Posts

Showing posts from August, 2021

कोरोना वारियर्स आप लढो....

Image
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृह संचलित विलगीकरण केंद्र        जगावर ओढवलेल्या कोरोना या आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हिरिरीने पुढे आली. संस्थेकडून विविध पद्धतीने मदत कार्य केले गेले. त्यापैकी संस्थेच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहामध्ये सुरू केलेल्या विलगीकरण केंद्राची माहिती.       २०२० च्या मार्च  महिन्यामध्ये मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी आदेश दिल्यानुसार सरकारच्या वतीने विलगीकरण केंद्रासाठी वसतिगृह अधिगृहित करण्यात आले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गावी गेलेले असल्याने कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वसतिगृहातील आवश्यक त्या व्यवस्था सुरू ठेवल्या होत्या.          ज्या वस्त्यांमध्ये कोरोना या विषाणूचा तीव्र संसर्ग आहे अशा वस्त्यांमध्ये डॉक्टरांच्या  टीमने जाऊन घरोघरी वैद्यकीय सर्वेक्षण करण्याची योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आली. सर्वेक्षणासाठी जाणारे डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस स्वयंसेवक यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था महाविद्यालयीन विद

कार्यक्रमांतून प्रशिक्षण

            म.ए.सो.वसतिगृहाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी जेव्हा भेटतात तेव्हा ते ज्या गोष्टींची आठवणीने चौकशी करतात त्यामध्ये चौकशी असते ती वसतिगृहातील कार्यक्रमांची!        वसतिगृहात गुरूपौर्णिमा, रक्षाबंधन, शिक्षकदिन, गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा, वसतिगृह दिनाच्या स्पर्धा, विविध गुणदर्शन , शिवजयंती असे अनेक कार्यक्रम होत असतात. या सर्व कार्यक्रमांची तयारी, कार्यक्रम पार पाडणे या बहुतेक सगळ्या गोष्टी मुलेमुलीच करत असतात.          ही तयारी करताना मुलेमुली अनेक गोष्टी नकळत सहजपणे शिकत असतात. यामध्ये कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे, एकमेकांची ओळख होते, परस्परांना सहकार्य करणे, छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर त्यावर उपाय शोधून काढणे, संघभावना निर्माण होणे, नेतृत्वगुण विकसित होणे, संवादकौशल्य वाढणे यासारख्या गोष्टी होतात.            गणेशोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कला स्पर्धा, प्रश्नमंजूषा, अंताक्षरी, गायन स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम असतात. साधारणपणे याच स्पर्धा वसतिगृह दिनाच्या निमित्ताने होतात. त्यात भर पडते ती

विकृतीला वेसण

      समाजातील काही व्यक्ती विकृत वर्तन करतात. त्यापैकीच एका अनुभवाचं हे कथन.      आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या मुलींच्या इमारतीमागे पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आहे. तिथून मागच्या बाजूने मुलींच्या वसतिगृहाची इमारत दिसते. साधारण ६-७ वर्षांपूर्वी वसतिगृहाच्या मुलींनी या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात रात्रीच्या वेळी उभे राहून एक माणूस मुलींच्या वसतिगृहाकडे तोंड करून , मुलींना दिसेल अशा पद्धतीने मुद्दाम विकृत लैंगिक चाळे करतो असे वसतिगृहात काम करणाऱ्या मावशी सौ. शोभा डोईजोडे यांना सांगितला. शोभामावशींनी माझी पत्नी सौ.शैलजा हिला सांगितले. एका मुलीने त्याचा फोटोदेखील मोबाईलमध्ये काढून घेतला होता.सौ.शैलजाने हा प्रकार मला आणि मी त्यावेळचे वसतिगृहप्रमुख डॉ. एन. एस. उमराणी यांना सांगितला. काय करायचे याची आम्ही चर्चा केली. यासाठी पोलीस मदत क्रमांक १०० ची मदत घ्यायचे आम्ही ठरवले.    एके दिवशी रात्री सौ.शैलजा मुलींच्याबरोबर त्या बाजूच्या बाल्कनीत जाऊन बसली. नेहमीप्रमाणे तो माणूस येऊन विकृत चाळे करू लागला. त्यावेळी शैलजाने शंभर क्रमांकाला फोन करायला मला सांगितले.

रूग्णालयात देखभाल

   "सर, अर्जुनच्या पोटात खूप दुखते आहे म्हणून आम्ही त्याला संजीवनी रुग्णालयात घेऊन आलो आहोत. इथल्या डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करून घ्यायला सांगितले आहे. तुम्ही डॉक्टरांशी जरा बोला." साधारण ५-६ वर्षांपूर्वी मला वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा फोन आला.      दरवर्षी साधारणपणे दोन-तीन वेळा असे प्रसंग येतात. वसतिगृहातील मुलाला किंवा मुलीला काहीतरी दुखणे सुरू होते, ते वाढत जाते आणि रुग्णालयात दाखल करावे लागते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याने आमच्या वसतिगृहाच्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वेगळे मनुष्यबळ नाही. परंतु वर्षानुवर्षांच्या या पद्धतीनुसार दरवर्षी नवीन मुलांच्या सभेमध्ये अशा प्रसंगी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले जाते. वसतिगृहातील जुनी मुलेमुली अनुभवातून हे करत असतात. तीच पद्धत पुढे चालत आली आहे.       विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर बहुधा वसतिगृहातर्फे आधी फोनवर बोलणे होते.आवश्यक ते उपचार सुरू केले जातात. रूग्णालयात जाऊन विद्यार्थी, डॉक्टर यांना भेट घेतली जाते. पालक, स्थानिक पालक

बदल स्वीकारले

    "सर, मला वाटते आपल्या वसतिगृहातील गणेशविसर्जनाची पद्धत आपण बदलली पाहिजे." महाविद्यालयाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षाला असलेला नीलेश मोडक त्या वेळचे वसतिगृहप्रमुख प्रा. र.वि. कुलकर्णी यांना सांगत होता. त्याच्या सुवाच्च अक्षरांमध्ये त्याने तसा अर्जदेखील लिहून आणला होता. साधारण २००८ मधील ही घटना आहे.         वसतिगृहाच्या कामकाजाच्या पद्धती,उपक्रम सणवार हे आधीच्या अनुभवातून बऱ्यापैकी ठरलेले असतात. वसतिगृहातील विद्यार्थी हे अनेकवेळा नवनवीन विचार मांडत असतात. अशा नवनवीन विचारांची चर्चा करून त्यातील काही विचार कल्पना यांचा समावेश आम्ही म.ए.सो.च्या वसतिगृहाच्या उपक्रमांमध्ये करत गेलो आहोत. त्यापैकीच ही एक घटना.        म.ए.सो.च्या वसतिगृहामध्ये दरवर्षी तीन दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. पहिल्या दिवसाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वसतिगृहापर्यंत काढली जाते. अनेक वर्षे तिसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या बाजूलाच असलेल्या मुठा नदीमध्ये गणेश विसर्जनाची पद्धत होती. तीदेखील ढोल ताशा यांच्या गजरात, गुलालाची उधळण करत काढण्याची पद्धत हो

वाद हातघाईवर आल्यानंतर....

 "सर, धनंजयने ( नाव बदलले आहे) मला गालावर चापट मारली." आमच्या वसतिगृहातील नीलिमा (नाव बदलले आहे) संतापाने सांगत होती. साधारण तेरा-चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.       आमच्या म.ए.सो.वसतिगृहातील मुले मुली तरूण वयातील असतात. तारूण्यामध्ये अंगात धमक असते. त्यामुळे 'अरे' ला 'कारे' करण्याची काही जणांची प्रवृत्ती देखील असते. मुलामुलींचे असे आपापसात वाद कधी कधी होत असतात. काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण सुरू होते आणि ते हातघाईवर पोचते. मग अशावेळी दिवसभरात किंवा कधीकधी रात्री-अपरात्री माहिती कळते, फोन येतो. अशावेळी दोन्ही बाजूंचे ऐकून घेणे समजावून सांगा आवश्यक ती कार्यवाही करणे या गोष्टी होतात.         सुरूवातीला सांगितलेल्या प्रसंगाच्यावेळी प्रा.र.वि.कुलकर्णी सर वसतिगृहप्रमुख होते. त्यांच्या वसतिगृहप्रमुखाच्या दीर्घ अनुभवानुसार चौकशी सुरू केली. मुलामुलींकडून बेजबाबदार वर्तन घडले की त्यांच्या स्थानिक पालकांना ताबडतोब बोलावण्याची पद्धत आहे. कारण वसतिगृहाच्या मुलामुलींचे  आई-वडील पुणे  शहरापासून लांब राहत असतात. धनंजयबाबत त्याचे नातेवाईक वा परिचित कोणी नसल्यामुळे

गाथा गांधारची

        गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्थानची पुष्कळ चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानचे प्राचीन नाव गांधार असल्याचा उल्लेख आढळतो. महाभारतामधील धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही याच प्रदेशातली. याच प्रदेशाचे नाव उपगणस्थान असल्याचादेखील उल्लेख आढळतो. या प्रदेशात अनेक शतके हिंदू आणि बौद्ध शासकांनी राज्य केल्याचा उल्लेख इतिहासात आहे.   सन ६५० मध्ये धर्मांध अरबी मुस्लिमांचे आक्रमण या प्रदेशावर झाले. हा अर रवि इब्न झियाद नावाचा आक्रमक होता. यावेळी सिस्तान येथे राज्य करणारा राजा रणबल याने त्याचा पराभव करून आपली राजधानी जरंग परत जिंकली. परंतु धर्मांध आक्रमकांच्या टोळ्या एकामागून एक येतच गेल्या.      नंतरच्या काळात रणबल दुसरा याने अब्दुल्ला, उबैदुल्ला, अब्दुर्रहमान यांचे आक्रमण परतवून लावले. त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. पण नंतर ८७० मध्ये याकूब लईसचा हल्ला झाला. त्यात विश्वासघाताने रणबलचा मृत्यू झाला.    ८६५ नंतर  लघतुर्माणला कैद करून त्याचा मंत्री कल्लर(लल्लीय) हा राजा झाला. त्याने याकूब इब्न लइसच्या आक्रमणामुळे राजधानी काबूलवरून उद्भांडपूरला नेली.  ८९५ मध्ये कमल वर्मा हा राजा झाला. ९२१ भीमदेव राजा झ

नका रे......

            " आमचा साहिल (नाव बदलले आहे) असं वागूच शकत नाही. आज तुम्ही त्याला वसतिगृहातून बाहेर काढत आहात पण चार वर्षांनी मी येऊन अभिमानाने त्याची पदवी दाखवेन." साहिलचे वडील त्यावेळचे वसतिगृहप्रमुख डॉ. उमराणी सर यांच्या टेबलवर हात आपटून म्हणाले. ही सुमारे सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट.                वसतिगृहात राहायला आल्यानंतर मुलामुलींना पुष्कळ स्वातंत्र्य मिळते. अनेक जण त्याचा जबाबदारीने उपयोग करतात परंतु काहीजण मात्र  व्यसनांच्या मार्गाला लागतात असे अनुभव मला आले आहेत.  ज्या मुला-मुलींना जबाबदारीची जाणीव राहत नाही ते आकर्षणाने, सोबत्यांच्या आग्रहाने व्यसनांच्या मार्गाला लागतात.          सुरूवातीला जो प्रसंग लिहिला आहे तो एका अतिशय हुशार विद्यार्थ्याबाबतचा आहे. साहिल हा कोकणातला, दहावीला ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेला विद्यार्थी. पण पुण्यात आल्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले आणि त्याची अधोगती सुरू झाली. ज्यावेळी हे लक्षात आले त्यावेळी आम्ही त्याला वसतिगृहातून काढून टाकायचे ठरवले. त्याच्या वडिलांना बोलावले. ज्यावेळी मुलाच्या व्यसनाबद्दल त्यांना सांगितले त्यावेळी त्यांचा विश्व

रॅगिंग...?

     " सर , आपल्या वसतिगृहातल्या  मुलाने रॅगिंग झाल्याची तक्रार नवी दिल्लीच्या हेल्पलाईनवर केली आहे. काय प्रकार आहे?" सुमारे नऊ दहा वर्षापूर्वी सकाळी ८ च्या सुमाराला मला त्यावेळचे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता सरांचा फोन आला. तिथून पुढे चौकशीला सुरुवात झाली.    गेल्या काही वर्षात  'रॅगिंग 'हा शब्द महाविद्यालयात वसतिगृहात परिचयाचा झाला आहे काही ठिकाणी यातून गंभीर घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच महाविद्यालय आणि वसतिगृह या ठिकाणी हा शब्द गांभीर्याने घेतला जातो. त्याबद्दलची उपाय योजना देखील केली जाते.      प्रकार असा घडला होता. वसतिगृहातील प्रथम वर्षाचे तीन विद्यार्थी सकाळच्या पीटीनंतर एका खोलीत गप्पा मारत बसले होते. एकमेकांची चेष्टा चालू होती. पण गमतीगमतीत चाललेल्या चेष्टेचे रूपांतर अचानक थट्टेत झाले. एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत अपघाताने थोडे लाजिरवाणे वर्तन घडले. प्रसंग घडल्यानंतर उरलेले दोघे आपापल्या खोल्यात गेले. ज्याच्या बाबतीत ही घटना घडली त्याला ही थट्टा नकोशी वाटली. त्याने सर्वत्र प्रसिद्ध होणाऱ्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनच्या क्रमांका

मोहाचा एक क्षण

 " सर मी माझ्या हातावर दगडाने मारून घेतले." अमर(नाव बदलले आहे) सांगत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते. "पण मी परत असं करणार नाही सर!", एक निश्चयही त्याच्या बोलण्यातून डोकावत होता. सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. अमर आणि गौरांग (नाव बदलले आहे) हे महाविद्यालयाचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी. आमच्या मएसो महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात एकाच खोलीत राहत होते. त्यावेळी मोबाईल फोनचा प्रसार वाढायला सुरुवात झाली होती. गौरंगच्या वडिलांनी त्याला एक भारी किमतीचा मोबाईल विकत घेऊन दिला होता. नवाकोरा मोबाईल अचानक चोरीला गेला. चौकशी सुरू झाली पण त्यातून चोर काही सापडला नाही. गौरंगच्या वडिलांनी पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि त्यातून अमरने मोबाईल चोरल्याचे कबूल केले. तो मोबाईल त्याने परत दिला. स्वतःच्या वडिलांनादेखील या घटनेबद्दल त्याने सांगितले. त्याच्या वडिलांनी , "आता याची शिक्षा काय करून घ्यायची ते तूच ठरव" असे अमरला सांगितले आणि मग अमरने दगडाने स्वतःच्या हातावर मारून घेतले. मोहाच्या एका क्षणी अमरने हा मोबाईल चोरला होता. पण हा प्रसंग त्याच्या वागणुकील

अन्नविचार

    २०१३ साली स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्यासंबंधी लिहिलेल्या आणि त्यांच्या व्याख्यानांच्या काही पुस्तकांचे वाचन केले. त्यात एक पुस्तक वेगळेपणाने लक्षात राहिले ते श्री.शंकर यांचे " अज्ञात विवेकानंद " हे पुस्तक. त्यात विवेकानंद बद्दल वेगवेगळी माहिती लिहिली आहे. त्यातील एक प्रसंग. एकदा विवेकानंदांनी गमतीने आपल्या शिष्यांना विचारले की जगात असा कोणता देश आहे जिथे साधू,  राजा आणि आचारी यांना एकच शब्द आहे. नंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिले की आपला भारतच तो देश आहे. ' महाराज ' या शब्दाने आपल्याकडे या तिघांनाही संबोधले जाते. याच पुस्तकात असा उल्लेख आहे की स्वामीजींच्या लहानपणी त्यांच्या घरी आणि बहुधा त्यांच्या परिचितांच्या घरी जेवताना पाणी उजव्या हाताने प्यायची पद्धत होती. स्वामीजींनी खटपट करून ही पद्धत बदलली.        गुणांचा सागर असलेल्या स्वामीजींना स्वतः स्वयंपाक करून आग्रहपूर्वक आपले गुरूबंधू आणि शिष्य यांना खाऊ घालायला आवडायचे. बेलूर येथील मठाचे बांधकाम चालू असताना स्वामीजींनी तिथे काम करणाऱ्या संथाळी मजूरांना एके दिवशी बोलावून आग्रह करकरून जेवायला

भोरजवळील आंबवडे

Image
  मार्च २०१५ मध्ये  वनवासी कल्याण आश्रमाच्या सहलीच्या निमित्ताने भोरजवळील आंबवडे गावी जाण्याचा योग आला. भोरपासून १० किमीवर हे गाव आहे. भोरहून गावाकडे जाताना वाटेत लाल रंगांची फक्त फुले असणारी सुईरीची अनेक निष्पर्ण झाड सध्या लक्ष वेधून घेतात. गावात पोचल्यावर समोर येतो तो १९३७ साली भोरचे तत्कालीन संस्थानिक पंतप्रतिनिधी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला झुलता पूल. ( Suspension bridge) . हा पूल तिथल्या ओढ्यावर बांधला आहे. पूल ओलांडून साधारण १५ पायर्या चढून नंतर ३० पायर्या उतरलो की आपण पोचतो ते नागेश्वर मंदिराच्या परिसरात. हे भगवान शंकराचे ऐतिहासिक दगडी मंदीर आहे. या दगडी मंदिरात उन्हाळ्याच्या दिवसातही चांगला गारवा जाणवतो. मंदिराच्या परिसरात असलेल्या गोमुखातून बाराही महिने पाणी समोरच्या कुंडात पडते. हे पाणी कोठून येते ते सांगता येत नाही असं गावकरी म्हणाले. हे गोमुख पांडवकालीन आहेे असे त्यांचे म्हणणे आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला छोटा धबधबा आहे. मंदिराभोवती झाडी आहे. या मंदिराशेजारी लग्नकार्यासाठी मंडप आहे. तसेच पूूल ओलांडल्यानंतर पंतप्रतिनिधी घराण्याचे संस्थापक तसेच घराण्यातील अन्य दि

प्रवीण विठ्ठल तरडे यांची भेट

  १७/७/१५ रोजी प्रवीण विठ्ठल तरडे यांची भेट झाली. आपण त्यांना ओळखतो ते लेखक,दिग्दर्शक म्हणून. पण या भेटीत त्यांची काही वेगळी ओळख समजली. विद्यार्थीदशेपासून ते व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करतात.२००० मध्ये गरवारे कॉलेजमध्ये २०० तरूणांना व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता.जिथे व्यसन ही नेहमीचीच गोष्ट आहे अशा चित्रपटसृष्टीत काम करत असताना अनेकांना त्यांनी व्यसनांपासून त्यांनी परावृत्त केले आहे. ३१ जुलैपासून त्यांचा "देऊळ बंद" चित्रपट प्रदर्शित होतो आहे.त्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी आग्रहपूर्वक निर्व्यसनी लोकांची निवड केली.त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मनापासून अभिनंदन! यापद्धतीचे प्रयत्न आपणही आपापल्या पातळीवर करूया. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची " एक वाचक बाकी सूचक" ही संस्था. वाचनसंस्कृती वाढवण्याचा उपक्रम अनेक मान्यवर कलाकारांना बरोबर घेऊन ते करतात. त्यांच्या या उपक्रमामधील लोकांमध्ये त्यांच्याबरोबरच आणखी बारा जणांनी स्वतःचा ५००० पुस्तकांचा संग्रह केला आहे. त्यांच्याकडे कामासाठी येण्याकरता किमान १०० पुस्तकांचे वाचन हवे अशी अट त्यांनी घातली आहे. त्यांच

गडहिंग्लज : काही संस्मरणीय क्षण

Image
  दि.३ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या " शिवशक्तीसंगम" या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्मासाठी १४-१७ नोव्हेंबर गडहिंग्लजमध्ये ( कोल्हापूर) विस्तारक होतो.  समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांची भेट झाली. संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची भूमिका दिसली.         या विस्तारक काळातील अनुभव संघकामाची प्रेरणा आणखी बळकट करणारा होता.        काही संस्मरणीय क्षण - * एका घरी सकाळीसकाळी गेलो तेव्हा काकूंनी येऊन पटकन औक्षण केले. * शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याच्या घरी कै.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला जाणे झाले. * देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर काम करणारे श्री. विठ्ठलराव बन्ने यांच्या घरी त्यांच्या मुलाशी भेट व चर्चा झाली.  * नाईक समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते श्री.शिवाजी नाईक यांची भेट झाली.संघकाम हे सर्व भेदांच्या पलिकडे जाणारे आहे व ते अजून वाढले पाहिजे असे ते तळमळीने सांगत होते. * शिक्षणतज्ञ जे.पी.नाईक यांचे नातेवाईक प्रा.श्रीकांत नाईक यांची भेट झाली.ते दरवर्षी उत्तुर गावात १-७ जानेवारी या काळात व्याख्यानमाला चालवतात. गेली अनेक वर्षे ही व्याख्यानमाला चाल

ट्यूब्ज कापून वापरूया

Image
  'काय चेंगटपणा चालू आहे'. घरातील संपत आलेली टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, फेस वॉश  इ.च्या ट्यूब्ज कापून वापरायला सुरूवात केली की हे वाक्य काही वेळा ऐकू येतं. असं बोलणाऱ्याला वाटतं की काय हा पैसा वाचवण्याचा प्रकार चालू आहे. पण जरा बारकाईने विचार केला की याचा परिणाम आणि प्रमाण लक्षात येईल. विविध गोष्टींसाठीच्या ट्यूब कापून त्यातील गोष्टी पुढे अनेक दिवस वापरता येतात. यात पैसा वाचतो हे तर सहज लक्षात येतं. पण मुद्दा दृष्टिकोनाचादेखील आहे. भारतीय विचारानुसार एखाद्या गोष्टीचा, वस्तूचा शक्य तितका अधिकात अधिक उपयोग केला पाहिजे. यामागे संसाधनांचा पुरेपूर उपयोग होत असतो. या दृष्टीकोनाबरोबरच नुकसान किती होतं याचं गणितदेखील पुढे दिलेल्या माहितीवरून सहज लक्षात येईल.आमच्या महाविद्यालयात दैनंदिन जीवनातील वस्तू वापरून वैज्ञानिक प्रयोग/खेळणी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तिने कापून वापरलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबपासून प्रयोग करून दाखवताना अचानक विचारले की तुमच्यापैकी कितीजण अशा पद्धतीने ट्यूब कापून वापरतात? या प्रश्नानंतर चार साडेचारशे व्यक्तिंनी भरलेल्या सभागृहात मोजक

भारताच्या विभाजनाचा इतिहास

Image
२०फेब्रुवारी १९४७ ते १७ ऑगस्ट १९४७(होय होय १७ ऑगस्ट १९४७च) ह्या छोट्याश्या काळात ज्या वेगाने घटना घडल्या त्याने एक दुःखदायक, रक्तरंजित,वेदनादायक असा इतिहास लिहिला गेला.या कालावधीत कोट्यवधी लोक निर्वासित झाले, लाखो निरपराध प्राणाला मुकले तर हजारो महिलांच्यावर अमानुष अत्याचार झाले. या काळातील ठळक घडामोडी २० फेब्रुवारी १९४७ :-"आम्ही जून १९४८ (होय जून १९४८च) पर्यंत भारतात सत्तांतर करू."  क्लेमेंट ॲटली  सरकारची ब्रिटीश पार्लमेंटमध्ये घोषणा,३ जून १९४७ :- भारताच्या फाळणीची व्हॉईसरॉय माउंटबॅटनची घोषणा,१४ ऑगस्ट १९४७:- पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्ट १९४७ :- भारताचा स्वातंत्र्यदिन , १७ ऑगस्ट १९४७ :- भारत,पाकिस्तानच्या सीमा ठरवण्यासाठी नेमलेल्या रॅडक्लिफ आयोगाने सीमा जाहीर केल्या. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी:- जून १९४८ ची मुदत असताना हे स्वातंत्र्य ऑगस्ट १९४७ मध्ये आणि १५ ऑगस्टलाच का तर जपानी सैन्याने१५ ऑगस्ट १९४५ ला युद्धात  माउंटबॅटनपुढे शरणागती पत्करली होती.  पाकिस्तान कदापी निर्माण होणार नाही असे म्हणणाऱ्या नेत्यांचे शब्द खोटे का ठरले?  सीमा आयोगाचा निर्णय देखील १५ ऑगस्ट पर्य