासात मनात सहजच जुन्या आठवणी दाटून आल्या. १९८८ साली १० वी झाल्यानंतर ११ १२ वीला पुण्यात शिक्षणासाठी होतो त्यावेळेस ही एस.टी. माझ्यासाठी फार महत्वाची होती.त्यावेळी काय होतं आणि आता काय आहे असा विचार सुरू झाल्यावर, एकेक गोष्टी आठवू लागलो.त्यावेळी साखरवाडी ते पुणे तिकीट १८ किंवा १९ रुपये होतं. एसटीची बांधणीही वेगळ्या प्रकारची असायची.वाहकाला बसण्यासाठी जागा मागे असायची.आतमध्ये एका बाजूला तीन तर दुसऱ्या बाजूला दोन जणांसाठी बसण्याची जागा असायची.त्यावेळी ही एस टी स्वारगेट कात्रज, शिरवळ, भादे, भोळी,लोणंद, बडेखान अस करत रात्री ९ च्या सुमाराला साखरवाडीला पोचायची. स्वारगेटहून सायंकाळी ६ ला निघणारी ही एस टी दुपारी १२.३०- १ च्या सुमारास फलटणहून निघायची.साखरवाडी, बडेखान, लोणंद, शिवाजीनगर ( ता.खंडाळा जि. सातारा) , मोर्वे, शिरवळ असे टप्पे घेत स्वारगेटला पोचायची.पण बऱ्याच वेळा या गाडीचे चालक वाहक हे अगदी आयत्यावेळी ठरायचे.त्यामुळे स्वारगेटला पोचेपर्यंत कधी कधी उशीर व्हायच

सांगतो वडिलांची महती.....

Image
      आमचे वडील कै. शिवलिंग कृष्णाजी गाडे यांना साखरवाडीत शिवलिंगशेठ आणि घरात बापू म्हणून ओळखले जाई. त्यांच्या अनेक आठवणी आहेत.       आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे यांनी त्यांचे मूळ गाव बीबी ( आदर्की ता.फलटण जवळ) हे सोडून साखरवाडीत दुकानदारी सुरू केली. त्यांना चांगली धनप्राप्ती झाली. त्यातून दुकाने, शेतजमीन, घरे इत्यादी गोष्टी उभ्या राहिल्या.आमच्या बापूंच्या लहानपणी आठवड्यातून दर बुधवारी केस कापण्यासाठी म्हणून नाभिक आमच्या घरी येत असे आणि आजोबांसह सगळ्यांचे केस कापून गुळगुळीत टक्कल करीत असे. साधारणपणे बापूंनी त्यांच्या १६/१७ व्या वर्षी १९६४/६५ मध्ये दर आठवड्यात केस कापणार नाही असे सांगितले आणि तिथून स्वतः ते आणि अन्य भावंडे केस वाढवू लागले.             बापूंना एसटीचे विलक्षण आकर्षण होते. त्यांना एस टी मध्ये नोकरी करायची होती. परंतु आजोबांच्या आग्रहामुळे त्यांनी दुकानदारी सुरू केली. पण एस टी चे आकर्षण कायम राहिले आणि फलटण एसटी आगार, तेथील व्यवस्थापक, चालक वाहक, अन्य कर्मचारी यांच्याशी त्यांचे सदैव चांगले संबंध राहिले.               बापूंचा दुसरा विशेष गुण म्हणजे त्यांचा घड्याळाच्या व

थोडी धडपड तहानलेल्यांसाठी...

Image
  एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या म.ए.सो.संस्थेच्या पुण्यातील शाखांनी दुष्काळ निवारण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम ठरवला. आमच्या गरवारे महाविद्यालयानेदेखील त्यात सहभाग घेतला. तो आठवडाभर आम्ही सगळे त्या धावपळीत होतो. रस्त्यावर स्टॉल लावणे, पत्रके वाटणे, कॉलेजमध्ये वैयक्तिक भेटून, बैठकांमध्ये आवाहन करणे असे वेगवेगळया पद्धतीने प्रयत्न केले गेले.अनेकजण यामध्ये सहभागी झाले.रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांनी निधी कलशात टाकलेल्या पैशांपासून अनेकांनी आपणहून दिलेल्या रोख रकमा आणि धनादेशापर्यंत अनेक मार्गांनी निधी गोळा झाला. अनेक नवनवे अनुभव मिळाले. या आठवड्यातील कौटुंबिक समाधानाचा एक दिवस... दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचा सप्ताह सुरू झाला. रात्री होस्टेलच्या मुलांबरोबर बसून स्टॉलच्या कामाचे नियोजन केले. जवळपास ६-७ तास त्या कामात गेले. या कामात नियोजनापासून ते स्टॉलच्या कामात माझी पत्नी सौ.शैलजा आणि मुलगा शंतनू यांचा सक्रीय सहभाग होता. स्टॉलच्या कामात तर त्यांनी भाग घेतलाच पण त्याचबरोबर दोघांनीही आपापल्या पैशातून दुष्काळग्रस्त मदत

सामाजिक जाणिवेतून...

Image
    २०१३ हे स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने दरवर्षी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेतली जाते आणि त्यातून स्वामीजींचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.२०१२ पासूनच आमच्या म.ए.सो.गरवारे महाविद्यालयातील तसेच म.ए.सो. वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले. या परीक्षेत वसतिगृहातील अनेक मुला-मुलींनी भाग घेतला. त्याच बरोबर स्वामीजींचे जीवन व कार्य वसतिगृहाच्या सर्व मुला-मुलींना समजावे यासाठी स्वामीजींच्या जन्मदिनी २०१२ मध्ये दामोदर रामदासी यांचा स्वामीजींच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग,  २०१३ मध्ये  कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे  कीर्तन ,तर २०१४ मध्ये शाहीर बापू पवार यांचे पोवाडा गायन या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. हे सगळे कार्यक्रम करत असताना मुला मुलींच्या विचारांना चालना मिळत होती.  २०१५ मध्ये देखील या परीक्षेला मुलेमुली बसली होती. त्यानंतर एके दिवशी रात्री मी या मुला-मुलींशी बोललो. स्वामीजींचा कोणता विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटतो यावर मनमोकळी चर्चा झाली. मी मुला-मुलींना म्

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शिक्षक

Image
  शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध हे जिवंत प्रकारचे असतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर देतातच परंतु विद्यार्थ्यांच्याबद्दल शिक्षकांच्या मनात असलेला जिव्हाळा, गुणग्राहकता हे त्या नात्याची उंची वाढवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यामध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना जातींच्या उच्चनीचतेच्या चुकीच्या कल्पनांमुळे अपमानाचे अनेक प्रसंग सहन करावे लागले. या अपमानामुळे तळमळत असलेल्या त्यांच्या मनावर दोन शिक्षकांच्या वागणुकीमुळे जणू फुंकर घातली गेली. बाबासाहेब मोठ्या जिद्दीचे होते. एके दिवशी खूप पाऊस पडत असताना ते जिद्दीने शाळेत जाण्यास निघाले आणि अर्थातच शाळेत जाईतोपर्यंत पूर्णपणे भिजून गेले. शाळेत गेल्यावर तिथे पेंडसे नावाच्या त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्याची मायेने विचारपूस केली. भीमराव पूर्णपणे भिजून आला आहे हे लक्षात घेऊन पेंडसे गुरुजींनी आपल्या मुलाबरोबर भीमरावाला स्वतःच्या घरी पाठवले. त्याला आंघोळीला गरम पाणी देण्याची व्यवस्था केली आणि त्याला कोरडे कपडेही दिले. बाबासाहेबांच्या मनात हा प्रसंग कोरला गेला. याच माध्यमिक शाळेत आंबेडकर नावाचे दुसरे एक शिक्ष

संत तुकाराम आणि आजची परिस्थिती

Image
  गेली अनेक शतके महाराष्ट्राच्या मनाची मशागत करणाऱ्या वेगवेगळ्या पंथ, संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संप्रदायात संत बहिणाबाई यांचा " ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस " हा उल्लेख असणारा अभंग प्रसिद्ध आहे. या अभंगांमध्ये ज्यांचे वर्णन वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून केले आहे त्या संतश्रेष्ठ तुकाराम यांचे अनेक अभंग हे समाजाला शाश्वत मार्गदर्शन करणारे आहेत. महान व्यक्तिंच्या जीवनात काही भाग ते जेव्हा जगत असतात त्या काळासाठी असतो. तर त्यांची शिकवण ही चिरकालिक असते असे लक्षात येते. संत तुकाराम यांच्याबद्दल देखील हेच म्हणता येईल. त्यांच्या शिकवणुकीतील काही गोष्टींचा विचार करूया. माणसाच्या आयुष्यासाठी पैसा ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. परंतु हा पैसा किंवा धन हे चांगल्या मार्गाने मिळवावे आणि ते मिळवल्यानंतर केवळ आपल्यासाठी आहे असा न विचार करता समाजाचा देखील विचार करावा हे संत तुकारामांनी सांगितले आहे. ते म्हणतात " जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी " आपल्या आजूबाजूला देखील समाजामध्ये अशी माणसे दिसतात की जी अतिशय प्रामाणिकपणे आपल

महात्मा ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेतील कार्य

Image
  महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७६-८२ मध्ये पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून काम केले. • कार्यकारी मंडळ सर्वसाधारण सभेला जबाबदार असावे असा आग्रह त्यांनी धरला. • त्यांनी लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले. • भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न केला. • १८ जुलै १८८० ला दारूचे गुत्ते वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. ते म्हणाले,' दारुचे व्यसन नैतिक आचरणास बाधक आणि आरोग्यास अपायकारक आहे.' ( १८७४ ते १८७९ या वर्षात दारूचा खप ५० टक्क्यांनी वाढला होता. इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मते गावठी दारूचे दुष्परिणाम जास्त होत. त्यासाठी दारूची मान्यताप्राप्त दुकाने जास्त उघडली पाहिजेत.) • ३० नोव्हेंबर १८८० महाराज्यपाल ( व्हॉइसरॉय ) लिटन याच्या पुणे भेटीच्या वेळेला सुशोभीकरणासाठी १००० रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यांचा एकट्याचा(३२ जणांपैकी ) या प्रस्तावास विरोध होता. ( संदर्भ धनंजय कीर लिखित चरित्र) महापुरूषाला विनम्र अभिवादन..! ( छायाचित्र विकिपीडिया) सुधीर गाडे, पुणे 8 Comments

लोकशाही मूल्ये जगणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Image
एप्रिल १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथील पोटनिवडणुकीसाठी उभे होते. समाजवादी पक्षाचे अशोक मेहता देखील त्यांच्यासोबत उभे होते. समाजवादी पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांच्यातील समजुतीच्या करारामुळे एकमेकांनी दुसऱ्याच्या उमेदवाराला आपले दुसरे मत द्यायचे असे ठरले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेबांना आधीच्या अनुभवावरून असे सांगितले की," आपली मते समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला जातील, पण त्यांची मते तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुम्ही पराभूत व्हाल. त्यामुळे आपण दुसरे मत जाळू( म्हणजे दुसरे मत कोणालाही द्यायचे नाही.) डॉ. बाबासाहेब म्हणाले," मी हरणे पसंत करीन पण तुम्हा लोकांना दुसरे मत जाळण्याची परवानगी देणार नाही. मी भारतीय घटना तयार केली , त्या घटनेच्या तरतुदींचा अवलंब करताना असा गैरप्रकार मी कधीही सहन करणार नाही." डॉ.बाबासाहेबांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी काम केले. मेहतांना बाबासाहेबांच्या प्रभावक्षेत्रात कमी मते मिळाली पण समाजवादी पक्षाची मते बाबासाहेबांना मिळाली नाहीत. परिणाम मेहता निवडून आले पण डॉ. बाबासाहेब पराभूत झाले. राजकीय लाभासाठी घटनात्मक म